शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
5
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
6
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
7
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
9
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
10
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
11
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
12
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
13
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
14
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
15
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
17
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
19
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
20
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

मुंबईची अडखळती सुरुवात; ४ बाद १७१

By admin | Updated: January 3, 2017 00:36 IST

तमिळनाडूचा पहिला डाव मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर आघाडीच्या फलंदाजांनी मोक्याच्या वेळी कच खल्ल्याने मुंबईची रणजी चषक उपांत्य सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १७१ धावा अशी अवस्था झाली.

राजकोट : तमिळनाडूचा पहिला डाव मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर आघाडीच्या फलंदाजांनी मोक्याच्या वेळी कच खल्ल्याने मुंबईची रणजी चषक उपांत्य सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १७१ धावा अशी अवस्था झाली. शार्दुल ठाकूर आणि अभिषेक नायर यांच्या अचूक माऱ्यापुढे तमिळनाडूचा पहिला डाव ३०५ धावांमध्ये संपुष्टात आला.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात तमिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवात केलेल्या तमिळनाडूला शार्दुल आणि नायर यांनी मोक्याच्यावेळी झटके देत त्यांचा डाव मर्यादित रोखला. बाबा इंद्रजित (६४), कौशिक गांधी (५०) व विजय शंकर (५०) यांनी संघाला सावरले.मुंबईने डावाची सुरुवात केली तेव्हा सर्वांची नजर युवा सलामीवीर पृथ्वी शॉकडे होती. एक चौकार मारून पृथ्वीने सर्वांची उत्सुकता वाढवली देखील, मात्र नंतर अश्विन क्रिस्टच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात तो यष्टिरक्षकाकडे झेल देऊन परतला. पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर मुंबईकरांनी सावध पवित्रा घेतला.

यावेळी तमिळनाडू पकड मिळविणार असे दिसत होते, परंतु प्रफुल वाघेला आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करून मुंबईला चांगल्या स्थितीत आणले. विजय शंकरने सूर्यकुमारला बाद करून ४३व्या षटकात ही जोडी फोडली. त्याने ११६ चेंडूंत ११ चौकारांसह १ षट्कार ठोकून ७३ धावा केल्या. ४४व्या षटकात वाघेला १३४ चेंडंूत ८ चौकारांसह ४८ धावा काढून धावबाद झाला, तर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर सिद्धेश लाड भोपळाही न फोडता औशिक श्रीनिवासचा शिकार ठरला.

झटपट ३ बळी गेल्याने मुंबईचा डाव १ बाद १२५ वरून ४ बाद १२८ असा घसरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार आदित्य तरे (१९*) व भरवशाचा श्रेयश अय्यर (२४*) खेळत होते. तमिळनाडूकडून अश्विन क्रिस्ट, औशिक श्रीनिवास आणि गंगा श्रीधर राजू यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.तत्पूर्वी, ६ बाद २६१ धावांवरून पुढे खेळताना तमिळनाडूचा डाव ३०५ धावांत संपुष्टात आला. शार्दुल ठाकूर (४/७५) आणि अभिषेक नायर (४/६६) यांनी अचूक मारा केला. विजय शंकर आपल्या वैयक्तिक धावसंख्येत ९ धावांची भर काढून अर्धशतक झळकावून बाद झाला. यानंतर अश्विन क्रिस्टने (३१) काहीवेळ प्रतिकार केल्याने तामिळनाडूला तीनशेचा टप्पा पार करता आला. संक्षिप्त धावफलकतमिळनाडू (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ३०५ धावा (बाबा इंद्रजित ६४, विजय शंकर ५०, कौशिक गांधी ५०; अभिषेक नायर ४/६६, शार्दुल ठाकूर ४/७५) मुंबई (पहिला डाव) : ६० षटकांत ४ बाद १७१ धावा (सूर्यकुमार यादव ७३, प्रफुल वाघेला ४८, आदित्य तरे खेळत आहे १९, श्रेयश अय्यर खेळत आहे २४; विजय शंकर १/१४, औशिक श्रीनिवास १/२२)