शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

हत्या प्रकरणात सुशीलच्या अटकेनंतर संमिश्र प्रतिक्रिया, विश्व कुस्तीदिनीच झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 07:54 IST

Sushil Kumar's arrest: आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक पटकावीत देशाची मान उंचावणारा सुशील कुमार अनेक दिवस गायब राहिल्यानंतर ज्यावेळी पकडल्या गेला त्यावेळी रविवारी त्याने आपले तोंड टॉवेलाने झाकले होते आणि दिल्ली पोलीसच्या विशेष सेलच्या अधिकाऱ्यांनी त्याचे दोन्ही हात पकडले होते.

नवी दिल्ली : देशातील महान ऑलिम्पियनपैकी एक सुशील कुमारला हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर देशातील क्रीडा जगतात निराशेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक पटकावीत देशाची मान उंचावणारा सुशील कुमार अनेक दिवस गायब राहिल्यानंतर ज्यावेळी पकडल्या गेला त्यावेळी रविवारी त्याने आपले तोंड टॉवेलाने झाकले होते आणि दिल्ली पोलीसच्या विशेष सेलच्या अधिकाऱ्यांनी त्याचे दोन्ही हात पकडले होते. दुर्दैवाने हे सर्वकाही विश्व कुस्ती दिनाच्या दिवशी घडले.भारतीय कुस्तीची नर्सरी मानल्या जाणाऱ्या छत्रसाल स्टेडियममध्ये मारहाणीदरम्यान २३ वर्षीय मल्ल सागर धनकडच्या मृत्यूमध्ये कथित रूपाने समावेश असल्याप्रकरणी सुशील अजामीनपात्र वाॅरंटपासून पळ काढत होता. ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके पटकाविणाऱ्या सुशीलने छत्रसाल स्टेडियमला फार लोकप्रिय केले. सागर दिल्ली पोलीसच्या कॉन्स्टेबलचा मुलगा होता आणि स्टेडियममध्ये सराव करीत होता. मारहाणीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे ५ मे रोजी त्याचा मृत्यू झाला.या घटनेमुळे भारतीय क्रीडा जगत स्तब्ध झाले आहे, पण सुशील कुमारच्या उपलब्धीचा आदर कायम आहे. सुशील कुस्तीमध्ये भारताचा एकमेव विश्व चॅम्पियन व राष्ट्रकुल स्पर्धेतील तीन वेळचा सुवर्णपदक विजेता आहे. 

चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची तयारी करीत असलेला अचंता शरत कमल म्हणाला, या घटनेमुळे भारतीय खेळाच्या प्रतिमेला नुकसान होईल. जर खरेच असे घडले असेल तर ते दुर्दैवी आहे. केवळ कुस्ती नव्हे तर भारतीय खेळांवर याचा वाईट प्रभाव पडेल. सुशील आपल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. लोक त्याच्यापासून प्रेरणा घेतात. त्यामुळे त्याने खरेच असे केले असेल तर केवळ मल्लांवरच नव्हे तर अन्य खेळांच्या खेळाडूंवरही त्याचा नकारात्मक प्रभाव पडेल.’ 

 एक माजी हॉकी कर्णधार म्हणाला, सुशीलसारख्या दर्जाच्या हिरोनेे असे कृत्य करणे खेळासाठी चांगले नाही. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले तर भारतीय खेळासाठी सर्वांत काळा अध्याय राहील. तो अनेक युवा खेळाडूंसाठी आदर्श होता.’ 

एक प्रख्यात नेमबाज म्हणाला, ‘ऑलिम्पियनबाबत चर्चा करताना त्यासोबत अशा बाबीची चर्चा कधी ऐकली नाही. त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. जर खरेच असे घडले असेल तर ते स्तब्ध करणारे आहे. काय घडले, याची मला कल्पना नाही.’ 

माजी हॉकी कर्णधार अजितपाल सिंग यांनी स्पर्धेदरम्यान सुशीलसोबतच्या संवादाचे स्मरण करताना म्हटले की, त्याच्यासोबत असे काय वाईट घडले. ते म्हणाला, ‘ही लाजिरवाणी व दुर्दैवी बाब आहे. आदर्श असण्यासह सुशीलने नेहमी उदाहरण सादर केले आहे. तो कधीच अशा प्रकारच्या वादात पडलेला नाही. त्याच्याकडे जीवनात सर्वकाही आहे. खेळाने त्याला सर्वकाही पैसा, नाव दिले आहे. तो मातीशी जोडलेला व्यक्ती आहे.’ 

सुशीलचा जवळचा मानला जाणारा एक अव्वल बॉक्सर म्हणाला, ‘त्याला दोन लहान मुले आहेत. त्यांच्या होणाऱ्या प्रभावाचा विचार करा.’ सुशीलने त्याचे प्रशिक्षक सतपाल यांची मुलगी सावीसोबत २०११ मध्ये विवाह केला.’ 

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमारWrestlingकुस्तीCrime Newsगुन्हेगारी