शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

वन-डेतही आक्रमक खेळी कायम राहील

By admin | Updated: October 15, 2016 01:32 IST

आक्रमकतेच्या बळावरच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शानदार विजय साकार होऊ शकले. आगामी वन-डे मालिकेतही आक्रमक खेळणे कायम राहणार

धर्मशाला : आक्रमकतेच्या बळावरच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शानदार विजय साकार होऊ शकले. आगामी वन-डे मालिकेतही आक्रमक खेळणे कायम राहणार असल्याचे संकेत मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे याने दिले आहेत.अलीकडेच आटोपलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० ने क्लीन स्वीप केले. आक्रमक धोरणामुळेच आम्ही यशस्वी ठरलो, असे रहाणेला वाटते. एचपीसीए स्टेडियमवर पत्रकारांशी बोलताना रहाणे म्हणाला, ‘माझ्या मते शिस्तबद्ध खेळ महत्त्वाचा आहे. कसोटीत आम्ही आक्रमक धोरणाचा अवलंब केला. आता पुन्हा आक्रमक धोरण स्वीकारण्याची वेळ आली आहे. प्रतिस्पर्धी संघाची बलस्थाने आणि कच्चे दुवे शोधण्याच्या भानगडीत न पडता आपली क्षमता ओळखण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला लय मिळविणे हे पाच सामन्यांच्या मालिकेत संघापुढील पहिले ध्येय असेल.’मालिकेतील पहिला सामना उद्या, रविवारी धर्मशाला येथे खेळला जाईल. फलंदाज या नात्याने कमी वेळेत कसोटी ते वन-डे अशा प्रकारात स्वत:ला फिट बसविणे किती कठीण असते, असा सवाल करताच अजिंक्य म्हणाला, ‘माझ्या मते हे फलंदाजांच्या मानसिकतेवर विसंबून असते. व्यावसायिक खेळाडू या नात्याने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सज्ज असावेच लागते. मानसिकरीत्या सकारात्मक राहून परिस्थितीशी ताळमेळ साधण्याचे आव्हान असते. आम्ही अनुभवी खेळाडू असल्याने कसोटी ते वन-डे या प्रवासात कसा खेळ करावा, हे सांगण्याची गरज नाही.’भारताला या मोसमात व्यस्त क्रिकेट खेळायचे असल्याने सध्याच्या वन-डे मालिकेतून रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली. त्यांच्या जागी जयंत यादव, अक्षर पटेल, मनदीपसिंग, धवल कुलकर्णी, मनीष पांडे यांना स्थान देण्यात आले. नव्या चेहऱ्यांना संधी देणे हा चांगला प्रयोग असल्याचे सांगून रहाणे म्हणाला, नव्या सहकाऱ्यांच्या खेळाबद्दल मला देखील उत्सुकता आहे. यापैकी काहींनी रणजी करंडकात चमकदार कामगिरी केली. आता राष्ट्रीय संघात खेळून या सहकाऱ्यांनी स्वत:चा आत्मविश्वास उंचवावा, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)