शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएलसाठी वापरण्यात येणार पुनर्प्रक्रिया सांडपाणी, एमसीएची न्यायालयात माहिती

By admin | Updated: April 12, 2016 11:54 IST

आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएने न्यायालयात दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर आयपीएल सामने महाराष्ट्रातून बाहेर नेण्यात यावेत मागणी करणा-या याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  (बीसीसीआय) मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञातत्र सादर करत आपली बाजू मांडली. आयपीएल सामन्यांसाठी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या (आरडब्ल्यूआयटीसी) पुनर्प्रक्रिया सांडपाण्याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती एमसीएने न्यायालयात दिली आहे.
 
आरडब्ल्यूआयटीसीतर्फे करण्यात येणारा पाणीपुरवठा खेळपट्टींच्या वापरासाठी आम्हाला भरपूर होईल, यामुळे पिण्यायोग्य पाणी न वापरता पाणीप्रश्नाचा सामना करणं सोपं जाईल अशी बाजू एमसीएने मांडली आहे. मुंबई आणि पुण्यात आयपीएलच्या होणा-या 17 सामन्यांमध्ये पुनर्प्रक्रिया करण्यात आलेल्या सांडपाण्याचा वापर करण्यात येईल अशी माहिती बीसीसीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे.
 
तसंच किंग्ज इलेव्हन पंजाब आपले 3 सामने जे नागपूरमध्ये खेळण्यात येणार आहेत ते मोहालीला हलवण्यास तयार असल्याचंही वकिलांनी न्यायालयात सांगितलं आहे. एमसीए अध्यक्ष शरद पवार यांनी आरडब्ल्यूआयटीसीला विनंती करत महालक्ष्मी रेस कोर्सवर असणा-या सांडपाणी प्रक्रिया प्लांटमधील पाणीपुरवठा आयपीएल सामन्यांसाठी करण्याची विनंती केली होती. आरडब्ल्यूआयटीसीतर्फे घेण्यात येणा-या स्पर्धां संपल्या आहे.पाण्याचा वापर ते रेसट्रॅकची देखभाल करण्यासाठी वापरतात. पवारांनी केलेली विनंती  आरडब्ल्यूआयटीसीने स्विकारली आहे त्यामुळे एमसीएला दिलासा मिळाला आहे.