शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता गोलंदाजांसाठी नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 03:37 IST

गोलंदाज जर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी कुण्या शहराची निवड करणार असतील तर ते शहर आहे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघाचे गृहशहर कोलकाता.

गोलंदाज जर आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी कुण्या शहराची निवड करणार असतील तर ते शहर आहे गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील केकेआर संघाचे गृहशहर कोलकाता. विशेषत: फिरकीपटूंसाठी येथील खेळपट्टी नंदनवन आहे. आमच्यावर मोजकेच लोक विश्वास करतात, पण गंभीर मात्र आपले भविष्य आमच्या हातात सोपवितो, असे फिरकीपटूंचे मत असावे, असे वाटते. दुसरी व्यक्ती आम्हाला अधिक महत्त्व देत नसताना गंभीर मात्र आमच्यासाठी ‘रेड कार्पेट’ टाकतो. अन्य व्यक्ती आमच्याकडे पाहुणे कलाकार म्हणून बघत असले तरी गंभीर मात्र आम्हाला विचारात घेऊन रणनीती ठरवत असतो. गेल्या लढतीत केकेआर संघात जवळजवळ अर्धे गोलंदाज होते. फिरकीपटूंची गर्दी होती, तर मॉर्केलच्या रूपाने दर्जेदार वेगवान गोलंदाज. वेगवान मारा असो किंवा फिरकी; त्याचप्रमाणे सिम, नियमित आणि चायनामन हे सर्व पर्याय त्याच्याकडे होते. केकेआर संघाची गोलंदाजीची बाजू म्हणजे भोजनाच्या टेबलवर सर्व प्रकारचे रुचकर व्यंजन असल्याप्रमाणे आहे. टी-२०मध्ये प्रत्येक कर्णधार विचार करतो, की २० षटकांमध्ये १० बळी घेणे कठीण काम आहे, पण गंभीर मात्र १० विकेटसाठी १० चेंडू पुरेसे असल्याचा विचार करतो. महान वसीम अक्रमच्या उपस्थितीचा खेळाडूंना लाभ मिळत आहे. समतोल साधण्यासाठी खेळाडूंच्या लिलावामध्ये संघाने आपली रक्कम विचारपूर्वक खर्च केल्याचे दिसून येते, पण सुरुवातीला असे नव्हते. तुम्हाला आठवत असेल आयपीएलच्या सुरुवातीच्या मोसमात संघाने गेल, पाँटिंग, मॅक्युलम आणि गांगुली यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश केला होता. तीन सत्रांत निराशाजनक कामगिरीनंतर हा बदल घडला. सन २०११मध्ये गंभीर जुळल्यानंतर हा संघ वेगळा भासायला लागला. क्रिकेटच्या या प्रकारात टी-२० जाणकार काही बाबींवर विशेष भर देतात. त्याचा सखोल विचार होणे आवश्यक आहे. तुम्ही आपल्या आघाडीच्या दोन फलंदाजांपैकी एकाकडून किमान १०० धावांची किंवा आघाडीच्या फळीतील प्रत्येक फलंदाजकडून किमान ३०-४० धावांच्या योगदानाची अपेक्षा ठेवता. रॉयल चॅलेंजर्सच्या आघाडीच्या चार फलंदाजांपैकी एक फलंदाज १०० धावांचा पल्ला गाठेल, असे घडू शकते, पण २० षटकांमध्ये अशी कामगिरी प्रत्येक फलंदाजाकडून होण्याची शक्यता नसते. दिग्गज फलंदाजांचा समावेश असलेल्या आरसीबीसारख्या संघालाही रविवारच्या लढतीत अखेरच्या चार षटकांमध्ये धावा फटकावणे अडचणीचे झाले होते. त्यामुळे एकच विभाग मजबूत करण्यापेक्षा सर्वच विभागांवर लक्ष पुरविणे महत्त्वाचे ठरते. दरम्यान, सलामीवीरांचा अपवाद वगळता केकेआर संघातील अन्य खेळाडूंची अद्याप परीक्षा झालेली नाही. त्यांचे सलामीवीर केवळ मोठ्या धावसंख्येचा पाया रचत नसून अखेरच्या षटकापर्यंत तळ ठोकत आहेत. अखेर त्यांच्या संघात दर्जेदार अष्टपैलूंचा समावेश आहे. या अष्टपैलूंची केवळ षटकार ठोकण्याला पसंती असते. दुसऱ्या बाजूचा विचार करता पंजाब संघात अलीकडेच मिळवलेल्या विजयामुळे उत्साह आहे. (टीएमसी)