शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

...तरच खेळाडूला विश्रांती : महेंद्रसिंह धोनी

By admin | Updated: March 13, 2015 00:52 IST

खेळाडू मोठ्या कालावधीपासून खेळत असले आणि संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले असले, तरीही एखादा खेळाडू जखमी झाल्यासच शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध

आॅकलंड : खेळाडू मोठ्या कालावधीपासून खेळत असले आणि संघाने उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले असले, तरीही एखादा खेळाडू जखमी झाल्यासच शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या विश्वचषक सामन्यात अंतिम ११ जणांत बदल केला जाईल, असे मत व्यक्त केले आहे भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने.धोनीचा संघात जास्त बदल न करण्याचा दृष्टिकोन असल्यास अम्बाती रायुडू, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी आणि भुवनेश्वर कुमार यांना अंतिम ११ जणांत स्थान मिळवणे कठीण होईल.यांतील भुवनेश्वरने मोहंमद शमीच्या अनुपस्थितीत एक सामना खेळला होता. उमेश यादव, शमी आणि मोहित शर्मा या तेजतर्रार त्रिकुटाने भुवनेश्वरची उणीव भासू दिली नाही. त्याचप्रमाणे, संघातील नियमित खेळाडूला विश्रांती देण्याच्या मूडमध्ये आपण नसल्याचेही धोनीने स्पष्ट केले आहे. धोनीने पर्थमध्ये वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यानंतर जे खेळाडू अंतिम ११ जणांच्या बाहेर आहेत ते बाहेरच असतील, असे स्पष्ट शब्दांत म्हटले होते.हॅमिल्टनमध्ये आयर्लंडविरुद्ध सामन्यानंतर भारतीय कर्णधाराने तर औपचारिक सामन्याच्या शब्दप्रयोगास विरोध का आहे, हेदेखील विस्ताराने स्पष्ट केले होते. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात काही खेळाडूंना विश्रांती दिली जाईल का, असे त्याला विचारण्यात आले तेव्हा धोनी म्हणाला, ‘‘आम्हाला यासंबंधी फिजिओकडून माहिती घेण्याची आवश्यकता भासेल. जर फिजिओला वाटले, की अन्य खेळाडू जखमी होऊ शकतो, तर तशा परिस्थितीत आम्ही त्या खेळाडूला विश्रांती देऊ. अन्यथा, एखादा खेळाडू तंदुरुस्त आहे व निवडीसाठी उपलब्ध असेल, तर आम्ही आमचा सर्वोत्तम ११ जणांचा संघ मैदानात उतरवू. त्याचप्रमाणे सामन्यादरम्यान विश्रांतीसाठी खेळाडूंना खूप कालावधी मिळाला आणि एवढी विश्रांती पुरेशी आहे. दुखापतीचा धोका नसल्यास आम्ही आमचा सर्वोत्तम संघ खेळवू.’’हॅमिल्टनच्या सेडन पार्कची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती; परंतु धोनीला ईडन पार्कच्या खेळपट्टीवर चांगली उसळी मिळेल, अशी आशा आहे. (वृत्तसंस्था)