शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

राष्ट्रपतींच्या हस्ते शानदार सोहळ्यात खेळाडूंचा गौरव, झझारिया, सरदारसिंग यांना ‘खेलरत्न’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 04:36 IST

रिओ पॅरालिम्पिकचा सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया आणि हॉकीस्टार सरदारसिंग यांना मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली : रिओ पॅरालिम्पिकचा सुवर्णविजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया आणि हॉकीस्टार सरदारसिंग यांना मंगळवारी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती भवनात आयोजित शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत देशाचा गौरव वाढविणारे खेळाडू, कोचेस, मार्गदर्शकांचा अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.२००४ च्या अथेन्स तसेच मागच्या वर्षीच्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये झझारियाने सुवर्णपदक जिंकले. सरदारसिंगच्या नेतृत्वात भारताने अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या दोघांच्या कर्तृत्वाचा गौरव म्हणून यंदा दोघांना संयुक्तपणे प्रत्येकी साडेसात लाख रोख, प्रशस्तिपत्र व खेलरत्न पदक देण्यात आले.हा पुरस्कार मिळविणारा देशाचा पहिला दिव्यांग खेळाडू असलेल्या झझारियाने दोन्ही सुवर्णपदके मिळविताना विश्वविक्रमाची नोंद केली होती. याशिवाय २०१३ च्या विश्व पॅराअ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले.वयाच्या २२ व्या वर्षी २००८ मध्ये सुल्तान अझलन शाह हॉकी स्पर्धा जिंकून देणारा सरदार हा सर्वांत तरुण कर्णधार ठरला होता. याशिवाय दोन आशियाई पदके जिंकून दिल्याबद्दल याआधी त्याचा ‘पद्मश्री’ देऊन गौरव करण्यात आला आहे. आजच्या सोहळ्यात ज्या १७ जणांना अर्जुन पुरस्कार देण्यात आले, त्यापैकी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा उपस्थित नव्हता. तो सध्या इंग्लंडमध्ये कौंटी खेळण्यात व्यस्त आहे. (वृत्तसंस्था)हा सन्मान भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देईल. १२ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. आॅलिम्पिक उपांत्यपूर्व सामना गमविल्यानंतर हॉकी सोडून देण्याचे मनात आले होते. पण हॉकीशी माझे नाते अतूट आहे. हा पुरस्कार सहकारी खेळाडू, कोचेस, हॉकी इंडिया आणि माझ्या कुटुंबाला समर्पित करतो. संकटाच्या काळात सर्वांची मला साथ लाभली. सर्वांच्या सहकार्याशिवाय मजल गाठता आली नसती.- सरदारसिंगपाच कोटी दिव्यांगांनापुरस्कार समर्पित : झझारियापॅरालिम्पिक खेळांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी हा पुरस्कार देशातील पाच कोटी दिव्यांग खेळाडू, आई आणि मुलगी यांना समर्पित करतो. या पुरस्कारामुळे पॅरा खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. भारतीय क्रीडा प्राधिकरणासह देशातील राज्य शासनांनी दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे मी आवाहन करतो. पॅरा खेळासाठी देशात क्रीडा अकादमीची निर्मिती व्हावी. शिवाय अकादमीचे सूत्रसंचालन माजी पॅरा खेळाडूंकडेच द्यायला हवे.पुरस्कार विजेतेराजीव गांधी खेलरत्न : देवेंद्र झझारिया (पॅराअ‍ॅथलिट), सरदारसिंग (हॉकी).अर्जुन पुरस्कार : व्ही. जे. सुरेखा (तिरंदाजी), खुशबीर कौर (अ‍ॅथलेटिक्स), आरोकिन राजीव (अ‍ॅथलेटिक्स), प्रशांतीसिंग (बास्केटबॉल), एल. देवेंद्रोसिंग (बॉक्सिंग), चेतेश्वर पुजारा (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (क्रिकेट), ओयनाम बेमबेम (फुटबॉल), एसएसपी चौरसिया (गोल्फ), एस. व्ही. सुनील (हॉकी), जसवीरसिंग (कबड्डी), पी. एन. प्रकाश (नेमबाजी), अ‍ॅन्थोनी अंमलराज (टेबल टेनिस), साकेत मिनेनी (टेनिस), सत्यव्रत कादियाना (कुस्ती), मरियप्पन थंगावेलू (पॅराअ‍ॅथलिट) आणि वरुण भाटी (पॅराअ‍ॅथलिट).द्रोणाचार्य पुरस्कार : दिवंगत डॉ. आर. गांधी (अ‍ॅथलेटिक्स), जीएसएसव्ही प्रसाद (बॅडमिंटन), बृजभूषण मोहंती (बॉक्सिंग), पी. ए. राफेल (हॉकी), संजय चक्रवर्ती (नेमबाजी), रोशन लाल (कुस्ती)ध्यानचंद पुरस्कार : भूपेंदरसिंग (अ‍ॅथलेटिक्स ), सय्यद शाहिद हकीम (फुटबॉल), सुमराई टेटे (हॉकी).वादाची परंपरा कायम...सर्वाधिक टाळ्या पडल्या त्या दिव्यांग क्रीडा पुरस्कार विजेत्यांसाठी. एक खेलरत्नसह तीन पुरस्कार यंदा दिव्यांगांना मिळाले.अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रोख, प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले.यंदाचे क्रीडा पुरस्कारदेखील वादग्रस्त ठरले. द्रोणाचार्यच्या यादीतून क्रीडा मंत्रालयाने पॅरालिम्पियन कोच सत्यनारायण आणि कबड्डी कोच हिरानंद कटारिया यांची नावे वगळली. पुलेला गोपीचंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने दोन्ही नावांची शिफारस केली होती.सत्यनारायण यांच्यावर गुन्हा दाखल असून, कटारिया यांचा कबड्डीशी सुतराम संबंध नाही. पुरस्कारासाठी नाव नसल्याने वेटलिफ्टर संजिता चानू व बास्केटबॉलपटू ए. अनिता यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती.सरकारने या प्रकरणी फेरविचार करण्याचा शब्द दिला आहे. सहा कोचेसना द्रोणाचार्य तसेच तीन माजी खेळाडूंना ध्यानचंद जीवनगौरव देण्यात आला.

टॅग्स :GovernmentसरकारIndiaभारतCricketक्रिकेट