शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

CoronaVirus News: पैसा आणि वेळ व्यर्थ गेला- दूती चंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 06:42 IST

अशावेळी नव्याने तयारी करण्यासाठी पुन्हा मदतीचा हात पुढे येईल की नाही, याबाबत शंका वाटत आहे.’ भारताची वेगवान धावपटू असलेली आशियाई क्रीडा स्पर्धेची रौप्य विजेती दूतीचंद हिने गुरुवारी ही व्यथा मांडली.

नवी दिल्ली : ‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑलिम्पिकच्या तयारीवर जो खर्च झाला तो पैसा आणि वेळ व्यर्थ गेला. ऑलिम्पिकचे आयोजनदेखील अधांतरी आहे. अशावेळी नव्याने तयारी करण्यासाठी पुन्हा मदतीचा हात पुढे येईल की नाही, याबाबत शंका वाटत आहे.’ भारताची वेगवान धावपटू असलेली आशियाई क्रीडा स्पर्धेची रौप्य विजेती दूतीचंद हिने गुरुवारी ही व्यथा मांडली.कोरोनामुळे जगभरात लॉकडाऊन असल्याने क्रीडाविश्व ठप्प झाले आहे. ओडिशाच्या या धावपटूने आॅलिम्पिकच्या तयारीसाठी विदेशात प्रशिक्षण तसेच कोचेसच्या मार्गदर्शनावर आतापर्यंत ३० लाख रुपये खर्च केले. भुवनेश्वर येथून वृत्तसंस्थेशी बोलताना दूती म्हणाली, ‘गेल्या आॅक्टोबरपासून कोच, सहायक कोच, ट्रेनर, रनिंग पार्टनर अशा दहा जणांच्या चमूसोबत माझा सराव सुरू झाला होता. यावर महिन्याकाठी साडेचार लाख खर्च यायचा. आतापर्यंत ३० लाखाचा खर्च होऊन गेला.’जकार्ता येथे २०१८ ला झालेल्या आशियाई स्पर्धेत शंभर मीटर शर्यतीची रौप्य विजेती दूती क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट आॅलिम्पिक योजनेत सहभागी नाही. ओडिशा सरकार आणि केआयआयटीने तिला दत्तक घेतले आहे. टोकियो आॅलिम्पिक २०२० साठी हे प्रायोजनपद होते. आॅलिम्पिक वर्षभरासाठी लांबणीवर पडल्यामुळे सरावाची चिंता दूतीला सारखी बोचत आहे.ओडिशा खनिकर्म विभागाची कर्मचारी असलेली दूती पुढे म्हणाली, ‘कोरोनामुळे जगातील अर्थव्यवस्थेला फटका बसला. सध्या मूलभूत गरजांवर लक्ष्य केंद्रित असल्याने मला प्रायोजक मिळेलच असे नाही. जर्मनीत तीन महिने सरावासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. त्याचे पैसे बुडीत गेले. याशिवाय २० लाख रुपये अग्रिम भरले होते, तेदेखील मिळण्याची शक्यता कमी आहे. सराव थांबल्यामुळे माझा धावण्याचा वेग कमी झाला. हा वेग कायम करण्यासाठी किमान सहा महिने लागणार आहेत.’आॅक्टोबरमध्ये सरावाला हळूहळू सुरुवात होते तेव्हा मार्चमध्ये धावण्यास वेग येतो. जर्मनीत सरावाद्वारे मी वेगवान धावून वेळेचे नियोजन करणार होते. पण आशेवर पाणी फेरले आहे.आॅलिम्पिकचे आयोजन होईलच याचीदेखील शाश्वती नाही. कोरोनाचा प्रकोप वाढतो आहे शिवाय लस आलेली नाही. भारतात अ‍ॅथ्लेटिक्स सरावाच्या अ‍ॅडव्हान्स सुविधा नाहीत. आॅलिम्पिक पात्रतेसाठी विदेशात सराव फारच आवश्यक असल्याचे दूतीचे मत आहे. भारताच्या जितक्या खेळाडूंनी आॅलिम्पिकची पात्रता गाठली ती विदेशातील तयारीच्या बळावरच, असेही दूतीने सांगितले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या