शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

जशास तसे उत्तर देण्यास सज्ज : रोहित

By admin | Updated: January 9, 2016 03:27 IST

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने उभय संघांदरम्यान पुन्हा एकदा कडवी झुंज

पर्थ : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने उभय संघांदरम्यान पुन्हा एकदा कडवी झुंज अनुभवाला मिळणार आहे. या मालिकेत जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असल्याचे भारतीय फलंदाज रोहित शर्माने म्हटले आहे. पाच वन-डे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेला १२ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. आॅस्ट्रेलियाने यापूर्वीच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला तर भारताला कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करताना विशेष अडचण भासली नाही. रोहित म्हणाला, ‘‘आम्ही प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहोत. उभय संघ विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील.’’दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहज विजयाची नोंद केल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ताळमेळ जुळवताना अडचण भासणार नाही, असेही रोहित म्हणाला. रोहितने यापूर्वीच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले, की आम्ही यापूर्वी २०१४ मध्ये येथे मालिका खेळलो होतो. ती मालिका चुरशीची झाली होती. निकाल आमच्यासाठी अनुकूल नव्हता, पण आम्ही अखेरपर्यंत संघर्षपूर्ण खेळ केला होता. आम्ही त्या वेळी सकारात्मक खेळ केला होता, या वेळीही तसाच प्रयत्न राहील.सन २००८मध्ये सर्वप्रथम आॅस्ट्रेलिया दौरा करणाऱ्या रोहितने त्यानंतर दोनदा आॅस्ट्रेलिया दौरा केला. गेल्या वेळी २०१५मध्ये वन-डे विश्वकप स्पर्धेच्या निमित्ताने रोहित आॅस्ट्रेलियात होता. भारतीय संघ मालिका सुरू होण्यास विलंब असताना आॅस्ट्रेलियात डेरेदाखल झाला आहे. रोहित म्हणाला, ‘‘पहिल्या वन-डे लढतीच्या तयारीसाठी जवळजवळ आठवडाभराचा वेळ मिळाला आहे. यापूर्वी येथे खेळण्याचा अनुभव असल्यामुळे पर्थमधील वातावरणाची आम्हाला चांगली कल्पना आहे. (वृत्तसंस्था)