शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान विश्वचषकाबाहेर, रविवारी भारत - ऑस्ट्रेलियामध्ये क्वार्टरफायनल

By admin | Updated: March 25, 2016 20:02 IST

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत 

मोहाली, दि. २५ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये अखेर पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानवर २१ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने वीस षटकात १९३ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने निर्धारीत वीस षटकात आठ बाद १७२ धावा केल्या. पाकिस्तानने अखेरपर्यंत विजयासाठी शर्थ केली पण त्यांना यश मिळाले नाही. ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामधील साखळी गटातील पुढचा सामना उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल. या सामन्यातील विजयी संघ उपांत्यफेरीत तर, पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. 
 
पाकिस्तानकडून खालिद लतिफने सर्वाधिक ४६ धावा केल्या. शोएब मलिकने शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून रहात २० चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. उमर अकमलने ३२, सलामीवीर शरजील खानने ३० धावा केल्या. यांचा अपवाद वगळता पाकिस्तानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. कर्णधार शाहीद आफ्रिदीने १४ धावा केल्या. त्याचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हा शेवटचा सामना असू शकतो. 
 
कर्णधार स्टीव्हन स्मिथची ४३ चेंडूतील ६१ धावांची तडाखेबंद नाबाद अर्धशतकी खेळी आणि शेन वॉटसनने २१ चेंडूत फटकावलेल्या नाबाद ४४ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला विजयासाठी १९४ धावांचे लक्ष्य दिले होते.
 
 
ऑस्ट्रेलियाने निर्धारीत वीस षटकात चार गडी गमावून १९३ धावा केल्या. पाचव्या विकेटसाठी दोघांनी ३८ चेंडूत नाबाद ७४ धावांची भागिदारी केली. ग्लेन मॅक्सवेलने ३० धावांची उपयुक्त खेळी केली. स्मिथ आणि मॅक्सवेलने चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. 
 
पाकिस्तानचा मोहम्मद सामी सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात ५३ धावा दिल्या. पाकिस्तानचे बलस्थान असलेल्या गोलंदाजीवरच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी खो-याने धावा वसूल केल्या.  आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील ग्रुप २ मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान सामना सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
 
स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी पाकिस्तानला आजच्या सामन्यात विजय आवश्यक होता. परंतु पाक हा सामना हरल्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला सामना साखळी सामना न राहता क्वार्टरफायनलसारखा होणार आहे. त्या सामन्यात जो जिंकेल तो सेमीफायनलमध्ये जाईल.