शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

महेंद्रसिंग धोनीने सोडले कर्णधारपद

By admin | Updated: January 5, 2017 02:29 IST

महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री तडकाफडकी भारतीय वन डे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला.

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री तडकाफडकी भारतीय वन डे आणि टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. खेळाडू या नात्याने आपण संघात कायम राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले. माहीने नेतृत्व सोडल्याने विराट कोहली याच्याकडेच वन डे आणि टी-२० संघाचे देखील नेतृत्व सोपविले जाईल, असे वृत्त आहे.नेतृत्व सोडण्याची इच्छा जाहीर करीत १५ जानेवारीपासून इंग्लंड विरुद्ध सुरू होणाऱ्या वन डे तसेच टी-२० मालिकेत खेळण्यासाठी उपलब्ध राहणार असल्याचे माहीने कळविले आहे. यावर प्रतिक्रिया देत बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी म्हणाले, ‘प्रत्येक प्रकारच्या क्रिकेटमधील धोनीचे योगदान अनन्यसाधारण आहे. भारतीय क्रिकेटमधील त्याचे कर्तृत्व कायम स्मरणात राहील.’दोन वर्षांपूर्वी आॅस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटला अलविदा करणाऱ्या धोनीने वन डे तसेच टी-२०मध्ये भारताला शिखरावर पोहोचविले होते. त्याच्या नेतृत्वात भारताने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तर, २०१५ च्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरी गाठली होती.चार दिवस नागपूरमध्ये धोनीचा होता मुक्काम...गृहराज्य असलेल्या झारखंड रणजी संघाचा मेंटॉर महेंद्रसिंग धोनी सध्या नागपुरात आहे. व्हीसीएच्या सिव्हील लाईन्सस्थित स्टेडियममध्ये बुधवारी त्याचा संघ गुजरातकडून चौथ्याच दिवशी पराभूत झाला. धोनी चारही दिवस मैदानावर हजर राहून खेळाडूंना मार्गदर्शन करीत होता. या दरम्यान निवड समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याशी एमएसने बराचवेळ हितगूज केले. दोघेही सारखे बोलण्यात व्यस्त होते. रात्री अचानक धोनीने राजीनाम्याची घोषणा करताच तर्कविर्तक सुरू झाले.भारतीय संघ निवडीसाठी बैठकसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उद्भवलेल्या प्रशासकीय संकटानंतरही इंग्लंडविरुद्ध वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी शुक्रवारी निवड समितीची बैठक होत आहे.१५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या या मालिकेसाठी मुंबईत एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील समिती संघ निवड करणार असल्याचे बीसीसीआयने बुधवारी जाहीर केले. सीसीआयवर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दोन सराव सामन्यांसाठी देखील भारत अ संघाची निवड समिती करणार आहे.धोनी ‘कॅप्टन्सी’२००७ साली धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या टी२० विश्वचषकावर कब्जा केला.२०११ साली धोनीने भारताला ५० षटकांचा आयसीसी विश्वचषक मिळवून दिला.२०१३ साली भारताने धोनीच्या नेतृत्वामध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावली.२००९ साली भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला.टी२० विश्वचषक, आयसीसी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा धोनी क्रिकेटविश्वातील एकमेव कर्णधार.