शहरं
Join us  
Trending Stories
1
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
2
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
3
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
4
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
5
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
6
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
7
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
8
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
9
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
10
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
11
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
12
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
13
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
14
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
15
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
16
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
17
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
18
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
19
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
20
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?

नवीन खेळाडू घडविण्यासाठी व्यवस्थेची गरज

By admin | Updated: November 2, 2015 00:17 IST

दिग्गज टेनिसपटू रमेश कृष्णन डेव्हिस कपमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सातत्यपूर्वक चांगल्या कामगिरीने प्रभावित आहेत;

पुणे : दिग्गज टेनिसपटू रमेश कृष्णन डेव्हिस कपमध्ये गेल्या काही वर्षांपासून भारताच्या सातत्यपूर्वक चांगल्या कामगिरीने प्रभावित आहेत; परंतु संघाला पुढच्या स्तरापर्यंत घेऊन जाऊ शकणारे नवीन खेळाडू घडविणाऱ्या व्यवस्थेची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरी यांच्या नेतृत्वाखाली भारत सलग १६ देशांच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळविण्याचा दावेदार बनत आहे. त्यांनी सप्टेंबर २0१४ मध्ये सर्बिया आणि त्यानंतर एका वर्षाने झेक प्रजासत्ताकसारख्या अव्वल संघांना आव्हान दिले; परंतु पुढे जाण्यात ते अपयशी ठरले.ते म्हणाले की, ‘आम्हाला एकेरीतील चांगल्या खेळाडूची आवश्यकता आहे. डेव्हिस कपमध्ये चार एकेरीचे सामने होतात आणि हे सत्य लपून राहिलेले नाही. विद्यमान खेळाडू कठोर मेहनत घेत आहेत आणि ते त्यांच्या कामगिरीत सुधारणा करीत राहतील; परंतु नवीन खेळाडू घडविणाऱ्या व्यवस्थेची आवश्यकता आहे.’ कृष्णन यांनी १९८७ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या वॉली मसूर याच्याविरुद्ध पाचवी लढत जिंकताना भारताला डेव्हिस कपमध्ये अंतिम फेरीत पोहोचवले होते. त्यानंतर भारत फायनल्समध्ये पोहोचू शकला नव्हता. युकी व साकेत मयनेनी याची रँकिंग सुधारणे हे चांगले संकेत आहेत; परंतु अजून पल्ला खूप लांब आहे, असे आॅस्ट्रेलिया ओपन १९८९ च्या पहिल्याच फेरीत त्या वेळेसचा नंबर वन खेळाडू मॅट्स विलेंडरवर सनसनाटी विजय नोंदणाऱ्या कृष्णन यांनी म्हटले. कृष्णन यांनी १९८१, १९८७ मध्ये यूएस ओपन आणि १९८६ मध्ये विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता. युकी टॉप १00 मध्ये आहे, तर सोमदेव आणि साकेत यांची रँकिंग १६0 ते १८0 यादरम्यान आहे. कृष्णन स्वत: आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम २३ व्या रँकिंगवर पोहोचले होते. कृष्णन यांना डेव्हिस कप कर्णधार म्हणून दुसऱ्या डावास सुरुवात करण्याची इच्छा आहे का, असे विचारले असता त्यांनी याविषयी इच्छा नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आमच्या जवळ चांगला डेव्हिस कपचा संघ आहे आणि उत्तम कर्णधार आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. (क्रीडा प्रतिनिधी)