शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आरसीबीला विजयाचे समाधान

By admin | Updated: May 15, 2017 07:04 IST

अखेरच्या सामन्यातही विराट सेना अपेक्षित खेळ करू शकली नसली, तरी दिल्ली डेअरडेविल्सवर विजय मिळवल्याचे समाधान मात्र विराट कोहलीला नक्कीच मिळाले असेल.

आकाश नेवे /आॅनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 15 - अखेरच्या सामन्यातही विराट सेना अपेक्षित खेळ करू शकली नसली, तरी दिल्ली डेअरडेविल्सवर विजय मिळवल्याचे समाधान मात्र विराट कोहलीला नक्कीच मिळाले असेल. कोहलीने दिल्लीच्या चाहत्यांची निराशा केली नाही, कोटलाचे मैदान हे कोहलीचे होमग्राऊंड आहे. त्याने या खेळपट्टीवर आज दमदार खेळी केली. त्याच खेळीच्या बळावर आरसीबीने १६१ धावा केल्या आणि पवन नेगी, हर्षल पटेल यांच्या सुरेख गोलंदाजीने दिल्लीवर विजय मिळवला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी कोहलीला गवसलेला सूर हे सामन्यात महत्त्वाचे ठरले. त्याने ४५ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. तीन षटकार आणि तीन चौकारलगावत केलेल्या या खेळीला विशेष महत्त्व आहे. या सामन्याचा आयपीएल गुणतालिकेवर कोणताही फरक पडणार नसला, तरी चाहत्यांनी विराट कोहलीची खेळी पाहण्याची स्टेडियममध्ये चांगलीच गर्दी केली होती. त्यांना पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलेला विराट बघायला मिळाला. कोहली आणि गेल बाद झाल्यावर आरसीबीच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा हाराकिरी केली. ट्रॅव्हिस हेड आणि केदार जाधव, तर ताळमेळ नसल्यानेच धाव बाद झाले.त्यामुळे आरसीबीची धावसंख्या मर्यादित राहिली. अनुभवी जहीर खान याने कोहलीची खेळी संपुष्टात आणली. दिल्लीची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. पदार्पण करणाऱ्या आवेश खान याने संजू सॅमसनला बाद केले. मात्र करुण नायर, श्रेयस अय्यर आणि ऋषभपंतने दिल्लीचा डाव सांभाळला. मोहंमद शमी याने आरसीबीच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना ९ चेंडूत २१ धावा केल्या. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. आरसीबी गुणतक्त्यात तळाच्या स्थानावर आहे. आतापर्यंत स्पर्धेत फक्त तीनसामन्यांत विजय मिळवता आला. मात्र स्पर्धेचा निरोप घेताना किमान अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्याचे समाधान आरसीबीला असेल.