शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

पाकिस्तान विश्वचषकाबाहेर, रविवारी भारत - ऑस्ट्रेलियामध्ये क्वार्टरफायनल

By admin | Updated: March 25, 2016 20:02 IST

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत 

मोहाली, दि. २५ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वीस षटकात १९३ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने निर्धारीत वीस षटकात आठ बाद १७२ धावा केल्या. पाकिस्तानने अखेरपर्यंत विजयासाठी शर्थ केली पण त्यांना यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामधील साखळी गटातील पुढचा सामना उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. या सामन्यातील विजयी संघ उपांत्यफेरीत तर, पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. 
 
पाकिस्तानकडून खालिद लतिफने सर्वाधिक ४६ धावा केल्या. शोएब मलिकने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून रहात २० चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. उमर अकमलने ३२, सलामीवीर शरजील खानने ३० धावा केल्या. यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार शाहीद आफ्रिदीने १४ धावा केल्या. त्याचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा शेवटचा सामना असू शकतो. 
 
कर्णधार स्टीव्हन स्मिथची ४३ चेंडूतील ६१ धावांची तडाखेबंद नाबाद अर्धशतकी खेळी आणि शेन वॉटसनने २१ चेंडूत फटकावलेल्या नाबाद ४४ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य दिले होते.
 
 
ऑस्ट्रेलियाने निर्धारीत वीस षटकात चार गडी गमावून १९३ धावा केल्या. पाचव्या विकेटसाठी दोघांनी ३८ चेंडूत नाबाद ७४ धावांची भागिदारी केली. ग्लेन मॅक्सवेलने ३० धावांची उपयुक्त खेळी केली. स्मिथ आणि मॅक्सवेलने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. 
 
पाकिस्तानचा मोहम्मद सामी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात ५३ धावा दिल्या. पाकिस्तानचे बलस्थान असलेल्या गोलंदाजीवरच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी खो-याने धावा वसूल केल्या.  आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील ग्रुप २ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
 
स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. परंतु पाक हा सामना हरल्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना साखळी सामना न राहता क्वार्टरफायनलसारखा होणार आहे. त्या सामन्यात जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये जाईल.