शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
8
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
9
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
10
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
11
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
12
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
13
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
14
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
15
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
16
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
17
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
18
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
19
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
20
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!

मुंबईला राजधानीची धडक

By admin | Updated: April 24, 2015 09:29 IST

सलामीवीर श्रेयश अय्यर आणि कर्णधार जेपी ड्युमिनी यांच्या आक्रमक शतकी भागीदारीनंतर इम्रान ताहीर व अमित मिश्राच्या फिरकीच्या जोरावर दिल्लीने तिसरा विजय नोंदवताना मुंबई इंडियन्सला ३७ धावांनी नमवले.

दिल्ली : सलामीवीर श्रेयश अय्यर आणि कर्णधार जेपी ड्युमिनी यांच्या आक्रमक शतकी भागीदारीनंतर इम्रान ताहीर व अमित मिश्राच्या फिरकीच्या जोरावर दिल्लीने तिसरा विजय नोंदवताना मुंबई इंडियन्सला ३७ धावांनी नमवले. विशेष म्हणजे या विजयासह दिल्लीने घरच्या मैदानावरील सलग ९ पराभवांची मालिकादेखील खंडित केली. फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दडपणाखाली आलेल्या मुंबईने पराभव ओढावून घेतला. नाणेफेक जिंकून मुंबईने क्षेत्ररक्षण स्वीकारले. दिल्लीने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात मुंबईला २० षटकांत ९ बाद १५३ अशी मजल मारता आली.भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर लेंडल सिमेन्स आणि पार्थिव पटेल यांनी मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली. सिमेन्स, पटेल, उन्मुक्त चंद आणि भरवशाचा किरॉन पोलार्ड ठराविक अंतराने बाद झाल्याने मुंबईची १०.२ षटकांत ४ बाद ८२ अशी अवस्था झाली. यानंतर कर्णधार रोहित शर्मा (३०) आणि अंबाती रायुडू (३०) यांनी ५व्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करून मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु कुल्टर-नाइलने शर्माला बाद करीत मुंबईला मोठा धक्का दिला. इम्रान ताहीरने टाकलेले १७वे षटक नाट्यमय व निर्णायक ठरले. या षटकातील पहिल्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर त्याने अनुक्रमे हार्दिक पांड्या (०), रायडू आणि मॅक्क्लेनेगन (०) यांना बाद करीत दिल्लीचा विजय निश्चित केला. यावेळी दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या हरभजनला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली. तत्पूर्वी विजयाच्या निर्धाराने दिल्ली स्वारीला गेलेल्या मुंबईकरांची यजमानांनी चांगलीच धुलाई केली. सलामीवीर श्रेयश अय्यर (५६ चेंडूत ८३ धावा) आणि कर्णधार जेपी ड्युमिनी (५० चेंडूत नाबाद ७८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १५४ धावांची आक्रमक शतकी भागीदारी केली. पहिल्याच षटकात मयांक अगरवाल बाद झाल्यानंतर अय्यर आणि कर्णधार ड्युमिनीने तुफान फटकेबाजी करताना मुंबईकरांना चोपले. हरभजनसह सर्वच गोलंदाजांना दिल्लीचा मार खावा लागला. एकटा मलिंगा अचूक मारा करीत असताना त्याला इतर गोलंदाजांकडून उपयुक्त साथ मिळाली नाही. यंदाच्या सत्रात दिल्लीसाठी यशस्वी ठरलेला ‘मुंबईकर’ श्रेयश अय्यरने ५६ चेंडूत ७ चौकार व ५ षटकार टोलावताना मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. ड्युमिनीने देखील मुंबईकरांचा खरपूस समाचार घेताना ५० चेंडूंचा सामना करताना केवळ ३ चौकार मारत ६ षटकारांची आतषबाजी केली. या दोघांनी संपुर्ण डावामध्ये वर्चस्व राखताना मुंबईकरांना सळो की पळो करुन सोडले. शेवटच्या सत्रात मुंबईकरांनी केलेल्या चांगल्या गोलंदाजीमुळे दिल्लीला दोनशेचा टप्पा गाठता आला नाही. मॅक्कलेनघनने २ तर मलिंगा आणि बुमराहने प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)