शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

प्रतिभावान मल्लास दत्तक घेतल्यास ऑलिम्पिक पदक दूर नाही : काका पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 16:22 IST

आता आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पहिलवानांची फळी मोठी आहे. या सर्वांचे भविष्य उज्वल आहे

जालना : राजकीय नेते आणि मोठ्या कंपन्यांनी पुढाकार घेऊन एकेक पहिलवान दत्तक घेतला तर महाराष्ट्राला देशासाठी आॅलिम्पिक मेडल जिंकून देणे कठीण नाही, असे मत व्यक्त केले आहे ते अर्जुनपुरस्कारप्राप्त काका पवार यांनी.जालना येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी काका पवार आले आहेत. 

काका पवार हे १९९९ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित असून त्यांना खेळाडू म्हणून १९८८ आणि प्रशिक्षक म्हणून २0१६ साली शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनाचीही काका पवार यांनी प्रशंसा केली. या वेळी त्यांनी लोकमतशी विशेष संवाद साधला. 

प्रतिभावान मल्लांना दत्तक घ्यावे काका पवार म्हणाले, ‘‘राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांचे महाराष्ट्राच्या मल्लाने आॅलिम्पिकमध्ये मेडल जिंकावे हे स्वप्न आहे. त्यामुळे यांनी राहुल आवारे, उत्कर्ष काळे, किरण भगत, अभिजीत कटके यांना दत्तक घेतले असून त्यांना प्रति महिना एक लाख रुपये खुराक व प्रशिक्षणासाठी दिले आहेत. त्यांच्याप्रमाणेच मोठे राजकीय नेते, मोठ्या कंपन्या आणि दानशूर व्यक्तींनी महाराष्ट्रातील प्रतिभवान असणारे एकेक मल्ल दत्तक घ्यायला हवा. असे झाल्यास महाराष्ट्रातील पहिलवानाला आॅलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शरद पवार यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता मल्लांवर आहे.’’

मराठवाड्यात कुस्ती केंद्र सुरु करणार ‘‘प्रतिष्ठित अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती आयोजन करु शकतो हे मराठवाड्याने दाखवून दिले. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचेही नियोजनही चांगल्या पद्धतीने होत आहे.’’ पुणे येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाद्वारे २५ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पहिलवान घडवणाऱ्या काका पवार यांनी मराठवाड्यातील मल्लांसाठी कुस्ती केंद्र सुरु करण्यास पुढाकार घेण्यास तयार असल्याचे सांगताना लातूर येथे कुस्ती केंद्रासाठी शासनाकडे एक एकर जागा मागितली असल्याची माहितीही दिली. 

आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पहिलवानांची फळी गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकप्राप्त राहुल आवारे आतापर्यंत आॅलिम्पिक खेळू शकला असता; परंतु २0१२ आणि २0१६ मध्ये गुणवत्ता असूनही त्याच्यावर अन्याय झाला. त्यावेळी कुस्ती संघटकांच्या पाठिंबा नसल्यामुळे तो आॅलिम्पिक खेळू शकला नाही. २0१२ मध्ये राहुल ज्या गटात खेळतो त्या गटात जाणीवपूर्वक १00 पेक्षा जास्त पहिलवान ट्रायल्समध्ये खेळवले गेले तसेच २0१६ मध्ये ट्रायल न घेता भारतीय संघ पाठवल्याने राहुलवर मोठा अन्याय त्या वेळेस झाला आहे. राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे हे आॅलिम्पिकमध्ये देशाला मेडल्स जिंकून देतील असा विश्वास आहे. या दोघांशिवायही आता आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पहिलवानांची फळी मोठी आहे. या सर्वांचे भविष्य उज्वल असल्याचेही काका पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Wrestlingकुस्तीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा