शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

तमिळनाडूपुढे मुंबईचे आव्हान

By admin | Updated: January 1, 2017 01:09 IST

४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाला रविवारपासून येथे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

राजकोट : ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या मुंबई संघाला रविवारपासून येथे रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत तामिळनाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. उभय संघांनी उपांत्यपूर्व फेरीत शानदार विजयाची नोंद करीत उपांत्य फेरीत धडक मारली. तामिळनाडूने विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत कर्नाटकचा केवळ दोन दिवसांमध्ये पराभव केला तर मुंबईने रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत हैदराबादची झुंज ३० धावांनी मोडून काढली. मुंबई संघाला विजय मिळवताना पाचव्या व अखेरच्या दिवशी घाम गाळावा लागला होता. नवे मुख्य प्रशिक्षक ऋषिकेश कानिटकरच्या मार्गदर्शनाखाली तामिळनाडू संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकविरुद्ध तामिळनाडू संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. या विजयामुळे तामिळनाडू संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळाली आहे. २८ वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफीचा मानकरी ठरलेल्या तामिळनाडू संघाने स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विन व मुरली विजय यांच्याविना उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी लोकेश राहुल व करुण नायर सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाचा पराभव केला. स्पर्धेतील चमकदार कामगिरी बघता मुंबई संघाला प्रबळ दावेदार मानल्या जात आहे, पण त्यांना तामिळनाडू रोखण्यासाठी घाम गाळावा लागणार आहे. उभय संघांदरम्यान आॅक्टोबर महिन्यात साखळी फेरीत लढत झाली होती. त्यात मुंबई संघाने लाहलीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत तीन दिवसांमध्ये दोन विकेटने विजय मिळवला होता. आॅक्टोबरनंतर मुंबई संघात बराच बदल झाला आहे. लाहलीमध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत धवल कुलकर्णीने १० बळी घेतले होते, पण आता त्याचा अखिल हेरवाडकर व शुभम रांजणे यांच्यासह दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये समावेश आहे. (वृत्तसंस्था)