शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
3
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
4
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
5
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
6
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
7
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
8
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
9
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
12
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
13
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
14
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
15
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
16
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
17
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
18
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
19
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
20
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

दबाव भारतावर आहे

By admin | Updated: March 14, 2017 00:52 IST

आॅस्टे्रलिया संघाचा आत्मविश्वास कमी झालेला नसून संघात जोष कायम आहे. सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतावर दबाव असून पहिल्या दोन सामन्यांत आमच्या संघाने चांगली झुंजार कामगिरी केली

रांची : ‘आॅस्टे्रलिया संघाचा आत्मविश्वास कमी झालेला नसून संघात जोष कायम आहे. सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतावर दबाव असून पहिल्या दोन सामन्यांत आमच्या संघाने चांगली झुंजार कामगिरी केली,’ असे वक्तव्य आॅस्टे्रलियाचा हुकमी फिरकी गोलंदाज नॅथन लिआॅन याने केले.भारत-आॅस्टे्रलिया कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीमध्ये असून आगामी १६ मार्चला रांची येथे होणाऱ्या सामन्यात बाजी मारून निर्णायक आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. मालिकेतील अखेरचा कसोटी सामना धर्मशाळा येथे खेळविण्यात येईल. सोमवारी आॅस्टे्रलिया संघ बंगळुरू येथून रांची येथे रवाना झाला. एका आॅस्टे्रलियन प्रसारमाध्यमाशी बोलताना लिआॅनने म्हटले, ‘‘संघात जबरदस्त आत्मविश्वास भरलेला आहे. भारतात येण्याचे सोडूनच द्या. परंतु, विमान पकडण्यापूर्वी आणि दुबईला पोहोचण्यापूर्वीच अनेक जणांनी आम्हाला गृहीत धरले होते. आम्ही या मालिकेचा चषक जिंकण्यापासून केवळ एक विजयाने दूर आहोत आणि आम्ही हेच साध्य करण्यासाठी येथे आलेलो आहोत.’’ मालिकेत यजमानांवर दबाव असल्याचे सांगताना लिआॅन म्हणाला, ‘‘मालिकेमध्ये दबाव भारतीय संघावर असून आमच्यावर काहीच दबाव नाही. सर्वांनीच आमचा पराभव ४-० असा होईल, असे भाकीत केले होते. आमचा संघ चांगला नाही, ते युवा असून सध्या शिकत आहेत. मात्र, सर्वोत्तम संघांना जगात कुठेही नमवण्याचा विश्वास आम्हाला होता.’’ (वृत्तसंस्था)जखमी असूनही खेळणार...दुसऱ्या कसोटीदरम्यान हाताच्या बोटाच्या चामडीला दुखापत झाली असूनही आॅसीचा अव्वल फिरकीपटू असलेला नॅथन लिआॅनला तिसऱ्या कसोटीसाठी अंतिम संघात स्थान मिळण्याची आशा आहे. ज्या बोटाने आॅफस्पिनर चेंडू वळवतात, लिआॅनच्या त्याच बोटाच्या चामडीला दुखापत झाली आहे. याबाबत लिआॅन म्हणाला, ‘‘या गरमीच्या दिवसांमध्ये मी खूप गोलंदाजी केली आहे आणि वर्षातून असे १-२ वेळा होते. माझ्या बोटाची केवळ चामडी फाटली आहे. काही वेळासाठी खूप वेदना होत होत्या.’’ लिआॅन म्हणाला, ‘‘अशा परिस्थितीमध्ये मी टेप लावून गोलंदाजी करू शकत नव्हतो. कारण, टेप लावून गोलंदाजी न करण्याबाबत नियम आहेत. त्यामुळे याविषयी मी विचारही करीत नव्हतो.’’त्याचबरोबर, ‘‘२०१३ च्या भारत दौऱ्यामध्येही तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मला अशीच दुखापत झाली होती. मात्र तरीही तीन दिवसांनंतर मी खेळण्यात यशस्वी झालो होतो. त्यामुळेच, मला रांची येथील कसोटी सामना खेळण्यास मिळेल, अशी आशा आहे,’’ असेही लिआॅनने म्हटले.