शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

राष्ट्रीय पश्चिम विभागीय समूह मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 21:13 IST

महाराष्ट्राच्या चमूमध्ये सागर राणे, केवल पाटील, अश्विन धर्मे, प्रितेश गर्मे व रोहित मेहरे यांचा समावेश आहे.

अमरावती : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणावर पार पडलेल्या राष्ट्रीय पश्चिम विभागीय समूह मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल ठरला. या तीन दिवसीय स्पर्धेत पुरुष, महिला, एकेरी, पोल, रोप व हँगिंग अशा  तिहेरी गटांमध्ये झुंज रंगली. या पहिल्यावहिल्या स्पर्धेचा महाराष्ट्र राज्य विजेता ठरला आहे.  

महाराष्ट्राच्या चमूमध्ये सागर राणे, केवल पाटील, अश्विन धर्मे, प्रितेश गर्मे व रोहित मेहरे यांचा समावेश आहे. एकेरी स्पर्धेमध्ये प्रीतेश गर्मे याने २५.०५० तर सागर राणे याने २४.९५० अंक पटकावित अव्वल ठरले. मुलींच्या चमू गटात महाराष्ट्राने ४१.६२ अंक पटकावित आपला दबदबा कायम ठेवला. प्रथम ठरलेल्या महाराष्ट्राच्या चमूमध्ये अनुष्का नाईक, पल्लवी शिंदे, समृद्घी डहाके, आर्या भोयर, अदिती करमंबेकळ व निर्मल चौधरी यांचा समावेश होता. राष्ट्रीय एकेरी स्पर्धेत पल्लवी शिंदे ९ अंकांसह अव्वल ठरली व तिसºया क्रमांकावर महाराष्ट्राची अनुष्का नाईक यशस्वी ठरली. पोल मल्लखांब स्पर्धेत सागर राणे ८.८०, तर निहाल विचारे ८.७६ अंक पटकावित प्रथम ठरले. हँगिंग मल्लखांब स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रीतेश गर्मे ८.६० व केवल पाटील ८.५३ अंक घेऊन अव्वल ठरलेत. रोप मल्लखांब स्पर्धेत सागर राणे याने ८.५६ व प्रीतेश गर्मे याने ८.४० अंक प्राप्त करीत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.

केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय आणि भारतीय ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एक भारत श्रेष्ठ भारत, खेलो इंडिया व भारतीय मल्लखांब संघटनेच्यावतीने राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचे प्रथमच अमरावतीत आयोजन झाले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेचा शनिवारी समारोपीय कार्यक्रम पार पडला. मार्गदर्शक म्हणून मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, अध्यक्ष मल्लखांब फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष रमेश इंदौलिया उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसूम साहू, मंडळाच्या सचिव माधुरी चेंडके, मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष धरमवीर सिंह, कोषाध्यक्ष दिलीप गव्हाणे, प्राचार्य के.के देबनाथ व निरीक्षक (साई) रामकृष्ण लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तीन गटांतील या स्पर्धेत महाराष्ट्रासह हरियाणा, गोवा, तामिळनाडू, ओडिशा, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, लद्दाख या आठ राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी दर्जेदार प्रदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना चषक, प्रमाणपत्र देत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे मुख्य संयोजक विलास दलाल व संचालन आशिष हाटेकर यांनी केले. आभार लक्ष्मीकांत खंडागडे यांनी मानले.  

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र