शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

तमिळनाडूपुढे मुंबईचे आव्हान

By admin | Updated: January 1, 2017 01:09 IST

४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाला रविवारपासून येथे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

राजकोट : ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाला रविवारपासून येथे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघांनी उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजयाची नोंद करीत उपांत्य फेरीत धडक मारली. तामिळनाडूने विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत कर्नाटकचा केवळ दोन दिवसांमध्ये पराभव केला तर मुंबईने रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत हैदराबादची झुंज ३० धावांनी मोडून काढली. मुंबई संघाला विजय मिळवताना पाचव्या व अखेरच्या दिवशी घाम गाळावा लागला होता. नवे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकरच्या मार्गदर्शनाखाली तामिळनाडू संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकविरुद्ध तामिळनाडू संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या विजयामुळे तामिळनाडू संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली आहे. २८ वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीचा मानकरी ठरलेल्या तामिळनाडू संघाने स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन व मुरली विजय यांच्याविना उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी लोकेश राहुल व करुण नायर सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचा पराभव केला. स्पर्धेतील चमकदार कामगिरी बघता मुंबई संघाला प्रबळ दावेदार मानल्या जात आहे, पण त्यांना तामिळनाडू रोखण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. उभय संघांदरम्यान आॅक्टोबर महिन्यात साखळी फेरीत लढत झाली होती. त्यात मुंबई संघाने लाहलीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत तीन दिवसांमध्ये दोन विकेटने विजय मिळवला होता. आॅक्टोबरनंतर मुंबई संघात बराच बदल झाला आहे. लाहलीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत धवल कुलकर्णीने १० बळी घेतले होते, पण आता त्याचा अखिल हेरवाडकर व शुभम रांजणे यांच्यासह दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये समावेश आहे. (वृत्तसंस्था)