शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रवी शास्त्रींची आता भरत अरुण यांच्यासाठी ‘फिल्डिंग’

By admin | Updated: July 14, 2017 00:55 IST

टीम इंडियाचे नवनियुक्त कोच रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत.

नवी दिल्ली : टीम इंडियाचे नवनियुक्त कोच रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत. झहीर खान गोलंदाजी कोच असतानादेखील शास्त्रींनी निकटवर्तीय भरत अरुण यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.गोलंदाजी कोच म्हणून शास्त्री यांची पसंती अरुण यांनाच होती. पण सीएसीने झहीरच्या नावाला संमती दिली. याचा अर्थ गोलंदाजी कोचची नेमणूक करतेवेळी सीएसीने शास्त्री यांना विश्वासात घेतले नसावे. पूर्णकालीन कोच म्हणून संघाला २५० दिवस देण्याची अट आहे. झहीर इतका वेळ देऊ शकणार नाही, असे कळते. झहीर १०० दिवसांच्या वर उपलब्ध राहणार नाही. इतकेच नव्हे तर झहीरच्या वेतनाचे पॅकेज अद्याप निश्चित झाले नाही. शास्त्री यांना गोलंदाजी कोचचे नाव विचारले असता त्यांनी अरुण यांचेच नाव घेतले होते. तथापि, सीएसी सदस्य सौरव गांगुली यांनी झहीरचे नाव सुचविले. यावर शास्त्री म्हणाले, ‘मग मला जेसन गिलेस्पी द्या.’ गिलेस्पी हा सध्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कोच मानला जातो. गिलेस्पीने आधीच पापुआ न्यूगिनी संघासोबत करार केला असल्याने बीसीसीआय गिलेस्पीचे नाव मान्य करणार नाही, याची जाणीव शास्त्रींना होती. बीसीसीआयने व्यंकटेश प्रसाद यांचे नावदेखील राखीव म्हणून ठेवले होते. शास्त्री मात्र अरुण यांच्याशिवाय अन्य कुणाचे नाव ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच. मागच्या कार्यकाळादरम्यान प्रसाद यांच्याबद्दल काही तक्रारी होत्या. त्यांनी वेगवान गोलंदाजांना मध्यमगती गोलंदाजीकडे वळविल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्री याच आठवड्यात पदाधिकारी आणि सीओए सदस्यांची भेट घेतील. शास्त्री हे झहीर खानचा आदर करतात, पण संघासाठी पूर्णकालीन गोलंदाजी कोच असावा, असे त्यांना वाटते. झहीर गोलंदाजांसाठी ‘रोडमॅप’ तयार करेल तर अरुण त्यावर अंमलबजावणी करतील. लंका दौऱ्यासाठी अरुण संघासोबत असावे, हे सांगण्यासाठीच शास्त्रींनी भेटीगाठी सत्र सुरू केले आहे. अरुण यांना स्टाफमध्ये स्थान देण्यात शास्त्री यशस्वी ठरल्यास विरोधी सौरभ गांगुलीवर त्यांचा मोठा विजय ठरणार आहे. अरुण हे २०१४ पासून गोलंदाजी कोच होते. २०१६ ला शास्त्री यांना बाहेर करेपर्यंत ते संघासोबतच होते. अरुण यांची खेळाडू म्हणून कारकीर्द फारशी गाजली नाही; पण उत्कृष्ट अकादमी कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वेगवान माऱ्यासंदर्भात त्यांचा चांगला अभ्यास आहे. शास्त्री आणि अरुण हे १९८० च्या दशकात १९ वर्षांखालील संघांपासून घनिष्ट मित्र आहेत. शास्त्री यांच्या शिफारशीवरुन तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अरुण यांना सिनियर संघाचे गोलंदाजी कोच बनविले. त्या वेळी अरुण हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजी सल्लागार पदावर कार्यरत होते. (वृत्तसंस्था)