शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

महाविद्यालयीन क्रीडा व्यवस्थेवर लक्ष द्या!, नेमबाज अभिनव बिंद्राने दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 05:22 IST

Abhinav Bindra : एका क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या बिंद्राने म्हटले की, ‘टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरली.

मुंबई : ‘महाविद्यालयीन स्तरावरील क्रीडा व्यवस्था अपेक्षेनुसार सुधारण्यात अद्याप आपल्याला यश आलेले नाही. यामुळे ज्युनिअर ते एलिट स्तरापर्यंत आपल्याला पुरेशी गुणवत्ता दिसून आली नाही,’ असे सांगतानाच भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने तीन वर्षात पुढील ऑलिम्पिक खेळणे कठीण ठरेल, असे मत व्यक्त केले.

एका क्रीडा संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या बिंद्राने म्हटले की, ‘टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिक ठरली. यामध्ये आपण आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना ७ पदके जिंकली. शानदार विजयांसोबतच काही निराशाजनक क्षणही आले. पण खेळामध्ये असे होतच असते. पुढील ऑलिम्पिक अधिक आव्हानात्मक ठरेल, कारण तयारीसाठी केवळ तीन वर्षांचा कालावधी आहे. साधारणपणे, ऑलिम्पिकनंतर खेळाडू एक वर्ष आराम करून तणाव घालवण्याचा प्रयत्न करतात. पण आता लगेच पुढील मोहिमेसाठी मैदानात यावे लागेल.’

- महाविद्यालयीन स्तरावर खेळांना अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे सांगताना बिंद्रा म्हणाला की, ‘देशभरात महाविद्यालयातील क्रीडा व्यवस्था अधिक सुधारावी लागेल. - अधिकाधिक स्पर्धात्मक उपक्रम राबवावे लागतील. योग्य व्यवस्थेच्या अभावामुळे आपण ज्युनियरपासून एलिट स्तरापर्यंतच्या अनेक गुणवत्तेला मुकलो आहोत.’