शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा उशीराने होणार साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 08:35 IST

ऑलिम्पिक स्पर्धेनंतर टोकियोमध्ये आता पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन

नवी दिल्ली : दरवर्षी २९ ऑगस्टला आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा यंदा थोड्या उशिराने आयोजित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर टोकियोमध्ये आता पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन होणार आहे. त्यामुळेच सरकारने निवड समितीला टोकियो पॅरालिम्पिक खेळाडूंनाही पुरस्कार सोहळ्यामध्ये समाविष्ट करण्यास सांगितले आहे.पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन टोकियोमध्ये २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान होईल. पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यासाठी निवड समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. मात्र, त्याचवेळी निवड प्रक्रिया सुरु होण्याआधी काही वेळ प्रतीक्षा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय युवा पुरस्कार सोहळ्यादरम्यान ठाकूर यांनी सांगितले की, ‘या वर्षासाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समिती स्थापन करण्यात आली आहे; पण यंदा पॅरालिम्पिक स्पर्धाही होणार असल्याने आम्हाला यामध्ये पॅरालिम्पिक खेळाडूंनाही समाविष्ट करून घ्यायचे आहे.’५४ सदस्यांचा संघ रवानाक्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय पॅरालिम्पिक समितीने आगामी टोकियो पॅरा लिम्पीक स्पर्धेसाठी गुरूवारी ५४ सदस्यांच्या संघाला औपचारीक निरोप दिला. भारत २४ ऑगस्ट ते पाच सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या पॅरालिम्पीक स्पर्धेत सहभागी होणार आहे.संघात देवेंद्र झाझरिया एफ ४६ भालाफेक, मरियप्पन थांगवेलू टी २३ उंच उडी, विश्व चॅम्पियन संदीप चौधरी एफ ६४ भाला फेक या पदक विजेत्या दावेदार खेळाडूंचा समावेश आहे.आमचे पॅरा ॲथलिट महत्त्वाकांक्षी आहेत.  त्यांचा आत्मविश्वास १३० कोटी भारतीयांना प्रेरणा देत आहे. त्यांच्या हिमतीपुढे मोठमोठी आव्हानेही झुकतील. खेळाडूंची संख्या गेल्या स्पर्धेपेक्षा तिप्पट आहे. त्यामुळे मला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. हे स्टार चांगली कामगिरी करतील.-अनुराग ठाकूर, क्रीडा मंत्री