शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

‘एमपी’ने मल्लखांब दत्तक घेतले, महाराष्ट्राचे काय? पद्मश्री उदय देशपांडे यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 12:11 IST

Uday Deshpande: ‘मल्लखांब हा आपला खेळ असल्याची जाणीव राज्य सरकारला करून द्यावी लागेल. कारण, मध्य प्रदेशने मल्लखांबला दत्तक घेतले आहे; पण आपल्या महाराष्ट्राचे काय? यासाठी मी राज्य सरकारशी योग्य ती चर्चा करणार आहे,’ असे मल्लखांबला जागतिक ओळख मिळवून देणारे दिग्गज प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले. 

- रोहित नाईकमुंबई - ‘मल्लखांब हा आपला खेळ असल्याची जाणीव राज्य सरकारला करून द्यावी लागेल. कारण, मध्य प्रदेशने मल्लखांबला दत्तक घेतले आहे; पण आपल्या महाराष्ट्राचे काय? यासाठी मी राज्य सरकारशी योग्य ती चर्चा करणार आहे,’ असे मल्लखांबला जागतिक ओळख मिळवून देणारे दिग्गज प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले. 

भारत सरकारने देशपांडे यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्कार यादीतून कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, बिलियर्ड्स-स्नूकर, जिमनॅस्टिक्स आणि मॉडर्न पेंटाथलॉन या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला होता. 

याविरोधात या राज्य क्रीडा संघटनांनी एकत्रित येत विरोध दर्शविल्यानंतर पुन्हा एकदा या खेळांचा या पुरस्कार यादीत समावेश झाला. यासाठी या राज्य क्रीडा संघटनांनी मंगळवारी शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या कृतज्ञता सभेदरम्यान देशपांडे यांचा सत्कार केला.  यावेळी देशपांडे म्हणाले की, ‘मल्लखांबला दत्तक घेण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांना वैयक्तिक भेटून माझी व्यथा मांडणार आहे. महाराष्ट्राने मल्लखांबला राजाश्रय देऊन या खेळाच्या प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करावे, ही माझी अपेक्षा आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मल्लखांब विजेत्यांना दरमहा १० हजार रुपये अशी वर्षाला एक लाख २० हजार रुपये शिष्यवृत्ती सुरू केली आहे. भारतात शंभरहून अधिक केंद्रावर मल्लखांबसाठी पाच लाखांचे  क्रीडा साहित्य अनुदान उपलब्ध करून दिले. 

याशिवाय, प्रशिक्षकाला दरमहा ३५-४० हजार रुपये दरमहा वेतन सुरू केले. खेलो इंडियामध्ये मल्लखांबचा समावेश झाला. त्यामुळे मल्लखांबमध्ये सकारात्मक बदल होईल, अशी माझी खात्री आहे.’

मल्लखांबच्या ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धेतील समावेशाचे आपण स्वप्न पाहतोय पण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच मल्लखांबला मोठा संघर्ष करावा लागला. कारण, मल्लखांबकडे पूर्वी व्यायामप्रकार म्हणून पाहिले जात होते. यानंतर भारतीय मल्लखांब महासंघाने कित्येक वर्ष राष्ट्रीय स्पर्धा भरवल्या. त्यामुळेच आज मल्लखांबमध्ये अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मिळाले आणि आता पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यामुळे निश्चितच सकारात्मक बदल होतील.    - उदय देशपांडे

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र