शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

‘पीसीबीचा बीसीसीआयला ४८ तासांचा अल्टिमेटम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2015 23:26 IST

भारतासोबतच्या संभाव्य द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबतच्या सर्व आशा मावळल्या असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी जाहीर केले.

कराची : भारतासोबतच्या संभाव्य द्विपक्षीय क्रिकेट मालिकेबाबतच्या सर्व आशा मावळल्या असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी जाहीर केले. शहरयार म्हणाले, ‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आम्हाला शनिवारी सायंकाळपर्यंत कुठलेच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मालिकेबाबतच्या सर्व आशा संपुष्टात आल्या सारख्या आहेत. तरीही आम्ही बीसीसीआयला पत्र लिहून ४८ तासांत मालिकेविषयी निश्चित निर्णय द्यावा, असे कळविले आहे. याबाबत आम्ही सोमवारी अधिकृत घोषणा करणार आहोत.’ पीसीबी अध्यक्ष म्हणाले, ‘मालिकेचे आयोजन रद्द होण्यासाठी पाकिस्तानला कुठल्याच प्रकारे जबाबदार धरता येणार नाही. आम्ही हा मुद्दा आयसीसीपुढे मांडण्याचा विचार करीत आहोत.’भारत आणि पाकिस्तानने गेल्या वर्षी एका करारावर स्वाक्षरी केली होती. त्या करारानुसार उभय देशांदरम्यान २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा द्विपक्षीय मालिकांचे आयोजन करण्यात येणार होते. भारत सरकारतर्फे अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि शहरयार यांनी दुबईमध्ये आयसीसीच्या बैठकीदरम्यान द्विपक्षीय मालिका आयोजिण्यास सहमती दर्शविली होती, पण बीसीसीआयने मालिकेबाबतचा अंतिम निर्णय सरकारवर सोपवला होता.>> आम्ही भारतीय संघासोबत खेळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आयोजन स्थळ यूएईला वगळून श्रीलंका केले, पण आमचे सर्व प्रयत्न अखेर व्यर्थच ठरले. त्यामुळे जगातील लक्षावधी चाहत्यांचा हिरमोड झाला. गेल्यावर्षी आम्ही मालिकेबाबत बीसीसीआयसोबत करार केला होता. आम्ही आमच्यातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले.- शहरयार खान