शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्राने मिळवले खेलो इंडिया युवा स्पर्धेचे यजमानपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 01:45 IST

पुण्यात रंगणार स्पर्धा; देशभरातील ९ हजार खेळाडूंची नोंदणी

नवी दिल्ली : ‘खेलो इंडिया शालेय स्पर्धा’ या उपक्रमानंतर आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘खेलो इंडिया युवा स्पर्धा’ आयोजित करण्याचे ठरविले असून या स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्राला बहाल करण्यात आले आहे. महाराष्ट्राने या स्पधेर्साठी बोली लगावत बाजी मारली.केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी महाराष्ट्राचे शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची घोषणा केली. स्पर्धेचे यजमानपद पुणे शहरास बहाल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही स्पर्धा पुढील वर्षी ९ ते २० जानेवारी दरम्यान होईल. ज्यामध्ये देशातील ९ हजार खेळाडूंची नोंदणी केली जाईल. यासंदर्भात, राठोड म्हणाले की, ‘खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेचे यश पाहता आम्ही युवा खेळाडूंसाठी स्पर्धांची योजना आखली होती. त्यासाठी तीन राज्यांनी बोली लावली होती आणि महाराष्ट्राने बाजी मारली. या शर्यतीत आसाम व झारखंड हेही होते. देशात आंतरराष्ट्रीय स्तराचे वातावरण निर्माण व्हावे. युवा खेळाडूंच्या प्रतिभेचा शोघ घेता यावा, यासाठी पंतप्रधानांनी आमच्यापुढे विचार ठेवला होता. खेलो इंडियाला आता शालेय स्तरावरून युवा स्पर्धापर्यंत पोहचण्यापर्यंत आम्ही आलो आहोत. निश्चितपणे ही वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे.’राठोड पुढे म्हणाले, ‘गेल्या वर्षीप्रमाणेच १७ वर्षांखालील खेळाडूंसोबत यंदा २१ वर्षांखालील स्पर्धा होतील. गेल्या वर्षी या स्पर्धांत जवळपास साडे तीन हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यावेळी ही स्पर्धा चांगली पद्धतीने आयोजित होईल की नाही याबाबत लोकांमध्ये शंका होती. मात्र, आम्ही ती यशस्वी करून दाखवली. आता ९ हजार खेळाडूंची नोंदणी करण्यात आली आहे.’गेल्या वर्षी खेलो इंडियाच्या यशस्वीतेनंतर राज्य सरकारने यजमानपदासाठी मन बनवले होते. आम्ही गेल्याच वर्षी तयारी करीत होतो. या स्पर्धेमुळे भारत आणि खासकरून महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती विकसित करण्यास मदत मिळेल.-विनोद तावडे, क्रीडामंत्री, महाराष्ट्र राज्य 

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडिया