शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
3
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
4
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
5
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
6
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
7
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
8
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
9
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
10
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
11
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
12
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
14
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
15
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
16
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
17
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
18
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
19
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
20
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

कर्नाटकसमोर शेष भारत ‘ढेर’

By admin | Updated: March 21, 2015 01:18 IST

मनिष पांड्येचे शानदार नाबाद शतक आणि श्रेयश गोपालने घेतलेली फिरकी याजोरावर बलाढ्य कर्नाटकने सलग दुसऱ्यांदा इराणी ट्रॉफीवर कब्जा करताना शेष भारताचा २४६ धावांनी धुव्वा उडवला.

इराणी ट्रॉफी: निर्णायक शतक झळकावणारा मनिष पांड्ये ठरला सामनावीरबंगळुरु: मनिष पांड्येचे शानदार नाबाद शतक आणि श्रेयश गोपालने घेतलेली फिरकी याजोरावर बलाढ्य कर्नाटकने सलग दुसऱ्यांदा इराणी ट्रॉफीवर कब्जा करताना शेष भारताचा २४६ धावांनी धुव्वा उडवला. कर्नाटकने एकूण सहाव्यांदा हे विजेतेपद पटकावताना विजयी ‘षटकार’ देखील नोंदवला.सामनावीर ठरलेल्या पांंड्येने १६४ चेंडुमध्ये १२ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करताना नाबाद १२३ धावा कुटत कर्नाटकला दुसऱ्या डावात ४२२ धावांची मजल मारुन दिली आणि शेष भारताला विजयासाठी ४०३ धावांचे कठीण आव्हान दिले. या अशक्यप्राय आव्हानाचा पाठलाग करताना अडखळती सुरुवात झालेल्या शेष भारताचा डाव ४३.३ षटकांत अवघ्या १५६ धावांत संपुष्टात आला. केदार जाधवने एकाकी झुंज देताना संयमी ५६ धावा फटकावल्या. परंतु दुसऱ्या बाजूला एकही फलंदाज कर्नाटकच्या माऱ्यासमोर न टिकल्याने शेष भारताचा पराभव झाला.फिरकीपटू गोपालने अचूक मारा करत ३९ धावांत ४ बळी घेत शेष भारताच्या फलंदाजांना नाचवले. अभिमन्यू मिथूनने देखील त्याला चांगली साथ देताना ४० धावांत ३ बळी घेतले. एस. अरविंद आणि एच. शरथ यांना प्रत्येकी एक बळी घेण्यात यश आले.चौथ्या दिवशी ६ बाद ३४१ या धावसंख्येवरुन सुरुवात करताना कर्नाटकने पांड्येच्या जोरावर ४००चा पल्ला पार केला. कर्णधार विनय कुमार (३८) ने छोटेखानी खेळी केली. पहिल्या डावात अपयशी ठरलेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरने आपला जलवा दाखवताना दुसऱ्या डावात कर्नाटकचा अर्धा संघ ८६ धावांत गारद केला. वरुण अ‍ॅरोन आणि प्रग्यान ओझा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.भल्यामोठ्या धावांचा पाठलाग करताना शेष भारताचा डाव सुरुवातीपासूनच गडगडला. शरथ आणि मिथून यांनी शेष भारताच्या आघाडीच्या फळीला जबरदस्त धक्के देत त्यांची सुरुवातीलाच ३ बाद ८ अशी केविलवाणी अवस्था केली. यानंतर जीवनज्योत सिंग (३८) आणि कर्णधार मनोज तिवारी (२४) यांनी चौथ्या विकेट्साठी ५५ धावांची भागीदारी केली. मात्र हे दोघेही पाठोपाठ बाद झाल्याने शेष भारतची ५ बाद ६५ अशा अवस्था झाली. यानंतर केदारने आक्रमक अर्धशतक झळकावताना शेष भारताला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने योग्य साथ न लाभल्याने त्यांचा डाव १५६ धावांत आटोपला. (वृत्तसंस्था) संक्षिप्त धावफल:कर्नाटक (पहिला डाव): सर्वबाद २४४ धावा.शेष भारत (पहिला डाव): सर्वबाद २६४ धावाकर्नाटक (दुसरा डाव): समर्थ त्रि. गो. ठाकूर ८१, अगरवाल झे. जाधव गो. अ‍ॅरोन २८, रेड्डी पायचीत गो. ओझा ३१, उथप्पा त्रि. गो. अ‍ॅरोन ६, नायर पायचीत गो. ओझा ८०, पांड्ये नाबाद १२३, गोपाल झे. नमन गो. गो. धवन ०, विनय झे. नमन गो. ठाकूर ३८, मिथून त्रि. गो. ठाकूर १०, अरविंद पायचीत गो. ठाकूर ४, शरथ झे.डोग्रा गो. ठाकूर ५. अवांतर - १६. एकूण: ११०.३ षटकांत सर्वबाद ४२२ धावा.गोलंदाजी: धवन २१-१-७४-१; अ‍ॅरोन २७-४-१३१-२; ठाकूर २९.३-६-८६-५; ओझा २८-३-१००-२; जाधव ४-०-१६-०; तिवारी १-०-६-०.शेष भारत (दुसरा डाव): जीवनज्योती झे. रेड्डी गो. शरथ ३८, चंद झे. उथप्पा गो. मिथून १, डोग्रा त्रि. गो. मिथून ०, ओझा झे. उथप्पा गो. मिथून ०, तिवारी गो. अरविंद २४, जाधव झे. रेड्डी गो. गोपाल ५६, यादव पायचीत गो. गोपाल १०, धवन पायचीत गो. गोपाल १०, ठाकूर त्रि. गो. गोपाल ५, अ‍ॅरोन नाबाद १०, ओझा धावबाद ०. अवांतर - २. एकूण: ४३.३ षटकांत सर्वबाद १५६ धावा.गोलंदाजी: विनय १२-२-३४-०; मिथून १०-२-४०-३; शरथ ६-१-१६-१; अरविंद ९.३-३-२५-१; गोपाल ६-०-३९-४.या विजेतेपदासह सलग तीन राष्ट्रीय विजेतेपद पटकावण्याचा अनोखा विक्रम करताना यंदा कर्नाटकने विजेतेपदांची ‘हॅट्ट्रीक’ नोंदवली. इराणी ट्रॉफी अगोदर कर्नाटकने यंदाच्या रणजी ट्रॉफी व विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेचे विजेतेपद देखील राखले आहे.शेष भारतचा अर्धा संघ ६५ धवांत परतल्यानंतर त्यांचा उरल्या सुरल्या आशा अवलंबून होत्या त्या महाराष्ट्राच्या केदार जाधववर. केदारने एकाकी झुंज देत सहजासहजी हार पत्करणार नसल्याचा इशारा देत आक्रमक प्रतित्त्युर दिले. केदारने ४८ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करीत ५६ धावा काढल्या. त्याने सहाव्या गडीसाठी जयंत जाधव सोबत ४८ धावा रचल्या, ज्यात केदारचा वाटा ३८ धावांचा होता.