शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

मुंबई मॅरेथॉन : पदक मिळवलं, पण मोबाईल गेला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 18:52 IST

विजयी कामगिरी तात्काळ सोशल मीडियावर टाकता येत नसल्याने नितेंद्रसिंग निराश

रोहित नाईक, मुंबई :  सेनादलाच्या नितेंद्रसिंग रावत याने मुख्य मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात सुवर्ण पटकावले. यासह त्याने ५ लाख रुपयांच्या रोख पुरस्कारावरही कब्जा केला. मात्र यानंतरही तो काहीसा निराश होता, कारण स्पर्धेदरम्यान त्याचा मोबाईलच गहाळ झाला. यामुळे सोशल मीडियावर कायम ‘अ‍ॅक्टिव्ह’ असणाºया नितेंद्रसिंगला आपल्या विजयाची पोस्ट टाकता येत नव्हती आणि हेच त्याच्या निराशामागचे मुख्य कारण होते. गेल्या काही स्पर्धांमध्ये खालावलेल्या कामगिरीमुळे नितेंद्रसिंगवर अनेकांनी टीकेचा भडिमार केला होता. यासाठीच मुंबई मॅरेथॉनच्या दोन दिवसआधी त्याने सोशल मीडियावर ‘आता वेळ सिद्ध करण्याची आहे’ असे म्हटले होते. मात्र मॅरेथॉनदरम्यानच मोबाईल गहाळ झाल्याने आपल्या विजयी कामगिरीची माहिती सोशल मीडियावर टाकता न आल्याने सुवर्ण पटकावल्यानंतरही नितेंदरच्या चेहºयार निराशा पसरली होती. 

‘मॅरेथॉनदरम्यान मोबाईल प्रशिक्षकांकडे दिला असताना तो कुठेतरी गहाळ झाला,’ अशी माहिती नितेंद्रने दिली. मोबाईल शोधण्याचा खूप प्रयत्नही झाला पण काही उपयोग नाही झाला, असेही त्याने निराशेने म्हटले.  याविषयी नितेंद्रने अधिक सांगितले की, ‘ मला माझ्या वेळेत सुधारणा करायची होती. माझ्या खालावलेल्या कामगिरीमुळे अनेकांनी माझ्यावर टीका केली होती, त्यांना मला चोख उत्तर द्यायचे होते. यासाठीच मी मुंबई मॅरेथॉनआधी फेसबुकवर ‘आता वेळ सिद्ध करण्याची आहे’ असे म्हटले होते. पण दुर्दैवाने माझा मोबाईल हरवल्याने मी जिंकल्यानंतरही फेसबुकवर पोस्ट टाकलू शकलो नाही. मला मोबाईल गेल्याचे दु:ख नसून सोशल मीडियावर अद्याप मी माझे अपडेट टाकू शकत नाही, याचे दु:ख जास्त आहे.’त्याचप्रमाणे, ‘या विजेतेपदानंतर माझ्या टीकाकारांना नक्कीच चोख उत्तर मिळाले असणार. मी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टीव्ह असतो. त्यामुळेच अजून पोस्ट टाकता न आल्याने निराश आहे. पण लवकरंच माझी पोस्ट अपलोड होईल. आता मी दुसºया फोनचा वापर करेन, पण त्यासाठी मला सर्व अ‍ॅप पुन्हा डाऊनलोड करावे लागतील.’ असेही नितेंद्रने म्हटले. पुढील योजनांविषयी नितेंद्र म्हणाला की, ‘ आता मी २९ एप्रिलला होणाºया लंडन मॅरेथॉनसाठी तयारी करणार आहे. त्यानंतर जागतिक स्पर्धेची तयारी करेन. पण माझ्यापुढे आर्थिक अडचण असल्याने मी प्रायोजकाच्या प्रतीक्षेत आहे. मी आतापर्यंत सेनादलाच्या मदतीच्या जोरावरच धावलो आणि यापुढेही त्याच जोरावर वाटचाल करेन.’----------------------------यंदा मुंबई मॅरेथॉन मार्गात थोडा बदल करण्यात आला होता. तसेच, सुरुवातीला आणि अंतिम क्षणी लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला. याशिवाय धावताना मार्गात काही हौशी धावपटूंचा अडथळाही झाला. बाईकर्सही आमच्या मधेमधे येते असल्याने अनेकदा गर्दीतून आम्ही मार्ग काढला. याशिवाय आम्हाला कुठेही अडचण आली नाही, पण हे होतंच असतं.  - नितेंद्रसिंग रावत

टॅग्स :Mumbai Marathonमुंबई मॅरेथॉन