शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जशास तसे उत्तर देण्यास सज्ज : रोहित

By admin | Updated: January 9, 2016 03:27 IST

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने उभय संघांदरम्यान पुन्हा एकदा कडवी झुंज

पर्थ : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने उभय संघांदरम्यान पुन्हा एकदा कडवी झुंज अनुभवाला मिळणार आहे. या मालिकेत जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असल्याचे भारतीय फलंदाज रोहित शर्माने म्हटले आहे. पाच वन-डे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेला १२ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. आॅस्ट्रेलियाने यापूर्वीच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला तर भारताला कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करताना विशेष अडचण भासली नाही. रोहित म्हणाला, ‘‘आम्ही प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहोत. उभय संघ विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील.’’दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहज विजयाची नोंद केल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ताळमेळ जुळवताना अडचण भासणार नाही, असेही रोहित म्हणाला. रोहितने यापूर्वीच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले, की आम्ही यापूर्वी २०१४ मध्ये येथे मालिका खेळलो होतो. ती मालिका चुरशीची झाली होती. निकाल आमच्यासाठी अनुकूल नव्हता, पण आम्ही अखेरपर्यंत संघर्षपूर्ण खेळ केला होता. आम्ही त्या वेळी सकारात्मक खेळ केला होता, या वेळीही तसाच प्रयत्न राहील.सन २००८मध्ये सर्वप्रथम आॅस्ट्रेलिया दौरा करणाऱ्या रोहितने त्यानंतर दोनदा आॅस्ट्रेलिया दौरा केला. गेल्या वेळी २०१५मध्ये वन-डे विश्वकप स्पर्धेच्या निमित्ताने रोहित आॅस्ट्रेलियात होता. भारतीय संघ मालिका सुरू होण्यास विलंब असताना आॅस्ट्रेलियात डेरेदाखल झाला आहे. रोहित म्हणाला, ‘‘पहिल्या वन-डे लढतीच्या तयारीसाठी जवळजवळ आठवडाभराचा वेळ मिळाला आहे. यापूर्वी येथे खेळण्याचा अनुभव असल्यामुळे पर्थमधील वातावरणाची आम्हाला चांगली कल्पना आहे. (वृत्तसंस्था)