शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पाकिस्तान विश्वचषकाबाहेर, रविवारी भारत - ऑस्ट्रेलियामध्ये क्वार्टरफायनल

By admin | Updated: March 25, 2016 20:02 IST

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत 

मोहाली, दि. २५ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वीस षटकात १९३ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने निर्धारीत वीस षटकात आठ बाद १७२ धावा केल्या. पाकिस्तानने अखेरपर्यंत विजयासाठी शर्थ केली पण त्यांना यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामधील साखळी गटातील पुढचा सामना उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. या सामन्यातील विजयी संघ उपांत्यफेरीत तर, पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. 
 
पाकिस्तानकडून खालिद लतिफने सर्वाधिक ४६ धावा केल्या. शोएब मलिकने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून रहात २० चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. उमर अकमलने ३२, सलामीवीर शरजील खानने ३० धावा केल्या. यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार शाहीद आफ्रिदीने १४ धावा केल्या. त्याचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा शेवटचा सामना असू शकतो. 
 
कर्णधार स्टीव्हन स्मिथची ४३ चेंडूतील ६१ धावांची तडाखेबंद नाबाद अर्धशतकी खेळी आणि शेन वॉटसनने २१ चेंडूत फटकावलेल्या नाबाद ४४ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य दिले होते.
 
 
ऑस्ट्रेलियाने निर्धारीत वीस षटकात चार गडी गमावून १९३ धावा केल्या. पाचव्या विकेटसाठी दोघांनी ३८ चेंडूत नाबाद ७४ धावांची भागिदारी केली. ग्लेन मॅक्सवेलने ३० धावांची उपयुक्त खेळी केली. स्मिथ आणि मॅक्सवेलने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. 
 
पाकिस्तानचा मोहम्मद सामी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात ५३ धावा दिल्या. पाकिस्तानचे बलस्थान असलेल्या गोलंदाजीवरच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी खो-याने धावा वसूल केल्या.  आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील ग्रुप २ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
 
स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. परंतु पाक हा सामना हरल्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना साखळी सामना न राहता क्वार्टरफायनलसारखा होणार आहे. त्या सामन्यात जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये जाईल.