शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

‘एमपी’ने मल्लखांब दत्तक घेतले, महाराष्ट्राचे काय? पद्मश्री उदय देशपांडे यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 12:11 IST

Uday Deshpande: ‘मल्लखांब हा आपला खेळ असल्याची जाणीव राज्य सरकारला करून द्यावी लागेल. कारण, मध्य प्रदेशने मल्लखांबला दत्तक घेतले आहे; पण आपल्या महाराष्ट्राचे काय? यासाठी मी राज्य सरकारशी योग्य ती चर्चा करणार आहे,’ असे मल्लखांबला जागतिक ओळख मिळवून देणारे दिग्गज प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले. 

- रोहित नाईकमुंबई - ‘मल्लखांब हा आपला खेळ असल्याची जाणीव राज्य सरकारला करून द्यावी लागेल. कारण, मध्य प्रदेशने मल्लखांबला दत्तक घेतले आहे; पण आपल्या महाराष्ट्राचे काय? यासाठी मी राज्य सरकारशी योग्य ती चर्चा करणार आहे,’ असे मल्लखांबला जागतिक ओळख मिळवून देणारे दिग्गज प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले. 

भारत सरकारने देशपांडे यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती पुरस्कार यादीतून कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, बिलियर्ड्स-स्नूकर, जिमनॅस्टिक्स आणि मॉडर्न पेंटाथलॉन या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला होता. 

याविरोधात या राज्य क्रीडा संघटनांनी एकत्रित येत विरोध दर्शविल्यानंतर पुन्हा एकदा या खेळांचा या पुरस्कार यादीत समावेश झाला. यासाठी या राज्य क्रीडा संघटनांनी मंगळवारी शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या कृतज्ञता सभेदरम्यान देशपांडे यांचा सत्कार केला.  यावेळी देशपांडे म्हणाले की, ‘मल्लखांबला दत्तक घेण्यासाठी मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांना वैयक्तिक भेटून माझी व्यथा मांडणार आहे. महाराष्ट्राने मल्लखांबला राजाश्रय देऊन या खेळाच्या प्रगतीसाठी अधिक प्रयत्न करावे, ही माझी अपेक्षा आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मल्लखांब विजेत्यांना दरमहा १० हजार रुपये अशी वर्षाला एक लाख २० हजार रुपये शिष्यवृत्ती सुरू केली आहे. भारतात शंभरहून अधिक केंद्रावर मल्लखांबसाठी पाच लाखांचे  क्रीडा साहित्य अनुदान उपलब्ध करून दिले. 

याशिवाय, प्रशिक्षकाला दरमहा ३५-४० हजार रुपये दरमहा वेतन सुरू केले. खेलो इंडियामध्ये मल्लखांबचा समावेश झाला. त्यामुळे मल्लखांबमध्ये सकारात्मक बदल होईल, अशी माझी खात्री आहे.’

मल्लखांबच्या ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धेतील समावेशाचे आपण स्वप्न पाहतोय पण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीच मल्लखांबला मोठा संघर्ष करावा लागला. कारण, मल्लखांबकडे पूर्वी व्यायामप्रकार म्हणून पाहिले जात होते. यानंतर भारतीय मल्लखांब महासंघाने कित्येक वर्ष राष्ट्रीय स्पर्धा भरवल्या. त्यामुळेच आज मल्लखांबमध्ये अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मिळाले आणि आता पद्मश्री पुरस्कार मिळाला. त्यामुळे निश्चितच सकारात्मक बदल होतील.    - उदय देशपांडे

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र