शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

कॅप्टन विराटसमोर जुनीच समस्या

By admin | Updated: January 12, 2015 01:41 IST

भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली

सिडनी : भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, धोनीच्या नेतृत्वाचा वारसा पुढे चालवण्यासाठी आतूर असलेल्या नव्या कर्णधाराला अवघ्या दोन सामन्यांत धोनी आत्तापर्यंत झगडत असलेल्या समस्येची जाण झाली. नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, भारताकडे प्रभावी मारा करणारे गोलंदाज नसल्यामुळे हा मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. कोहलीनेही मालिकेनंतर भारताला नव्या गोलंदाजांची आवश्यकता असल्याचे मान्य केले.कसोटी मालिकेतील भारताच्या पाच फलंदाजांच्या सरासरीचा विचार केल्यास तो आॅसीच्या फलंदाजांपेक्षा अधिक आहे. भारताच्या चार फलंदाजांनी एकतरी शतक ठोकले, तर आॅस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना ते करण्यात यश आले. विशेष म्हणजे यापूर्वी विराट वगळता भारतीय संघात अ‍ॅडिलेडमध्ये खेळण्याचा अनुभव कोणाकडेच नव्हता. याउलट आॅसी संघाच्या प्रत्येकाने फलंदाजी केली आहे. या सर्वाची तुलना केल्यास भारतीय फलंदाज यजमानांना पुरून उरले. मात्र, नाण्याची केवळ एकच बाजू भक्कम असून चालत नाही. चढ-उतारांच्या या मालिकेत फलंदाजांनी निर्णायक क्षणी स्वत:ला सिद्ध करून एक बाजू तारली, परंतु गोलंदाजांनी निराश केले. याउलट आॅसीच्या फलंदाजांच्या खांद्याला खांदा लावून गोलंदाज लढले.