शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

व्हेंडिंग मशीनमध्ये क्वाईन टाकून मेडल मिळत नाही; मनूसह विनेश फोगाटवर व्यक्त झाला बिंद्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 15:21 IST

मनू भाकरचं कौतुक अन् विनेश फोगाटबद्दल सहानुभूती

ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतााचा पहिला गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्रा यांने पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. खास करून त्याने नेमबाज मनू भाकरचं तौंडभरून कौतुक केले आहे. याशिवाय तो विनेश फोगाट प्रकरणावरही बोलला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंकडून दुहेरी पदकाची अपेक्षा होती. पण टोकियोच्या तुलनेतही आपण यावेळी मागे राहिलो. 

अभिनव बिंद्रा समाधानी

पण अभिनव बिंद्राला मात्र आपण फार काही गमावलं आहे, असे वाटत नाही. भारतीय खेळाडू आणि स्पर्धेत मिळालेल्या पदकाबद्दल त्याने रोखठोक मत मांडले आहे. चौथ्या क्रमांकावर राहणं ही देखील एक उल्लेखनिय कामगिरीच आहे, असे तो म्हणाला आहे. मनू भाकरचं त्याने खास कौतुक केले. एका ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं कमावणं खूप मोठी गोष्ट आहे, असे म्हणत त्याने युवा महिला नेमबाजावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला.

विनेश फोगाट प्रकरणासंदर्भात काय म्हणाला अभिनव बिंद्रा

'आजतक'ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये त्याने विनेश फोगाट हिच्यासंदर्भातील अपात्रतेच्या मुद्यावरही भाष्य केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडून सकारात्मक निकालाची आशा आहे, असेही तो म्हणाला. खेळ हा नियमानुसार खेळला जातो. जे प्रकरण घडलं अनपेक्षित होते. संबंधित प्रकरणानंतर विनेशची भेट घेतली. तिच्याप्रती सहानुभूती आहे, ही गोष्टही  अभिनव बिंद्नानं सांगितली. 

व्हेंडिंग मशीनमध्ये क्वाईन टाकून मेडल मिळत नाही 

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अनेक भारतीय खेळाडू अगदी पदकाच्या उंबरठ्यावर जाऊन पराभूत झाले. यासंदर्भात अभिनव बिंद्रा म्हणाला की, "व्हेडिंग मशीमध्ये क्वाईन टाकून मेडल मिळत नाही. हे एक मोठ चॅलेंज असते. एकूण १० हजार खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतात. यातील फक्त ३०० खेळाडूंना सुवर्ण पदक मिळवतात. त्यामुळे ही स्पर्धा गाजवण्यासाठी कठोर मेहनतीसह तुमच्या नशीबाचीही साथ मिळावी लागते." काय मिळवलं काय गमावलं याची दोन दिवस चर्चा होईल. त्यानंतर सर्व विसरून एंजिल्स येथे होणाऱ्या आगामी ऑलिम्पिकवर स्पर्धेवर फोकस होईल जे २०२८ मध्ये होणार आहे, असे  अभिनव बिंद्रानं म्हटले आहे. ऑलम्पिकमध्ये भारताला कमी पदकं मिळाली, असा युक्तीवाद करणाऱ्यांवर त्याने नाव न घेता निशाणा साधल्याचे दिसते. 

वैयक्तिक इवेंटमध्ये गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय अभिनव बिंद्रानं २००८ मध्ये बीजिंग येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत सुवर्ण कामगिरी करून दाखवली होती. वैयक्तिक इवेंटमध्ये सुवर्ण पटकणारा भारताचा तो पहिला खेळाडूही ठरला होता. त्यानंतर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक  स्पर्धेत तो चौथ्या स्थानावर राहिला होता. त्याचे पदक एका क्रमांकामुळे हुकलं होते.