शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जशास तसे उत्तर देण्यास सज्ज : रोहित

By admin | Updated: January 9, 2016 03:27 IST

भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने उभय संघांदरम्यान पुन्हा एकदा कडवी झुंज

पर्थ : भारत आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने उभय संघांदरम्यान पुन्हा एकदा कडवी झुंज अनुभवाला मिळणार आहे. या मालिकेत जशास तसे उत्तर देण्यास सज्ज असल्याचे भारतीय फलंदाज रोहित शर्माने म्हटले आहे. पाच वन-डे आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेला १२ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. आॅस्ट्रेलियाने यापूर्वीच्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला तर भारताला कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करताना विशेष अडचण भासली नाही. रोहित म्हणाला, ‘‘आम्ही प्रतिस्पर्ध्यांना प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहोत. उभय संघ विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील.’’दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहज विजयाची नोंद केल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ताळमेळ जुळवताना अडचण भासणार नाही, असेही रोहित म्हणाला. रोहितने यापूर्वीच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले, की आम्ही यापूर्वी २०१४ मध्ये येथे मालिका खेळलो होतो. ती मालिका चुरशीची झाली होती. निकाल आमच्यासाठी अनुकूल नव्हता, पण आम्ही अखेरपर्यंत संघर्षपूर्ण खेळ केला होता. आम्ही त्या वेळी सकारात्मक खेळ केला होता, या वेळीही तसाच प्रयत्न राहील.सन २००८मध्ये सर्वप्रथम आॅस्ट्रेलिया दौरा करणाऱ्या रोहितने त्यानंतर दोनदा आॅस्ट्रेलिया दौरा केला. गेल्या वेळी २०१५मध्ये वन-डे विश्वकप स्पर्धेच्या निमित्ताने रोहित आॅस्ट्रेलियात होता. भारतीय संघ मालिका सुरू होण्यास विलंब असताना आॅस्ट्रेलियात डेरेदाखल झाला आहे. रोहित म्हणाला, ‘‘पहिल्या वन-डे लढतीच्या तयारीसाठी जवळजवळ आठवडाभराचा वेळ मिळाला आहे. यापूर्वी येथे खेळण्याचा अनुभव असल्यामुळे पर्थमधील वातावरणाची आम्हाला चांगली कल्पना आहे. (वृत्तसंस्था)