शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मेच्या शेवटी राष्ट्रीय शिबिर सुरू होण्याची शक्यता : रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 01:37 IST

अन्य खेळाडूंसाठी सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा : ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना मिळणार लाभ

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविणाऱ्या खेळाडूंसाठी राष्ट्रीय शिबिरे या महिन्याच्या शेवटी टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची योजना तयार करण्यात येत आहे. पण अन्य खेळाडूंना मात्र सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी रविवारी सांगितले.

रिजिजू म्हणाले, लॉकडाऊनमुळे त्यांच्या मंत्रालयाला भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) केंद्रांमध्ये सराव शिबिरे सुरू करता आलेली नाही. फिक्कीचे वेबिनार ‘कोरोना आणि खेळ : द चॅम्पियन्स स्पिक’मध्ये बोलताना रिजिजू म्हणाले, ‘शिबिरे योजनाबद्ध पद्धतीने सुरू होतील. सुरुवातीला आम्ही एनआयएस पतियाळा व बेंगळुरूच्या साईमध्ये सरावाला सुरुवात करणार आहोत. कारण येथे खेळाडू थांबलेले आहेत. या महिन्याच्या शेवटी बेंगळुरू व पतियाळा येथे सराव सुरू करण्याची आशा आहे.’ ते पुढे म्हणाले,‘आपण आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविलेल्या आणि भविष्यात पात्रता मिळविणाºया खेळांचे सराव शिबिरे असतील.’

राष्ट्रीय शिबिरे मार्चच्या दुसºया आठवड्यापासून स्थगित करण्यात आली. त्यावेळी कोविड-१९ महामारीचे भारतात रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली होती. क्रीडा मंत्री म्हणाले, ‘मी ३ मेपासून साई केंद्रांमध्ये खेळाडूंच्या सरावाला सुरुवात करण्याचा विचार करीत होतो. पण आता या माहिन्याच्या शेवटी योजनाबद्ध पद्धतीने सरावाला सुरुवात करावी लागेल. कारण आपात्कालीन नियमामध्ये क्रीडा स्पर्धांना कुठली सूट नसते. आमचे मंत्रालय आवश्यक सेवेत येत नाही.’

दरम्यान, रिजिजू यांनी स्पष्ट केले की, जे खेळाडू आॅलिम्पिक पात्रता मिळविण्याच्या शर्यतीत नाहीत त्यांना सराव सुरू करण्यासाठी सप्टेंबर- आॅक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. ते म्हणाले, ‘नजीकच्या कालावधीत कुठल्या स्पर्धात्मक सामन्यांची आशा नाही.’ दरम्यान, भारतीय आॅलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी शनिवारी म्हटले होते की, ते सरकारला राष्ट्रीय शिबिरात समावेश असलेल्या खेळाडूंना बाहेर प्रशिक्षणासाठी परवानगीबाबत विचारणा करणार आहेत. पण रिजिजू यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे. भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघ आणि एआयएस पतियाळाच्या काही खेळाडूंनी क्रीडा मंत्र्यांना बाहेर सराव करण्यास परवानगी देण्याबाबत लिहिले होते. क्रीडा मंत्री म्हणाले, परिस्थिती सामान्य झाली तरी खेळाडूंसह लोकांना आपल्या दिनचर्येमध्ये मोठे बदल करावे लागतील.’