शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पाक संघाला ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Updated: March 12, 2016 03:21 IST

टी-२० क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या समावेशाबाबतची अनिश्चितता शुक्रवारी अखेर संपुष्टात आली. भारताने सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तान सरकारने आपला संघ भारतात पाठविण्यास हिरवी झेंडी दिली

इस्लामाबाद : टी-२० क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या समावेशाबाबतची अनिश्चितता शुक्रवारी अखेर संपुष्टात आली. भारताने सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तान सरकारने आपला संघ भारतात पाठविण्यास हिरवी झेंडी दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) कार्यकारी अध्यक्ष नजम सेठी यांनी गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर सरकारने पाक संघाला भारतात जाण्यास परवानगी बहाल केल्याची माहिती पत्रकारांना दिली. त्याआधी चौधरी निसार यांनी सौदी अरब दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्व घटनाक्रम समजावून सांगितला होता. पाक संघाला २४ तास कडेकोट सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन भारताच्या गृहमंत्र्यांनी तसेच गृहसचिवांनी दिल्यानंतर पंतप्रधानांनी संघ पाठविण्यास होकार दिला.पाक संघ शुक्रवारी रात्री दुबईला रवाना होत असून तेथून कोलकाता येथे जाईल, असे सेठी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी गोड बातमी ही आहे की, पाक संघाला सरकारने भारतात जाण्याची परवानगी बहाल केली. भारत सरकारने संघाला सुरक्षा पुरविण्याचे ठोस आश्वासन पाक उच्चायुक्तांना दिले आहे. त्याआधी भारतातील पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताच्या गृहसचिवांशी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने देखील बैठकीनंतर वक्तव्य करीत टी-२० विश्वचषकात सहभागी होत असलेल्या सर्वच संघांना फुलप्रुफ सुरक्षा पुरविण्याचा पुनरुच्चार केला. (वृत्तसंस्था)परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, आयसीसी टी-२० विश्वचषकासंदर्भात पाकच्या उच्चायुक्तांनी गृहसचिवांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली. यादरम्यान भारताच्या गृहसचिवांनी पाकसह स्पर्धेत सहभागी सर्वच संघांना कडेकोट सुरक्षा पुरविली जाईल अशी हमी दिली आहे.’पाकच्या भारतातील आगमनास उशीर होत असल्याने शनिवारी बंगालविरुद्ध होणारा त्यांचा सराव सामना रद्द करण्यात आला आहे. पाक संघ दुसऱ्या सराव सामन्यात रविवारी श्रीलंकेविरुद्ध खेळेल. पाक सरकार गेल्या आठवड्यापासून भारत सरकारकडून आपल्या संघाच्या सुरक्षेबाबत लेखी आश्वासनावर अडून होते. याशिवाय आम्ही संघ भारतात पाठविणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली होती.भारत सरकारने पाक खेळाडू, अधिकारी, मीडिया प्रतिनिधी आणि सामना पाहणाऱ्या चाहत्यांना सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन देताच पाकने संघ पाठविण्याचे निश्चित केले. विश्वचषकातील भारत-पाक सामना १९ मार्चला ईडन गार्डनवर होणार आहे. आधी हा सामना धरमशाला येथे खेळला जाणार होता. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांनी या सामन्यास सुरक्षा पुरविण्यास नकार दिला. माजी सैनिकांचा पाक संघावर रोष असल्याचे त्यांचे मत होते. यानंतर पाकने सामनास्थळ बदलण्याची मागणी केली. आयसीसीने ती मान्य करीत सामन्याचे स्थळ कोलकाता येथे हलविले होते. दरम्यान, पाकने टी-२० विश्वचषकासाठी भारत दौरा न केल्यास १ कोटी ५० लाख डॉलरचे नुकसान होणार असल्याची माहिती पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. > पाकचा सराव सामना रद्दकोलकाता : पाकिस्तानचा शुक्रवारी बंगाल रणजी संघाविरुद्ध खेळला जाणारा विश्व टी-२० सराव सामना रद्द करण्यात आला. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार पाकिस्तान शुक्रवारी बंगाल रणजी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार होता, पण बंगाल क्रिकेट संघटनेच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार हा सामना आता रद्द करण्यात आला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान संघ शनिवारी दुबईमार्गे सायंकाळपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान संघ नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहचत असल्यामुळे १९ मार्च रोजी भारत-पाक संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट लढतीच्या तिकीट विक्रीला विलंब होत आहे. धरमशालाहून कोलकाता येथे स्थानांतरित करण्यात आलेल्या या लढतीच्या तिकीट विक्रीला आता १६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे.’पाकिस्तानला दुसऱ्या सराव सामन्यात १४ मार्च रोजी ईडन गार्डन्समध्ये श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर पाकिस्तान संघ १६ मार्च रोजी क्वालीफायरसोबत तर १९ मार्च रोजी भारताविरुद्ध सामने खेळणार आहे. गतचॅम्पियन श्रीलंका आणि आॅस्ट्रेलिया हे संघ पूर्वघोषित कार्यक्रमानुसार भारतात डेरेदाखल झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत टी-२० मालिका जिंकल्यानंतर आॅस्ट्रेलिया संघ शुक्रवारी सकाळी दुबईमार्गे येथे दाखल झाला.>कोण काय म्हणाले.....पाक संघाला पूर्ण सुरक्षा देऊ. विश्वचषकाच्या आयोजनात कुठलाही अडथळा येणार नाही. सर्व संघांनी निश्चिंत होऊन भारतात प्रवास करावा.- राजनाथसिंग, गृहमंत्री भारत.कोलकाता येथे येणाऱ्या सर्वच संघांना आम्ही उच्च दर्जाची सुक्षा व्यवस्था प्रदान करू. पीसीबीला आम्ही तसा संदेश दिला आहे.- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल.पाकला टी-२० विश्वचषकात खेळताना चाहते पाहू इच्छितात. आमच्या सरकारची चिंता देखील योग्य आहे; पण आता ती संपली.- शहरयार खान, पीसीबी अध्यक्ष.