शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

महाराष्ट्र केसरी : मातीतल्या वाघाने मॅटच्या सिंहाला केले चीतपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 19:26 IST

बाला रफिक शेखच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती. दोन वेळचा खुराकही त्याला व्यवस्थित मिळत नव्हता.

- जयंत कुलकर्णीजालना : हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या अंतिम लढतीत बुलडाण्याच्या बालारफिक शेख याने पुण्याच्या अभिजीत कटके याच्यावर ११-३ अशा मोठ्या गुणफरकाने मात करताना, रविवारी प्रथमच प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. बुलडाण्याचा बालारफिक शेख याचे महाराष्ट्र केसरीचे पहिलेच विजेतेपद आहे, तर दुसरीकडे अभिजीत कटके याचे सलग दुसºयांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावण्याचे स्वप्न भंगले.महाराष्ट्र केसरी किताबाची लढत असल्यामुळे, रविवारी दुपारी ३ वाजल्यापासूनच कुस्ती चाहत्यांनी गर्दी केली होती. प्रत्येक जण अभिजीत कटके व बालारफिक शेख यांच्यातील प्रतिष्ठेची लढत पाहण्यासाठी आसुसलेला होता. ‘बजरंग बली’, ‘भारत माता की जय’ या घोषणेतच या दोन तुल्यबळांतील अंतिम लढतीची घोषणा झाली.भूगाव येथील महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरलेल्या अभिजीत कटकेने सुरुवातीलाच बालारफिकला एकेरी पट काढताना सर्व ताकदीनिशी आखाड्याच्या बाहेर फेकले. या वेळी तेथील आखाडाप्रमुखाच्या अंगावर बालारफिक आदळला. यातून सावरताना बालारफिकने जबरदस्त आक्रमक पावित्रा अवलंबला व दुहेरी पट काढून २-१ अशी आघाडी घेतली. अभिजीतने पुन्हा एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला, परंतु बालारफिकने त्याला बाहेर करीत, पहिल्या फेरीअखेर आपली आघाडी ३-१ अशी केली. पहिल्या फेरीनंतर बालारफिक जास्त आक्रमक झाला व सुरुवातीलाच दुहेरी पट काढताना आघाडी २ गुण घेतले, परंतु त्याच वेळी भारंदाज डाव मारत २ गुण वसूल केली. त्यानंतर, पुन्हा दुहेरी पट काढताना ११-३ अशी आघाडी घेत महाराष्ट्र केसरी किताबावर शिक्कामोर्तब केले.९२ किलोगटात अनिलची बाजीअंतिम सामन्यानंतर विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे, संयोजन समितीचे अध्यक्ष व राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, आॅलिम्पियन मारुती आडकर, दयानंद भक्त आदींच्या उपस्थितीत बालारफिकला प्रतिष्ठित चांदीची गदा प्रदान केली.त्याआधी माती गटाच्या ९२ किलो वजन गटात नांदेडच्या अनिल जाधवने अंतिम सामन्यात मुंबईच्या सुहास गोडगे याला १-० तांत्रिक गुणांच्या आधारावर पराभूत करीत सुवर्णपदक पटकावले. ९२ किलोच्या गादी विभागातील अंतिम सामन्यात सोलापूरच्या सिकंदर शेख याने भारंदाज व डंकी डावावर पुणे शहरच्या अक्षय भोसले याच्यावर मात करीत सुवर्णपदक पटकावले. ६५ किलो गादी गटात कोल्हापूरच्या सोनबा गोंगाणे याने आपल्याच गावच्या माणिक कारंडे याला ५-२ असे नमवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. ६५ किलोच्या माती विभागात पुण्याच्या सूरज कोकाटे याने सोलापूरच्या सूर्यकांत रुपनवर याच्यावर ४-० अशी मात करीत सुवर्णपदकावर कब्जा केला.महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर झालेला आनंद बालारफिक शेख रोखू शकला नाही. अभिजीत कटके याच्यावर मात करतानाच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळे. एवढे मोठे यश मिळेल असे वाटले नव्हते. हे यश आपल्या गुरुला आपण समर्पित करीत आहोत. आपल्यावर प्रेम करणाºया सर्व कुस्ती प्रेंमीचे आभार, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.आक्रमक खेळ केलेल्या अभिजीत काटके याने अपेक्षित सुरुवात करताना लढतीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. लढतीतील पहिला गुण घेताना तो आपले जेतेपद पटकावणार असेच दिसत होते. मात्र, बालारफिकने सुरुवातीला सावध पवित्रा घेतल्यानंतर हळूहळू आपले सर्व डाव साधत अभिजीतवर नियंत्रण राखले. त्याच्या भक्कम पकडीपुढे अभिजीतही काहीसा थकलेला दिसला आणि अखेर त्याला हार मान्य करावी लागली.‘एवढे मोठे यश मिळेल असे वाटले नव्हते. महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद मी माझे गुरु गणपतराव आंदळकर यांना समर्पित करीत आहे. त्यांनी मला महाराष्ट्र केसरीचे स्वप्न दाखवले. आता माझे लक्ष्य हे हिंदकेसरी व्हायचे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवायचे हे आहे. माझ्यावर प्रेम करणाºया सर्व कुस्तीप्रेमींचे आभार,’ अशी प्रतिक्रिया त्याने प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा बालारफिक शेख याने जेतेपद पटकावल्यानंतर व्यक्त केली.९२ किलो गादी विभाग :सुवर्ण : सिकंदर शेख (सोलापूर), रौप्य : अक्षय भोसले (पुणे शहर), कास्य पदक : रोहित कारले (पुणे जिल्हा), अनिकेत मोरे (सांगली).९२ किलो माती विभागसुवर्ण : अनिल जाधव (नांदेड). रौप्य : सुहास गोडगे (मुंबई). कास्य : ज्ञानेश्वर गादे (हिंगोली).

टॅग्स :Wrestlingकुस्ती