शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

रवी शास्त्रींची आता भरत अरुण यांच्यासाठी ‘फिल्डिंग’

By admin | Updated: July 14, 2017 00:55 IST

टीम इंडियाचे नवनियुक्त कोच रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत.

नवी दिल्ली : टीम इंडियाचे नवनियुक्त कोच रवी शास्त्री हे आता स्वत:च्या पसंतीच्या लोकांना सहयोगी स्टाफमध्ये ठेवण्यास आग्रही आहेत. झहीर खान गोलंदाजी कोच असतानादेखील शास्त्रींनी निकटवर्तीय भरत अरुण यांच्यासाठी फिल्डिंग लावली आहे.गोलंदाजी कोच म्हणून शास्त्री यांची पसंती अरुण यांनाच होती. पण सीएसीने झहीरच्या नावाला संमती दिली. याचा अर्थ गोलंदाजी कोचची नेमणूक करतेवेळी सीएसीने शास्त्री यांना विश्वासात घेतले नसावे. पूर्णकालीन कोच म्हणून संघाला २५० दिवस देण्याची अट आहे. झहीर इतका वेळ देऊ शकणार नाही, असे कळते. झहीर १०० दिवसांच्या वर उपलब्ध राहणार नाही. इतकेच नव्हे तर झहीरच्या वेतनाचे पॅकेज अद्याप निश्चित झाले नाही. शास्त्री यांना गोलंदाजी कोचचे नाव विचारले असता त्यांनी अरुण यांचेच नाव घेतले होते. तथापि, सीएसी सदस्य सौरव गांगुली यांनी झहीरचे नाव सुचविले. यावर शास्त्री म्हणाले, ‘मग मला जेसन गिलेस्पी द्या.’ गिलेस्पी हा सध्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजी कोच मानला जातो. गिलेस्पीने आधीच पापुआ न्यूगिनी संघासोबत करार केला असल्याने बीसीसीआय गिलेस्पीचे नाव मान्य करणार नाही, याची जाणीव शास्त्रींना होती. बीसीसीआयने व्यंकटेश प्रसाद यांचे नावदेखील राखीव म्हणून ठेवले होते. शास्त्री मात्र अरुण यांच्याशिवाय अन्य कुणाचे नाव ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हतेच. मागच्या कार्यकाळादरम्यान प्रसाद यांच्याबद्दल काही तक्रारी होत्या. त्यांनी वेगवान गोलंदाजांना मध्यमगती गोलंदाजीकडे वळविल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्री याच आठवड्यात पदाधिकारी आणि सीओए सदस्यांची भेट घेतील. शास्त्री हे झहीर खानचा आदर करतात, पण संघासाठी पूर्णकालीन गोलंदाजी कोच असावा, असे त्यांना वाटते. झहीर गोलंदाजांसाठी ‘रोडमॅप’ तयार करेल तर अरुण त्यावर अंमलबजावणी करतील. लंका दौऱ्यासाठी अरुण संघासोबत असावे, हे सांगण्यासाठीच शास्त्रींनी भेटीगाठी सत्र सुरू केले आहे. अरुण यांना स्टाफमध्ये स्थान देण्यात शास्त्री यशस्वी ठरल्यास विरोधी सौरभ गांगुलीवर त्यांचा मोठा विजय ठरणार आहे. अरुण हे २०१४ पासून गोलंदाजी कोच होते. २०१६ ला शास्त्री यांना बाहेर करेपर्यंत ते संघासोबतच होते. अरुण यांची खेळाडू म्हणून कारकीर्द फारशी गाजली नाही; पण उत्कृष्ट अकादमी कोच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वेगवान माऱ्यासंदर्भात त्यांचा चांगला अभ्यास आहे. शास्त्री आणि अरुण हे १९८० च्या दशकात १९ वर्षांखालील संघांपासून घनिष्ट मित्र आहेत. शास्त्री यांच्या शिफारशीवरुन तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी अरुण यांना सिनियर संघाचे गोलंदाजी कोच बनविले. त्या वेळी अरुण हे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गोलंदाजी सल्लागार पदावर कार्यरत होते. (वृत्तसंस्था)