शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ईडन गार्डनवर आत्तापर्यंत पाकिस्तानची सरशी

By admin | Updated: March 11, 2016 17:46 IST

ईडन गार्डनवर पाकिस्तानने ५ सामने जिंकले असून भारताला केवळ १ विजय मिळवता आला तर ५ सामने अनिर्णीत राहिले.

ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. ११ - वर्ल्डकपच्या सर्व प्रकारांमध्ये भारताची पाकिस्तान विरोधातील आतापर्यंतची कामगिरी अजिंक्य असली तरी, ईडन गार्डनची आकडेवारी मात्र पाकिस्तानच्या बाजूने जाणारी आहे. वनडे आणि कसोटीमध्ये मिळून भारत पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर आतापर्यंत ११ सामने झाले. त्यापैकी भारताने फक्ते १ सामना जिंकला असून, ५ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत तर  अन्य ५ सामने अनिर्णित राहिले आहेत. 
 
भारत आणि पाकिस्तानमध्ये १ ऑक्टोंबर १९७८ रोजी क्वेटाच्या अयुब नॅशनल स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना झाला. ४ धावांनी भारताने हा सामना जिंकला होता. ४० षटकांच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारताने १७० धावा केल्या. पाकिस्तानला १६६ धावांपर्यंत मजल मारता आली. ५१ धावा करुन ३८ धावात दोन विकेट घेणा-या मोहिंदर अमरनाथ यांना सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले होते. 
 
१८ फेब्रुवारी १९८७ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर पहिला सामना झाला. अटीतटीचा झालेला हा सामना पाकिस्तानने तीन चेंडू आणि दोन गडी राखून जिंकला होता. भारताने विजयासाठी दिलेले २३९ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने ३९.३ षटकात पार केले होते. नाबाद ७२ धावांची खेळी करणा-या सलीम मलिकला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या सामन्यात भारताचा सलामीवीर कृष्मचारी श्रीकांतने १२३ धावांची शतकी खेळी केली होती. 
 
२८ ऑक्टोंबर १९८९ रोजी भारत-पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर दुसरा एकदिवसीय सामना झाला.  हा सामना पाकिस्तानने ७७ धावांनी जिंकला होता. प्रथम फलंदाजी करणा-या पाकिस्तानने ५० षटकात २७९ धावा केल्या. भारताचा डाव २०२ धावात आटोपला. नाबाद ४७ धावांची खेळी करणारा पाकिस्तानचा कर्णधार इमरान खानला सामनावीराच्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. 
 
१३ नोव्हेंबर २००४ रोजी भारत-पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर भारत-पाकिस्तानमध्ये तिसरा एकदिवसीय सामना झाला. पाकिस्तानने एक षटक आणि सहा गडी राखून हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करणा-या भारताने २९२ धावा केल्या. पाकिस्तानने ४९ षटकात हे आव्हान पार केले. १०८ धावांची खेळी करणारा सलामीवीर सलमान बट्टला सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले. 
 
३ जानेवारी २०१३ मध्ये भारत-पाकिस्तानमध्य ईडन गार्डनवर चौथा एकदिवसीय सामना झाला. प्रथम फलंदाजी करणा-या पाकिस्तानने २५० धावा केल्या. भारताचा डाव १६५ धावांवर आटोपला. पाकिस्तानने हा सामना ८५ धावांनी जिंकला. १०६ धावांची शतकी खेळी करणारा सलामीवीर नासीर जमशेदला सामनावीराच्या पुरस्कराने गौरवण्यात आले. 
 
भारत आणि पाकिस्तानममध्ये १२७ एकदिवसीय सामने झाले. त्यातील ७२ सामने पाकिस्तानने आणि ५१ सामने भारताने जिंकले. पाच सामने रद्द झाले. 
 
१६ ऑक्टोबर १९५२ मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये दिल्लीच्या फिरोझशहा कोटला स्टेडियमवर पहिला कसोटी सामना झाला. भारताने हा सामना एक डाव आणि ७० धावांनी जिंकला. 
 
१६ फेब्रुवारी १९९९ रोजी भारत-पाकिस्तानमध्ये ईडन गार्डनवर कसोटी सामना सुरु झाला होता. पाकिस्तानने हा सामना ४६ धावांनी जिंकला होता. पाकिस्तानचा सलामीवीर सईद अन्वर आणि भारताचा वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथला सामनावीराचा पुरस्कार विभागून देण्यात आला होता. 
 
१६ मार्च २००५ मध्ये भारत आणि पाकिस्तान ईडन गार्डनवर कसोटी सामना खेळला गेला. हा सामना भारताने १९५ धावांनी जिंकला होता. या कसोटीच्या दोन्ही डावात शतकी खेळी करणा-या राहुल द्रविडला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 
 
ईडन गार्डन मैदानावरील पाच कसोटी सामने अनिर्णित राहिले होते. 
भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ५९ कसोटी सामने झाले. त्यातील नऊ सामने भारताने तर, १२ कसोटी सामने पाकिस्तानने जिंकले. ३८ कसोटी सामने अर्निर्णीत राहिले होते.