शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

जिंकूनही महाराष्ट्र स्पर्धेबाहेर!

By admin | Updated: March 22, 2017 00:06 IST

गेल्या वर्षी उपविजेता राहिलेल्या महाराष्ट्र संघाला यंदाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मात्र, मिझोरामने रेल्वेचा ५-१ धुव्वा उडवल्याने

पणजी/वास्को : गेल्या वर्षी उपविजेता राहिलेल्या महाराष्ट्र संघाला यंदाही उपांत्य फेरी गाठण्याची संधी होती. मात्र, मिझोरामने रेल्वेचा ५-१ धुव्वा उडवल्याने त्याचा परिणाम गुणतालिकेवर झाला. गुणफरकाच्या सरासरीमुळे महाराष्ट्र संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली. महाराष्ट्राला ‘ब’ गटातून तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी बलाढ्य केरळचा २-० ने पराभव केला.वास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने केरळवर वर्चस्व राखले होते. ३४ व्या मिनिटाला वैभव शिरळे आणि ५९ व्या मिनिटाला श्रीकांत वीरामल्लू याने शानदार गोल नोंदवले. या विजयानंतर महाराष्ट्र संघाचे एकूण सहा गुण झाले. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्र संघाला केवळ एका विजयाची आवश्यकता होती. मात्र, दुसरीकडे, मिझोराम आणि रेल्वे यांच्यातील सामना अनिर्णित राहणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे होते. दुसऱ्या सामन्यात मिझोरामने मात्र रेल्वेचा ५-१ ने धुव्वा उडवला. या निकालाचा फटका महाराष्ट्र संघाला बसला. मिझोराम आणि केरळ यांचे समान गुण होते. केरळ पराभूत झाल्याने मिझोराम दुसऱ्या स्थानावर पोहोचला. आता गुरुवारी (दि. २३) होणाऱ्या उपांत्य फेरीत मिझोरामचा सामना पश्चिम बंगालविरुद्ध तर गोव्याचा सामना केरळविरुद्ध होईल. महाराष्ट्राने असे केले गोल...केरळविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राने ३४ व्या मिनिटाला आघाडीचा गोल नोंदवला. अ‍ॅरॉन डिकॉस्ताच्या क्रॉसिंगवर वैभव शिरळे याने चेंडूला जाळीची दिशा दाखविली. त्यानंतर ४० व्या मिनिटाला महाराष्ट्राला आणखी एक गोल करण्याची संधी होती़; परंतु, वैभवचा फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. मध्यंतरापर्यंत १-० आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राने या सत्रातही जोरकस खेळ केला. ५९ व्या मिनिटाला अ‍ॅरोन डिकॉस्ताच्या क्रॉसवर श्रीकांत वीरमल्लूने केरळचा गोलरक्षक मेलर्बन दास याला चकवीत शानदार गोल नोंदवला. केरळने पुनरागमनाचा प्रयत्न केला. मात्र, महाराष्ट्राचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)