शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन मागविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 00:30 IST

यंदाच्या अर्जुन व खेलरत्न पुरस्कारांसाठी जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१९ पर्यंतची कामगिरी विचारात घेतल्या जाणार आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ महामारीमुळे लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयाने यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या दावेदारांना ई-मेलद्वारे नामांकन पाठविण्यास सांगितले आहे. कारण क्रीडा मंत्रालय प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्नसह अन्य खेळांच्या पुरस्कारांसाठी निवड प्रक्रिया सुरू करीत आहे.

सर्वसाधारणपणे एप्रिलमध्ये सुरू होणारी ही प्रक्रिया लॉकडाऊनमुळे मेपर्यंत लांबणीवर पडली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून हा टप्पा १७ मेपर्यंत राहील.

मंत्रालयाच्या परिपत्रकानुसार ‘कोविड-१९च्या प्रकोपामुळे लॉक़डाऊन सुरू असल्याने मानांकनासाठी कागदी प्रत पाठविण्याची गरज नाही. नामांकनाचा अर्जदार व सिफारिश करणाऱ्या अधिकाºयाची स्वाक्षरी असलेला अर्ज स्कॅन करून ई-मेलद्वारे पाठविता येईल.’ नामांकन सादर करण्याची अंतिम तारीख ३ जून निश्चित करण्यात आलेली आहे. परिपत्रकानुसार ‘अंतिम तारखेनंतर मिळणाºया नामांकन अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. कुठल्याही कारणाने उशिर झाला तर त्यासाठी मंत्रालय जबाबदार राहणार नाही.’ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये विविध प्रकारांचा समावेश केल्या जातो. खेळाडूंना देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रशिक्षणामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात येते तर ध्यानचंद पुरस्कार लाईफटाईम अचिव्हमेंटसाठी मिळतो.

यंदाच्या अर्जुन व खेलरत्न पुरस्कारांसाठी जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१९ पर्यंतची कामगिरी विचारात घेतल्या जाणार आहे. दरवेळेप्रमाणे डोपिंगमध्ये दोषी खेळाडू व ज्यांची चौकशी सुरू आहे किंवा प्रलंबित आहे अशांचा नावाचा विचार केला जाणार नाही. खेलरत्न पुरस्कार विजेत्याला ७ लाख ५० हजार तर अर्जुन पुरस्कार विजेत्याला ५ लाख रुपयांची पुरस्कार रक्कम दिली जाते. गेल्या वर्षी पॅरालिम्पियन दीप मलिक व स्टार मल्ल बजरंग पूनिया यांना खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)