शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

निवडणूक प्रक्रिया नव्याने सुरु करा; एनआरएआयला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 08:13 IST

क्रीडा मंत्रालयाने नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले असले, तरी एनआरएआय शनिवारी निवडणूक पार पाडणार आहे.

नवी दिल्ली : मोहाली येथे होणाऱ्या निवडणुकीच्या एक दिवस आधी क्रीडा मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेला (एनआरएआय) नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले श्यामसिंग यादव यांना निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्यानंतर परस्पर हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे क्रीडा मंत्रालयाने हे निर्देश दिले.

क्रीडा मंत्रालयाने नव्याने निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले असले, तरी एनआरएआय शनिवारी निवडणूक पार पाडणार आहे. कारण, हा निवडणूक अधिकारी नियुक्तीचा मुद्दा दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबर महिन्यात होणार आहे. विद्यमान अध्यक्ष रनिंदर सिंग पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी लढणार असून, त्यांना श्यामसिंग यादव यांनी आव्हान दिले आहे.

- मंत्रालयाच्या निर्देशानंतर ही निवडणूक अवैध ठरविण्यात येणार असल्याचे निश्चित आहे. उत्तर प्रदेश राज्य रायफल संघटनेचे अध्यक्ष असलेल्या यादव यांच्या याचिकेवर कारवाई करताना क्रीडा मंत्रालयाने निवडणूक अधिकारी बदलण्यास सांगितले होते. क्रीडा मंत्रालयाने आदेश दिले की, राष्ट्रीय क्रीडा संहिता २०११चे उल्लंघन होणार नाही, याकडे लक्ष देताना निवडणूक अधिकारी बदलावा. निवृत्त न्या. मेहताबसिंग गिल यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांच्या नियुक्तीवर यादव यांनी आक्षेप घेतला आहे. 

टॅग्स :Shootingगोळीबार