शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

कोरोनानंतरची स्थिती भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी लाभदायी ठरेल - अभिनव बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 00:54 IST

अभिनवच्या मते विदेश दौरे होणार नसल्यामुळे स्थानिक पायाभूत सुविधा उभारणी, कोचेस तसेच सहयोगी स्टाफ यांसारख्या मनुष्यबळ विस्तारावर भर देण्याची संधी निर्माण होणार आहे.

नवी दिल्ली : कोरोनानंतरची स्थिती भारतीय क्रीडाविश्वासाठी फारच लाभदायी ठरणार असल्याचा आशावाद ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केला आहे. अभिनवच्या मते विदेश दौरे होणार नसल्यामुळे स्थानिक पायाभूत सुविधा उभारणी, कोचेस तसेच सहयोगी स्टाफ यांसारख्या मनुष्यबळ विस्तारावर भर देण्याची संधी निर्माण होणार आहे.कोरोना संपल्यानंतर भारतीय खेळांकडे तू कुठल्या दृष्टिकोनातून बघतोस, अशा आशयाचा प्रश्न अभिनवला विचारण्यात आला होता. क्रीडा प्रशासकांसाठी वैकल्पिक कौशल्य विकास कार्यक्रम तयार करण्यात यावा, असे सांगून अभिनव पुढे म्हणाला, ‘या कार्यक्रमामुळे खेळाडूृंसाठी दीर्घकालिन योजना अमलात येऊ शकतील. खेळात करिअर बनवू इच्छिणारे अपयशी ठरल्यानंतर त्यांच्यासाठी पुढे काय, असा सवाल उपस्थित झाल्यास अशा खेळाडूंना पर्याय म्हणून करिअरच्या अनेक गोष्टी कायमस्वरूपी मिळू शकतात.’खेळाडू म्हणून स्वत:च्या अनुभवातील अनेक बाबींचा उलगडा करीत अभिनवने प्रतिभाशोध आणि विकास कार्यक्रमाला बळ देण्याचे आवाहन केले. खेलो इंडियातून उदयास आलेल्या खेळाडूंमध्ये एक टक्का उणीव राहू नये, यादृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे मत त्याने व्यक्त केले. (वृत्तसंस्था)‘कोरोनानंतर भारताच्या क्रीडाक्षेत्रासाठी वातावरण पूरक ठरणार आहे. अनेक विदेशी स्पर्धा आणि सराव शिबिरे होणार नसल्याने उपयुक्त पायाभूत सुविधा उभारण्याची भारताकडे संधी असेल. आम्हाला स्वत:चे कोचेस आणि सहयोगी स्टाफ तयार करण्याची गरज आहे.’