शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

रवींद्र जडेजा आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये अव्वल

By admin | Published: March 21, 2017 1:12 PM

रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजा आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज रवींद्र जडेजा आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. जडेजाने आर अश्विनला मागे टाकत अव्वलस्थान पटकावलं आहे. रवींद्र जाडेजाने सात अंक मिळवत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. आयसीसी टेस्ट रँकिंमगध्ये श्रीलंकेचा रंगना हेराथ तिस-या स्थानावर आहे. त्यानंतर अमुक्रमे ऑस्ट्रेलियाचा जॉश हेजलवुड आणि इंग्लंडचा जेम्स एंडरसन आहेत.
 
रांची कसोटी सामन्याआधी आर अश्विन आणि रवींद्र जडेजाच्या नावे 892 अंक होते. रांची कसोटीत एकीकडे इतर गोलंदाज विकेट घेण्यासाठी संघर्ष करत असताना रवींद्र जडेजाने मात्र आपल्या प्रदर्शनाने सर्वांना प्रभावित केलं. जाडेजाने रांची कसोटीत पहिल्या सत्रात पाच विकेट्स घेतले तर दुस-या सत्रात चार विकेट्स आपल्या नावे केल्या. भारताने पहिल्या सत्रात 152 धावांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटी हा सामना अनिर्णितच राहिला. 
 
तिस-या कसोटी सामन्यात नऊ विकेट्स घेण्यासोबतच एकूण 21 विकेट्स घेत जडेजा मालिकेतही आघाडीवर आहे. पहिल्या सत्रात पाच आणि दुस-या सत्रात चार विकेट्स घेत जडेजाने एकूण सात अंक कमावले आहेत. भारतीय गोलंदाज बिशन बेदी आणि आर अश्विन यांच्यानंतर अव्वलस्थान पटकवण्याचा पराक्रम करणारा जडेजा तिसरा गोलंदाज आहे. 
 
जडेजाकडे सध्या 899 अंक असून आर अश्विनच्या 900 अंकांच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून फक्त एक अंक दूर आहे. आऱ अश्विनकडे एकूण 904 अंक होते, मात्र रांचीत फक्त दोन विकेट्स मिळाल्याने 37 अंकाची घसरण झाली होती. 
 
ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या लढवय्या बाण्यापुढे रांची सामन्यात भारतीय गोलंदाजांना कसलीच कमाल करता आली नाही. स्टीव्ह स्मिथ अँड कंपनीने सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून मालिकेत रंगत कायम ठेवली. भारताने पहिला डाव ९ बाद ६०३ धावसंख्येवर घोषित केल्यानंतर रविवारी दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात २ बाद २३ अशी अवस्था झाली होती. आज त्यापुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ६ बाद २०४ धावांची मजल मारली असता, उभय कर्णधारांनी सामना अनिर्णीत संपल्याचे मान्य केले.
 
ऑस्ट्रेलियातर्फे पीटर हँड्सकोंब व शॉन मार्श यांनी निर्णायक भूमिका बजावली. हँड्सकोंब ७२ धावा काढून नाबाद राहिला, तर मार्शने ५३ धावांची खेळी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
 
त्याआधी, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (२१) व मॅट रेनशॉ (१५) यांना मोठी खेळी करता आली नाही. भारतातर्फे पुन्हा एकदा रवींद्र जडेजाने अचूक मारा करताना ५४ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. दुसऱ्या बाजूचा विचार करता ऑस्ट्रेलियातर्फे हँड्सकोंब २०० चेंडू खेळून नाबाद राहिला.
 
उपाहारापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा धोकादायक भासत होता; पण ऑस्ट्रेलियाने अखेरच्या दोन सत्रांत संयमी खेळी करून सामना अनिर्णीत राखला. मालिका आता १-१ ने बरोबरीत असून २५ मार्चपासून धरमशाला येथे चौथा व अखेरचा कसोटी सामना खेळला जाईल.