शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मुंबई मॅरेथॉन : पदक जिंकूनही भारतीय धावपटू झाले नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 05:54 IST

Mumbai Marathon: मॅरेथॉन स्पर्धेत शारीरिक क्षमतेसोबतच हवामानाचीही निर्णायक भूमिका असते. रविवारी पार पडलेल्या २०व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये याच हवामानामुळे धावपटूंना अडचणीचा सामना करावा लागला.

- राेहित नाईकमुंबई - मॅरेथॉन स्पर्धेत शारीरिक क्षमतेसोबतच हवामानाचीही निर्णायक भूमिका असते. रविवारी पार पडलेल्या २०व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये याच हवामानामुळे धावपटूंना अडचणीचा सामना करावा लागला. यामुळेच आघाडीच्या भारतीय धावपटूंनी पदक जिंकल्यानंतरही आपली नाराजी व्यक्त करताना पूर्ण मॅरेथॉन पहाटेच्या वेळी सुरू करण्यात यावी, असे मत व्यक्त केले. दरम्यान, पुरुष एलिट मॅरेथॉनमध्ये इरिट्रीयाच्या धावपटूंनी सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. महिलांमध्ये केनिया, बहरेन आणि इथिओपिया येथील धावपटूंनी बाजी मारली.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गारठा होता. मात्र, रविवारी गारवा कमी झाल्याने भारतीय धावपटूंनी ४२ किमी अंतराची पूर्ण मॅरेथॉन सकाळी ७:२० ऐवजी पहाटे ५:३० वाजता सुरू करण्याची मागणी केली. एलिट गटात इरिट्रीयाच्या बेरहाने टेस्फे याने २ तास ११.४४ मिनिटांची वेळ देत सुवर्ण जिंकले. त्याच्याच देशबांधव मेरहावी केसेटे याने २ तास ११.५० मिनिटांची वेळ देत रौप्य जिंकले. इथियोपियाच्या टेस्फेये डेमेके (२:११.५६) याने कांस्य पदकावर समाधान मानले. महिलांमध्ये, जॉयस टेले (केनिया) हिने २ तास २४.५६ मिनिटांची वेळ देत सुवर्ण पटकावले. शिताये इशेते (बहारेन २:२५.२९) हिने रौप्य, तर मेडिना अर्मिनो (इथिओपिया २:२७.५८) हिने कांस्य जिंकले.

लेह लडाखचा झेंडाअर्ध मॅरेथॉनमध्ये महिला गटात पहिल्या तिन्ही स्थानांवर लेह लडाखच्या धावपटूंनी कब्जा केला. यामध्ये स्टॅनझिन डोलकर (१:२५.५१), स्कारमा लांजेस (१:२७.०३) आणि टाशी लडोल (१:२९.३०) यांनी दबदबा राखला. पुरुषांमध्ये सावन बरवाल (१:०४.३७), हरमनजोत सिंग (१:०६.०३) आणि कार्तिक करकेरा (१:०७.२०) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पटकावले. 

५:३० वाजता सुरु करा मॅरेथॉनभारतीय पूर्ण मॅरेथॉनमध्ये सेनादलाचा दबदबा कायम राहिला. अनिश थापा (२:१७.२३), मान सिंग (२:१७.३७) आणि गोपी थोनाकल (२:१९.५९) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य जिंकले.महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला (२:२०.२८) अवघ्या २९ सेकंदांनी चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. यावेळी, ऑलिम्पियन धावपटू गोपी याने मॅरेथॉन सुरू होण्याच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली. त्याने म्हटले की, ‘मुंबई मॅरेथॉन खूप मोठी स्पर्धा आहे. येथे मॅरेथॉन सुरू होण्याच्या वेळेत बदल केला पाहिजे. आमची मॅरेथॉन जेव्हा सुरू होते, तेव्हा वातावरण काहीसे गरम होते. त्यामुळे आम्हाला वेळेत सुधारणा करणे कठीण होते. आमची पूर्ण मॅरेथॉन पहाटे किमान ५:३० वाजता सुरू व्हावी. यासाठी हौशी धावपटूंची शर्यत आमच्यानंतर करावी. याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.’ महिलांमध्ये निरमाबेन ठाकोर, सोनिका परमार आणि सोनम यांनी अनुक्रमे पहिले तीन स्थान पटकावले. या तिघींनीही स्पर्धेच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त करताना मॅरेथॉन लवकर सुरू करण्याबाबत मत मांडले.

मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांनी सलग २०व्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये अर्ध मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. २००४ सालापासून सुरू झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये त्यांनी यंदा २ तास २० मिनिटांची वेळ देत २१ किमी अंतराची अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली.  

 

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉन