शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दडपण न घेता, बिनधास्त खेळा; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला ऑलिम्पिकपटूंशी संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 07:57 IST

Olympic : ऑलिम्पिकपटूंशी साधला पंतप्रधानांनी संवाद. एकत्र आईस्क्रीम खाण्याचं पी.व्ही. सिंधूला आश्वासन.

ठळक मुद्देऑलिम्पिकपटूंशी साधला पंतप्रधानांनी संवाद. एकत्र आईस्क्रीम खाण्याचं पी.व्ही. सिंधूला आश्वासन.

नवी दिल्ली : ‘शिस्त, समर्पणवृत्ती आणि निर्धार या  त्रिसूत्रीचा अंगिकार करुन खेळाला योग्य डावपेचांची जोड द्या,  विजय तुमचाच होईल,’अशा अश्वासक शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना मंगळवारी दिल्या. २३ जुलैपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिकआधी  मोदी यांनी भारतीय स्पर्धकांशी संवाद साधला.  त्यांनी १५ खेळाडूंशी चर्चा केली. यात मेरी कॉम, सानिया मिर्झा, दीपिका कुमार, प्रवीण जाधव, नीरज चोपडा यांचा समावेश होता. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक आणि कायदेमंत्री किरण रिजीजू उपस्थित होते.

ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धा प्रकारात भारतीय खेळाडू खेळताना दिसणार आहेत. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. भारताकडून यावेळी १२६ खेळाडू राहणार असून, आतापर्यंत स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंची ही सर्वाधिक संख्या आहे. 

मोदी यांनी सुरुवातीला तीरंदाज दीपिका कुमारी हिच्याशी संवाद साधला. “पॅरिसमधील विश्वचषकात सुवर्णपदक पटकावून तू नंबर एक झाली आहेस. तुझा प्रवास उल्लेखनीय आहे. लहानपणी तुला आंबे आवडत होते. मग तीरंदाजीला सुरुवात कधी केली?” असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. “मला यात सुरुवातीपासूनच आवड होती. मी धनुष्यापासून सुरुवात केली आणि हळूहळू आधुनिक धनुष्य हाती घेतले आणि पुढे गेली”, असे दीपिका कुमारीने सांगितले.  आशीष कुमार याच्याशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा उल्लेख केला. विश्वचषकादरम्यान सचिनच्या वडिलांचे देहावसान झाले होते, मात्र दु:खातून सावरत पुन्हा एकदा क्रिकेट खेळला. आशीषच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्याचे सांत्वन करीत   मोदी यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

बॉक्सर मेरीकोम हिच्याशी संवाद साधत तुझा आवडता खेळाडू कोण? असा प्रश्न तिला विचारला. यावर मेरीकोमने माझा आवडता खेळाडू मोहम्मद अली असल्याचे सांगितलं. तो माझ्यासाठी आदर्श आहे, असे मेरी म्हणाली. भालाफेकपटू नीरज चोप्रा याला मोदी यांनी मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले,‘ऑलिम्पिकमध्ये अपेक्षांच्या ओझ्याखाली राहण्याची गरज नाही. निर्भिडपणे खेळा  आणि पदक जिंका.’ मेरीकोम आणि हॉकी कर्णधार मनप्रीतसिंग भारताचे ध्वजवाहक राहतील. कुस्तीपटू बजरंग पुनिया हा समारोप सोहळ्याचा ध्वजवाहक असेल.

विजय मिळाल्यानंतर एकत्र आईस्क्रीम खाऊ मोदी यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणारी  बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्याशी संवाद साधला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर एकत्र आईस्क्रीम खाऊ, असे पंतप्रधान म्हणाले.  सिंधूला तिचे आई-वडील आईस्क्रीम खाऊ देत नाहीत, याचा उल्लेख करत मोदींनी हे आश्वासन दिले.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतJapanजपानBadmintonBadminton