शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लुईसची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक

By admin | Updated: July 12, 2017 00:40 IST

पूर्ण क्षमता असलेला विंडीज संघ विश्व क्रिकेटसाठी लाभदायक आहे आणि भारताविरुद्धच्या एकमेव टी-२० लढतीत त्याची प्रचिती आली.

सौरभ गांगुली लिहितात...पूर्ण क्षमता असलेला विंडीज संघ विश्व क्रिकेटसाठी लाभदायक आहे आणि भारताविरुद्धच्या एकमेव टी-२० लढतीत त्याची प्रचिती आली. इर्विन लुईसने आक्रमक क्रिकेट खेळताना चाहत्यांना रिझविले व संघाला विजयही मिळवून दिला. त्याच्या खेळात कॅरेबियन शैली दिसून आली. यापूर्वी खेळल्या गेलेल्या टी-२० लढतीत भारतीय संघाच्या मार्गात लुईस अडथळा ठरला होता आणि रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यातही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ त्याच्यापुढे सपशेल अपयशी ठरला. त्याने दोन संधी दिल्या असल्या तरी, त्यामुळे त्याने केलेल्या खेळीचे महत्त्व कमी होणार नाही. त्याच्या आक्रमक खेळीला लगाम घालण्यासाठी भारतीय संघाकडे काही पर्याय होते. संघाला २० षटकांत १९० धावांचे आव्हान पार करून देण्यासाठी विंडीजच्या एका फलंदाजाकडून अशाप्रकारची खेळी आवश्यक होती. भारतीय संघाची आक्रमक सुरुवात बघता संघाने दोनशे धावांचा पल्ला पार करणे अपेक्षित होते. पण कोहली व धवन बाद झाल्यानंतर यजमान संघाने पुनरागमन केले. पदार्पणाची लढत खेळणाऱ्या ऋषभ पंतसाठी ही खडतर लढत होती. दिनेश कार्तिक व पंत यांनी धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना विंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवता आले नाही. कार्तिक बाद झाल्यानंतर धोनी व कुलदीप यादव यांना विशेष छाप सोडता आली नाही. त्यामुळे भारताच्या धावगतीवर प्रभाव पडला. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर १९० धावांचे लक्ष्य आव्हानात्मक होते. भारतीय वेगवान गोलंदाज विंडीजच्या आघाडीच्या फळीला रोखण्यात कितपत यशस्वी ठरतात, यावर सर्व काही अवलंबून होते. गेलने संयमी खेळी केली, पण लुईसने मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने एकाही गोलंदाजाला सेट होण्याची संधी दिली नाही. लुईसने गुडलेंग्थवरील चेंडूला पुढे सरसावत सीमारेषा दाखविली तर आखूड टप्प्याच्या चेंडूंना त्याने मिडविकेट सीमारेषेचा मार्ग दाखविला. अशा प्रकारची आक्रमक खेळी करताना दैवाची साथ मिळणे आवश्यक असते आणि भारतीय क्षेत्ररक्षकांनी त्याला दोन संधी बहाल केल्या. या युवा खेळाडूने सुरुवातीपासून आक्रमक खेळी करीत वर्चस्व गाजवले. कुलदीप यादवचा काहीअंशी अपवाद वगळता भारतीय फिरकीपटूंना छाप सोडता आली नाही. शमीला लयच गवसली नाही, त्यामुळे लुईसला थोपविणे शक्य झाले नाही. टी-२० लढतीत १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९ गडी राखून विजय मिळविण्याची कामगिरी प्रशंसनीय आहे. लुईसची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. या निकालामुळे विंडीज क्रिकेट बोर्डाला संघात अनुभवी व युवा खेळाडूंचे मिश्रण असायला हवे, याची प्रचिती आली असेल. याचा योग्य ताळमेळ साधण्याची काळजी घेतली तर विंडीज क्रिकेटची सध्या असलेली स्थिती नक्कीच सुधारेल. (गेमप्लॅन)