शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई उपांत्य फेरीत

By admin | Updated: February 21, 2015 03:33 IST

शेवटच्या दिवशी बलविंदर संधूने (३/३५) केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने दिल्लीचा दुसरा डाव २३६ धावांत गुंडाळून तब्बल २०४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

टक: शेवटच्या दिवशी बलविंदर संधूने (३/३५) केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने दिल्लीचा दुसरा डाव २३६ धावांत गुंडाळून तब्बल २०४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईने साखळी फेरीतील अपयश मागे टाकून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात मुंबईसमोर बलाढ्य गतविजेत्या कर्नाटकचे तगडे आव्हान असेल.साखळी फेरीतील कामगिरी पाहता मुंबई बाद फेरी तरी गाठणार का याबाबत अनिश्चितता होती. मात्र बाद फेरीपासून मुंबईने आपला ‘खडूस’पणा दाखवण्यास सुरुवात केली. कटक येथे पार पडलेल्या या सामन्याच्या शेवटच्या दिवशी दिल्लीने ४ बाद ११० या धावसंख्येवरुन खेळण्यास सुरुवात केली. सामन्यावर पावसाचे सावट असल्याने मुंबईकरांनी आक्रमक खेळण्यावर भर दिला.शार्दुल ठाकूरने मुंबईला झटपट यश मिळवून देताना मनन शर्माला (१६) बाद केले. यावेळी खेळपट्टीवर आलेल्या धडाकेबाज वीरेंद्र सेहवागवर सर्वांचे लक्ष लागून राहिले. संघाची नाजूक स्थिती ओळखून सेहवागने आक्रमणाला मुरड घालून सावध सुरुवात केली. मात्र ५६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर संधूने सेहवागचा त्रिफळा उखाडून दिल्लीच्या उरल्या सुरल्या आशा देखील संपुष्टात आणल्या. सेहवाग बाद झाल्यानंतर ६ बाद १५० अशा अडचणीत आलेल्या दिल्लीची शेवटची फळी संधू समोर गडगडली. राहूल यादवला (१३) संधूने बाद केल्यानंतर हरमीत सिंगने जम बसलेल्या रजत भाटियाची यष्टी उखाडून दिल्लीची ८ बाद १७२ अशी अवस्था केली. भाटियाचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने दिल्लीकडून सर्वाधिक ४९ धावा फटकावताना १२२ चेंडुमध्ये ८ चौकारांसह १ षटकार खेचला. सांगवानने अखेरपर्यंत नाबाद राहत २६ धावांसह दिल्लीचा पराभव लांबवला. त्याने सुमीत नरवालसह (९) नवव्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केल्यानंतर परवींदर अवाना (२४) सोबत दहाव्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली.ठाकूर आणि संधू यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवताना दिल्लीला नमवण्यात मोलाची भूमिका बजावली. तर मोटा आणि हरमीत यांना प्रत्येकी २ बळी घेण्यात यश आले. संपुर्ण सामन्यात ८ बळी घेऊन मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावलेल्या शार्दुल ठाकूर सामनावीर ठरला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त निकाल:मुंबई (पहिला डाव): सर्वबाद १५६ धावा, दिल्ली (पहिला डाव): सर्वबाद १६६ धावा, मुंबई (दुसरा डाव): सर्वबाद ४५० धावा, दिल्ली (दुसरा डाव): चंद त्रि. गो. मोटा ३१, गंभीर पायचीत गो. ठाकूर ३४, शिवम पायचीत गो. मोटा ०, भाटिया त्रि. गो. हरमीत ४९, मन्हास झे. तरे गो. ठाकूर ०, मनन झे. लाड गो. ठाकूर १६, सेहवाग त्रि. गो. संधू १९, यादव झे. पाटील गो. संधू १३, नरवाल झे. व गो. हरमीत ९, सांगवान नाबाद २६, अवाना झे. यादव गो. संधू २४. अवांतर - १५. एकूण: ८७ षटकांत सर्वबाद २३६ धावा.गोलंदाजी: ठाकूर २४-१०-५९-३; संधू १७-६-३५-३; मोटा १५-५-५५-२; नायर ५-१-११-०; हरमीत २०-८-५५-२; लाड ४-२-९-०; यादव २-१-४-०. सामनावीर: शार्दुल ठाकूर