शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मीराबाईला सातत्याने सतावत आहे दुखापतग्रस्त होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:44 IST

भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे;

नवी दिल्ली : भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे; पण पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकपूर्वी पुन्हा दुखापतग्रस्त होण्याची भीती सतावत असल्याचे तिने सांगितले.कंबरेच्या दुखापतीमुळे २०१८ मध्ये मीराबाईला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही. गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर मीराबाईने कंबरेचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती.ही दुखापत भारतीय डॉक्टरांसाठी आव्हान ठरली होती. कारणत्यांना याचे कारण शोधता आले नव्हते. या दुखापतीमुळे २४ वर्षीय भारतीय खेळाडूला आशियन गेम्स व विश्व चॅम्पियनशिपला मुकावे लागले.मीराबाई म्हणाली, ‘दुखापतीनंतर बरेच काही बदलले. पुन्हा दुखापतग्रस्त झाले तर काय होईल, अशी भीती सतत असते. प्रत्येक वेळी वजन उचलताना आणि प्रत्येक सराव सत्रापूर्वी मला दोनदा विचार करावा लागतो.’ जवळजवळ नऊ महिन्यांनी वेदना कमी झाल्यानंतर मीराबाईने खेळामध्ये यशस्वी पुनरागमन केले. पुनरागमनात तिने थायलंडमध्ये आपल्या पहिल्या स्पर्धेत ईजीएटी कपमध्ये सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, मीराबाई व प्रशिक्षक विजय शर्मा यांना सरावामध्ये बदल करावा लागला.मीराबाई म्हणाली, ‘माझी पद्धत बदलली. कारण दुखापत का झाली, याचे कारण आम्हाला कळले नाही. हे कुठल्या व्यायामामुळे झाले की माझ्या तंत्रात काही चूक होती, हे आम्हाला कळले नाही.’शर्मा म्हणाले, ‘आम्ही सावधगिरी बाळगत आगेकूच करीत आहोत.’ पुनरागमनानंतर मीराबाईची कामगिरी उल्लेखनीय ठरली. एप्रिलमध्ये आशियन चॅम्पियनशिपमध्ये तिचे थोड्या फरकाने पदक हुकले. मीराबाईने एकूण १९९ किलो (८६ व ११३ किलो) वजन पेलले होते, पण चीनच्या झेंग रोंगच्या तुलनेत ती पिछाडीवर राहिली. झेंगनेही एवढेच वजन उचलले होते, पण क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये अधिक वजन पेलल्यामुळे चीनच्या खेळाडूला पदकमिळाले.मीराबाईने अलीकडेच संपलेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.मणिपूरच्या या खेळाडूची नजर आता सप्टेंबरमध्ये होणाºया विश्वचॅम्पियनशिपवर केंद्रित झाली आहे. २०१७ मध्ये तिने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)>‘दुखापतीतून सावरल्यानंतर माझी प्रगती समाधानकारक आहे. मी ईजीएटीमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही हा मान मिळवला. मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे.- मीराबाई चानू