शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

भाग्यश्री दळवीकडे महाराष्ट्राची धुरा

By admin | Updated: May 5, 2015 00:39 IST

भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू ठाण्याची भाग्यश्री दळवीकडे महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील मुलींच्या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू ठाण्याची भाग्यश्री दळवीकडे महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील मुलींच्या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ८ ते २४ मेदरम्यान रंगणाऱ्या आॅल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या सब ज्युनियर मुलींच्या १५ वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली.नुकत्याच काठमांडू (नेपाळ) येथे झालेल्या एएफसी अजिंक्यपद स्पर्धेत भाग्यश्रीने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर ती संघासोबत मायदेशी परतली. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या २० सदस्यांच्या संघात मुंबईच्या ५ आणि ठाणेच्या ६ खेळाडूंचा समावेश आहे.महाराष्ट्राचा स्पर्धेत ‘ई’ गटात समावेश असून, या गटात संघासमोर आव्हान असेल ते कसलेल्या सिक्कीम व उत्तराखंडचे. ९ मेला महाराष्ट्राचा सलामीचा सामना उत्तराखंड विरुद्ध होईल. तर १३ मेला महाराष्ट्राचा सामना सिक्कीमविरुद्ध होईल. एकूण ८ गट पाडलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल. १५ - २० मेदरम्यान खेळविण्यात येणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीनंतर २२ मेला उपांत्य फेरी आणि २४ मेला अंतिम सामना होईल. (क्रीडा प्रतिनिधी)