शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

मेरीकोम, सरिता देवी यांचे सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 04:34 IST

इंडिया ओपन मुष्टीयुद्ध : शिव थापा याचाही गोल्डन पंच; भारताने केली पदकांची लयलूट

गुवाहाटी : सहावेळच्या विश्व चॅम्पियन एमसी मेरीकोम आणि एल. सरिता देवी यांनी अपेक्षित कामगिरी करताना इंडियन ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याचवेळी, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण विजेत्या अमित पंघालनेही ५२ किलो वजनी गटातून शानदार खेळ करताना जायंट किलर ठरलेल्या सचिन सिवाचचे आव्हान परतावून लावत सुवर्ण पटकावले.

या स्पर्धेत जबरदस्त दबदबा राखलेल्या भारताने पुरुष गटात चार, तर महिला गटात तीन सुवर्ण पदकांची लयलूट केली. स्पर्धेतील एकूण १८ सुवर्णपदकांपैकी १२ सुवर्ण पदकांवर भारताने कब्जा केला. गेल्यावर्षी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या स्पर्धेत भारताने सहा सुवर्ण पदके जिंकली होती. सरिता देवीने अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सिमरनजीत कौरचा ३-२ असा पाडाव केला. ६० किलो वजनी गटातून पहिल्यांदाच खेळत असलेल्या सिमरनजीतने पहिल्या फेरीपासून दमदार खेळ केला. मात्र नंतर सरिताने पुनरागमन करत बाजी मारली.

दुसरीकडे, दिग्गज मेरीकोमने मिझोरमच्या वनलाल दुआती हिचे आव्हान सहजपणे परतावले. ५१ किलो वजनी गटातून पहिल्यांदाच खेळताना मेरीने आपला हिसका दाखवला. याच गटात निकहत जरीन आणि ज्योती यांनी कांस्य जिंकले. पुरुषांमध्ये शिव थापाने गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढताना गतविजेत्या मनीष कौशिकला लोळवले. ६० किलो वजनी गटात थापाने पहिल्या लढतीपासून निर्विवाद वर्चस्व राखले. (वृत्तसंस्था)