शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मीराबाईला सातत्याने सतावत आहे दुखापतग्रस्त होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:44 IST

भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे;

नवी दिल्ली : भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे; पण पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकपूर्वी पुन्हा दुखापतग्रस्त होण्याची भीती सतावत असल्याचे तिने सांगितले.कंबरेच्या दुखापतीमुळे २०१८ मध्ये मीराबाईला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही. गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर मीराबाईने कंबरेचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती.ही दुखापत भारतीय डॉक्टरांसाठी आव्हान ठरली होती. कारणत्यांना याचे कारण शोधता आले नव्हते. या दुखापतीमुळे २४ वर्षीय भारतीय खेळाडूला आशियन गेम्स व विश्व चॅम्पियनशिपला मुकावे लागले.मीराबाई म्हणाली, ‘दुखापतीनंतर बरेच काही बदलले. पुन्हा दुखापतग्रस्त झाले तर काय होईल, अशी भीती सतत असते. प्रत्येक वेळी वजन उचलताना आणि प्रत्येक सराव सत्रापूर्वी मला दोनदा विचार करावा लागतो.’ जवळजवळ नऊ महिन्यांनी वेदना कमी झाल्यानंतर मीराबाईने खेळामध्ये यशस्वी पुनरागमन केले. पुनरागमनात तिने थायलंडमध्ये आपल्या पहिल्या स्पर्धेत ईजीएटी कपमध्ये सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, मीराबाई व प्रशिक्षक विजय शर्मा यांना सरावामध्ये बदल करावा लागला.मीराबाई म्हणाली, ‘माझी पद्धत बदलली. कारण दुखापत का झाली, याचे कारण आम्हाला कळले नाही. हे कुठल्या व्यायामामुळे झाले की माझ्या तंत्रात काही चूक होती, हे आम्हाला कळले नाही.’शर्मा म्हणाले, ‘आम्ही सावधगिरी बाळगत आगेकूच करीत आहोत.’ पुनरागमनानंतर मीराबाईची कामगिरी उल्लेखनीय ठरली. एप्रिलमध्ये आशियन चॅम्पियनशिपमध्ये तिचे थोड्या फरकाने पदक हुकले. मीराबाईने एकूण १९९ किलो (८६ व ११३ किलो) वजन पेलले होते, पण चीनच्या झेंग रोंगच्या तुलनेत ती पिछाडीवर राहिली. झेंगनेही एवढेच वजन उचलले होते, पण क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये अधिक वजन पेलल्यामुळे चीनच्या खेळाडूला पदकमिळाले.मीराबाईने अलीकडेच संपलेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.मणिपूरच्या या खेळाडूची नजर आता सप्टेंबरमध्ये होणाºया विश्वचॅम्पियनशिपवर केंद्रित झाली आहे. २०१७ मध्ये तिने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)>‘दुखापतीतून सावरल्यानंतर माझी प्रगती समाधानकारक आहे. मी ईजीएटीमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही हा मान मिळवला. मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे.- मीराबाई चानू