शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

खेळाडू ‘व्हर्च्युअली’ पुरस्काराने सन्मानित, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 03:44 IST

यंदा ७४ खेळाडूंची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यात पाच खेलरत्न व २७ अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ६० खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ११ केंद्रातून व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभागी झाले.

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कोविड-१९ महामारी कारणामुळे शनिवारी आॅनलाईन आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंना वार्षिक राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने गौरविले. हे खेळाडू अनेक शहरातून कार्यक्रमासाठी ‘लॉग इन’ झाले होते.यंदा ७४ खेळाडूंची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली होती. त्यात पाच खेलरत्न व २७ अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात ६० खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ११ केंद्रातून व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभागी झाले.क्रिकेटपटू रोहित शर्मा (खेलरत्न) व ईशांत शर्मा (अर्जुन पुरस्कार) यांना कार्यक्रमात सहभागी होता आले नाही. कारण ते इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सहभागी होण्यासाठी संयुक्त अरब अमिरातमध्ये आहेत; तर स्टार मल्ल विनेश फोगाट (खेलरत्न) व बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रंकीरेड्डी (अर्जुन पुरस्कार) यांना कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे त्यांना कार्यक्रमात सहभागी होता आले नाही.रोहित व विनेश यांच्याव्यतिरिक्त तीन अन्य खेलरत्न पुरस्कराचे मानकरी टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिक सुवर्णपदकविजेता मरियप्पन थांगवेलू आणि महिला हॉकी कर्णधार राणी रामपाल यांना गौरविण्यात आले. ते आॅनलाईन कार्यक्रमात सहभागी झाले होते.मनिका पुणे येथून तर थांगवेलू व राणी यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या बेंगळुरू केंद्रातून ‘लॉग इन’ केले. राष्ट्रपती कोविंद यांनी सहभागी झालेल्या पुरस्कार विजेत्यांची प्रशंसा केली. खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली व त्यांच्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रपती भवनमधील दरबाल हॉलची उणीव जाणवली. येथे दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. पुरस्काराच्या ४४ वर्षांच्या इतिहासात प्रथमच विजेते, पाहुणे व गणमान्य व्यक्ती दरबार हॉलमध्ये एकत्र आले नाही.राष्ट्रपती कोविंद यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि २०२८ लॉस एंजिलिस आॅलिम्पिकमध्ये भारताला अव्वल १० मध्ये स्थान पटकावून देण्याचे लक्ष्य गाठू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.एक तास चाललेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाले, ‘सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन. तुम्ही आपल्या कामगिरीने भारतीयांना अविस्मरणीय क्षण प्रदान केले. सामूहिक प्रयत्नांनी भारत एक क्रीडा महाशक्ती म्हणून पुढे येईल, असा मला विश्वास आहे. भारतात क्रीडा संस्कृती निर्माण होण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. जग सध्या महामारीमुळे प्रभावित झाले असले तरी खेळाडू या अनुभवातून मजबूत होतील, अशी आशा आहे.७४ जणांना पुरस्कार देण्याचे समर्थननवी दिल्ली: यंदा ७४ जणांना राष्टÑीय क्रीडा पुरस्कार देण्याच्या निर्णयाचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी समर्थन केले. निवड समितीने पाच जणांना खेलरत्न तसेच २७ जणांना अर्जुन पुरस्कारासाठी निवडताच सर्व स्तरातून टीका झाली होती. द्रोणाचार्यसाठी १३ आणि ध्यानचंदसाठी १५ कोचेस निवडण्यात आले आहेत. रिजिजू यांनी या निर्णयाचे समर्थन करीत,‘ आमच्या खेळाडूंची आंतरराष्टÑीय कामगिरी झाल्याने आम्ही त्यांचा गौरव केला. पुरस्कार दिला नसता तर युवा खेळाडूंमधील उत्साह कमी होण्याची भीती होती,’ असे सांगितले. ही नावे आम्ही नव्हे तर उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्र्तींच्या अध्यक्षतेखालील समितीने निवडली, या शब्दात त्यांनी आपल्या निर्णयार्थ पुष्टी जोडली.सलग चार वर्षांच्या कामगिरीच्या आधारे हे पुरस्कार दिले जातात,असेही ते म्हणाले.पुरस्कार रकमेत झाली भरघोस वाढयंदा राष्टÑीय पुरस्काराची रक्कम वाढविण्यात येत असल्याची घोषणा क्रीडामंत्र्यांनी केली. राजीव गांधी खेलरत्नसाठी आधी ७.५ लाख दिले जायचे. यंदापासून ही रक्कम २५ लाख करण्यात आली. अर्जुन पुरस्कारासाठी ५ लाख दिले जायचे. यात १५ लाख अशी भरघोस वाढ करण्यात आली आहे. द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारासाठी प्रत्येकी दहा लाख रुपये देण्यात येतील. याआधी २००८ मध्ये पुरस्कार रकमेत वाढ करण्यात आली होती. प्रत्येक दहा वर्षानंतर रकमेची समीक्षा होणे गरजेचे असल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :National Sports Dayराष्ट्रीय क्रीडा दिवसIndiaभारत