शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

मीराबाईला सातत्याने सतावत आहे दुखापतग्रस्त होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 04:44 IST

भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे;

नवी दिल्ली : भारताची अव्वल भारोत्तोलक मीराबाई चानूने मंगळवारी कंबरेच्या दुखापतीतून सावरले असल्याचे म्हटले आहे; पण पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो आॅलिम्पिकपूर्वी पुन्हा दुखापतग्रस्त होण्याची भीती सतावत असल्याचे तिने सांगितले.कंबरेच्या दुखापतीमुळे २०१८ मध्ये मीराबाईला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता आले नाही. गेल्या वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर मीराबाईने कंबरेचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती.ही दुखापत भारतीय डॉक्टरांसाठी आव्हान ठरली होती. कारणत्यांना याचे कारण शोधता आले नव्हते. या दुखापतीमुळे २४ वर्षीय भारतीय खेळाडूला आशियन गेम्स व विश्व चॅम्पियनशिपला मुकावे लागले.मीराबाई म्हणाली, ‘दुखापतीनंतर बरेच काही बदलले. पुन्हा दुखापतग्रस्त झाले तर काय होईल, अशी भीती सतत असते. प्रत्येक वेळी वजन उचलताना आणि प्रत्येक सराव सत्रापूर्वी मला दोनदा विचार करावा लागतो.’ जवळजवळ नऊ महिन्यांनी वेदना कमी झाल्यानंतर मीराबाईने खेळामध्ये यशस्वी पुनरागमन केले. पुनरागमनात तिने थायलंडमध्ये आपल्या पहिल्या स्पर्धेत ईजीएटी कपमध्ये सुवर्णपदक पटकावले. दरम्यान, मीराबाई व प्रशिक्षक विजय शर्मा यांना सरावामध्ये बदल करावा लागला.मीराबाई म्हणाली, ‘माझी पद्धत बदलली. कारण दुखापत का झाली, याचे कारण आम्हाला कळले नाही. हे कुठल्या व्यायामामुळे झाले की माझ्या तंत्रात काही चूक होती, हे आम्हाला कळले नाही.’शर्मा म्हणाले, ‘आम्ही सावधगिरी बाळगत आगेकूच करीत आहोत.’ पुनरागमनानंतर मीराबाईची कामगिरी उल्लेखनीय ठरली. एप्रिलमध्ये आशियन चॅम्पियनशिपमध्ये तिचे थोड्या फरकाने पदक हुकले. मीराबाईने एकूण १९९ किलो (८६ व ११३ किलो) वजन पेलले होते, पण चीनच्या झेंग रोंगच्या तुलनेत ती पिछाडीवर राहिली. झेंगनेही एवढेच वजन उचलले होते, पण क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये अधिक वजन पेलल्यामुळे चीनच्या खेळाडूला पदकमिळाले.मीराबाईने अलीकडेच संपलेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले.मणिपूरच्या या खेळाडूची नजर आता सप्टेंबरमध्ये होणाºया विश्वचॅम्पियनशिपवर केंद्रित झाली आहे. २०१७ मध्ये तिने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)>‘दुखापतीतून सावरल्यानंतर माझी प्रगती समाधानकारक आहे. मी ईजीएटीमध्ये सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्येही हा मान मिळवला. मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे.- मीराबाई चानू