शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
2
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
3
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
4
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
5
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
6
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
7
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
8
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
9
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
10
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
11
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
12
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
13
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
14
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
15
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
16
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
17
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
18
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
19
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
20
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
Daily Top 2Weekly Top 5

वन-डेतही आक्रमक खेळी कायम राहील

By admin | Updated: October 15, 2016 01:32 IST

आक्रमकतेच्या बळावरच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शानदार विजय साकार होऊ शकले. आगामी वन-डे मालिकेतही आक्रमक खेळणे कायम राहणार

धर्मशाला : आक्रमकतेच्या बळावरच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शानदार विजय साकार होऊ शकले. आगामी वन-डे मालिकेतही आक्रमक खेळणे कायम राहणार असल्याचे संकेत मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे याने दिले आहेत.अलीकडेच आटोपलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने ३-० ने क्लीन स्वीप केले. आक्रमक धोरणामुळेच आम्ही यशस्वी ठरलो, असे रहाणेला वाटते. एचपीसीए स्टेडियमवर पत्रकारांशी बोलताना रहाणे म्हणाला, ‘माझ्या मते शिस्तबद्ध खेळ महत्त्वाचा आहे. कसोटीत आम्ही आक्रमक धोरणाचा अवलंब केला. आता पुन्हा आक्रमक धोरण स्वीकारण्याची वेळ आली आहे. प्रतिस्पर्धी संघाची बलस्थाने आणि कच्चे दुवे शोधण्याच्या भानगडीत न पडता आपली क्षमता ओळखण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला लय मिळविणे हे पाच सामन्यांच्या मालिकेत संघापुढील पहिले ध्येय असेल.’मालिकेतील पहिला सामना उद्या, रविवारी धर्मशाला येथे खेळला जाईल. फलंदाज या नात्याने कमी वेळेत कसोटी ते वन-डे अशा प्रकारात स्वत:ला फिट बसविणे किती कठीण असते, असा सवाल करताच अजिंक्य म्हणाला, ‘माझ्या मते हे फलंदाजांच्या मानसिकतेवर विसंबून असते. व्यावसायिक खेळाडू या नात्याने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सज्ज असावेच लागते. मानसिकरीत्या सकारात्मक राहून परिस्थितीशी ताळमेळ साधण्याचे आव्हान असते. आम्ही अनुभवी खेळाडू असल्याने कसोटी ते वन-डे या प्रवासात कसा खेळ करावा, हे सांगण्याची गरज नाही.’भारताला या मोसमात व्यस्त क्रिकेट खेळायचे असल्याने सध्याच्या वन-डे मालिकेतून रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली. त्यांच्या जागी जयंत यादव, अक्षर पटेल, मनदीपसिंग, धवल कुलकर्णी, मनीष पांडे यांना स्थान देण्यात आले. नव्या चेहऱ्यांना संधी देणे हा चांगला प्रयोग असल्याचे सांगून रहाणे म्हणाला, नव्या सहकाऱ्यांच्या खेळाबद्दल मला देखील उत्सुकता आहे. यापैकी काहींनी रणजी करंडकात चमकदार कामगिरी केली. आता राष्ट्रीय संघात खेळून या सहकाऱ्यांनी स्वत:चा आत्मविश्वास उंचवावा, अशी अपेक्षा आहे. (वृत्तसंस्था)