शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

आयपीएलसाठी वापरण्यात येणार पुनर्प्रक्रिया सांडपाणी, एमसीएची न्यायालयात माहिती

By admin | Updated: April 12, 2016 11:54 IST

आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएने न्यायालयात दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर आयपीएल सामने महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात यावेत मागणी करणा-या याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  (बीसीसीआय) मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञातत्र सादर करत आपली बाजू मांडली. आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएने न्यायालयात दिली आहे.
 
आरडब्ल्यूआयटीसीतर्फे करण्यात येणारा पाणीपुरवठा खेळपट्टींच्या वापरासाठी आम्हाला भरपूर होईल, यामुळे पिण्यायोग्य पाणी न वापरता पाणीप्रश्नाचा सामना करणं सोपं जाईल अशी बाजू एमसीएने मांडली आहे. मुंबई आणि पुण्यात आयपीएलच्या होणा-या 17 सामन्यांमध्ये पुनर्प्रक्रिया करण्यात आलेल्या सांडपाण्याचा वापर करण्यात येईल अशी माहिती बीसीसीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे.
 
तसंच किंग्ज इलेव्हन पंजाब आपले 3 सामने जे नागपूरमध्ये खेळण्यात येणार आहेत ते मोहालीला हलवण्यास तयार असल्याचंही वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे. एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी आरडब्ल्यूआयटीसीला विनंती करत महालक्ष्मी रेस कोर्सवर असणा-या सांडपाणी प्रक्रिया प्लांटमधील पाणीपुरवठा आयपीएल सामन्यांसाठी करण्याची विनंती केली होती. आरडब्ल्यूआयटीसीतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धां संपल्या आहे.पाण्याचा वापर ते रेसट्रॅकची देखभाल करण्यासाठी वापरतात. पवारांनी केलेली विनंती  आरडब्ल्यूआयटीसीने स्विकारली आहे त्यामुळे एमसीएला दिलासा मिळाला आहे.