शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

रहाणेने तारले, चौथी कसोटी अनिर्णीत

By admin | Updated: January 10, 2015 12:31 IST

अजिंक्य रहाणेने टिच्चून केलेल्या ३८ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णीत राखण्यात भारताला यश मिळाले आहे.

ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. १० - अजिंक्य रहाणेने टिच्चून केलेल्या ३८ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णीत राखण्यात भारताला यश मिळाले आहे. रहाणेने भुवनेश्वर कुमारसह केलेल्या ७० चेंडूत ३५ धावांच्या भागीदारीमुळे भारताने पाचव्या दिवसाखेर ८९.५ षटकांत ७ गडी गमावत २५२ धावा केल्या आणि  अखेर ही कसोटी अनिर्णीत राहिली. 
ऑस्ट्रेलियाच्या ३४९ धावांचा पाठलाग करताना मुरली विजय (८०) आणि विराट कोहली (४६) यांनी चांगली खेळी करत भारताला विजयाच्या आशा दाखवल्या होत्या, पण इतर फलंदाजांनी टिकाव न धरल्याने भारत ही कसोटी गमवायच्या बेतात होता. मात्र अजिंक्य रहाणेने सावध खेळ करत ८८ चेंडूत ३८ धावा केल्या आणि ही कसोटी अनिर्णीत राखली. भारत २-० अशी मालिका हरला असला तरी शेवटच्या दोन कसोटी अनिर्णीत राखल्यामुळे भारताची काही प्रमाणात लाज राखली गेली आहे. 
चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात शानदार शतकी खेळी करणारा के.एल.राहुल (१६) व रोहित शर्मा (३९ ) हे भरवशाचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर मुरली विजयने कोहलीसह भारताच्या डावाला आकार दिला. मात्र ८० धावांवर खेळताना विजय हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर रैना (०) आणि सहा (०) हे दोघे भोपळाही न फोडता बाद झाले. विराट कोहली मैदानावर असल्याने भारताच्या जिंकण्याच्या आशा कायम होत्या. मात्र अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वीच तो ४६ धावांवर बाद झाला आणि भारताची अवस्था बिकट झाली. अखेर रहाणेने टिकाव धरल्याने भारताने पाचव्या व अंतिम दिवसाचा डाव संपताना ७ गडी गमावत २५२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्क, लियॉन आणि हेझलवूडने प्रत्येकी २ तर वॉटसनने १ बळी टिपला.