शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

भारताला कमबॅक करण्याची हीच संधी

By admin | Updated: March 4, 2017 00:18 IST

पुण्यातील सामना तीन दिवसांत गमावल्यानंतर बंगलोर कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांपुढे मोठे आव्हान असेल.

- अयाझ मेमन, संपादकीय सल्लागारपुण्यातील सामना तीन दिवसांत गमावल्यानंतर बंगलोर कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांपुढे मोठे आव्हान असेल. मी फलंदाजांसाठी अशासाठी म्हणतोय, कारण गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी खोऱ्याने धावा काढल्या आहेत. असे असताना ज्याप्रकारे भारताची फलंदाजी पहिल्या सामन्यात कोसळली, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. बलाढ्य फलंदाजी मानल्या जाणाऱ्या भारताला अचानक झाले काय, असा प्रश्न सर्वांनाच पडला. विराट कोहली, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे सारेच अपयशी ठरले. केवळ के. एल. राहुलने त्या खेळपट्टीवर अर्धशतक ठोकले. त्यावेळी, थोडीफार आशा वाटलेली की भारतीय फलंदाज आॅसी फिरकीविरुध्द काहीतरी चांगली कामगिरी करतील. पण, सर्वांच्याच पदरी निराशा आली. आता, दुसऱ्या कसोटीत हा सामना अधिकाधिक दिवसापर्यंत खेचण्याचा प्रयत्न भारतीयांनी करायला हवा. आॅस्टे्रलियाकडेही चांगले गोलंदाज आहेत, जे फिरकी खेळपट्टीवर चित्र बदलू शकतात आणि हे आपण पुणे कसोटीमध्ये पाहिले आहे. तेव्हा असे अजिबात नाही, की फिरकी खेळपट्टीवर केवळ भारतीय गोलंदाजंच पाहुण्या संघावर वर्चस्व गाजवू शकतात. जर फिरकी खेळपट्टी असेल, तर भारतीय फलंदाजीही कमजोर होते हे सिध्द झाले आहे. आता, पहिला सामना मोठ्या अंतराने गमावला असून भारतीय संघ बॅकफूटवर आहे हे नक्की. पण माझ्यामते, अजूनही भारतीय संघाने मालिका गमावलेली नाही. पण मी असेही सांगू इच्छितो की, बंगलोर कसोटी अनिर्णित राहिल्यास किंवा आॅस्टे्रलियाने जिंकल्यास भारतीय संघावर ही मालिका गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळेच, भारतीय संघाला कमबॅक करण्याची हीच संधी आहे, या सर्व गोष्टी ध्यानात ठेवूनच टीम इंडियाला बंगलोरच्या मैदानावर उतरावे लागेल.