शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
4
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
5
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
6
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
7
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
8
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
9
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
10
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
11
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
12
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
13
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
14
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
15
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
16
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
17
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
18
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
19
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
20
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...

लुईसची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक

By admin | Updated: July 12, 2017 00:40 IST

पूर्ण क्षमता असलेला विंडीज संघ विश्व क्रिकेटसाठी लाभदायक आहे आणि भारताविरुद्धच्या एकमेव टी-२० लढतीत त्याची प्रचिती आली.

सौरभ गांगुली लिहितात...पूर्ण क्षमता असलेला विंडीज संघ विश्व क्रिकेटसाठी लाभदायक आहे आणि भारताविरुद्धच्या एकमेव टी-२० लढतीत त्याची प्रचिती आली. इर्विन लुईसने आक्रमक क्रिकेट खेळताना चाहत्यांना रिझविले व संघाला विजयही मिळवून दिला. त्याच्या खेळात कॅरेबियन शैली दिसून आली. यापूर्वी खेळल्या गेलेल्या टी-२० लढतीत भारतीय संघाच्या मार्गात लुईस अडथळा ठरला होता आणि रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यातही विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ त्याच्यापुढे सपशेल अपयशी ठरला. त्याने दोन संधी दिल्या असल्या तरी, त्यामुळे त्याने केलेल्या खेळीचे महत्त्व कमी होणार नाही. त्याच्या आक्रमक खेळीला लगाम घालण्यासाठी भारतीय संघाकडे काही पर्याय होते. संघाला २० षटकांत १९० धावांचे आव्हान पार करून देण्यासाठी विंडीजच्या एका फलंदाजाकडून अशाप्रकारची खेळी आवश्यक होती. भारतीय संघाची आक्रमक सुरुवात बघता संघाने दोनशे धावांचा पल्ला पार करणे अपेक्षित होते. पण कोहली व धवन बाद झाल्यानंतर यजमान संघाने पुनरागमन केले. पदार्पणाची लढत खेळणाऱ्या ऋषभ पंतसाठी ही खडतर लढत होती. दिनेश कार्तिक व पंत यांनी धावगती वाढविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना विंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवता आले नाही. कार्तिक बाद झाल्यानंतर धोनी व कुलदीप यादव यांना विशेष छाप सोडता आली नाही. त्यामुळे भारताच्या धावगतीवर प्रभाव पडला. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर १९० धावांचे लक्ष्य आव्हानात्मक होते. भारतीय वेगवान गोलंदाज विंडीजच्या आघाडीच्या फळीला रोखण्यात कितपत यशस्वी ठरतात, यावर सर्व काही अवलंबून होते. गेलने संयमी खेळी केली, पण लुईसने मात्र आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने एकाही गोलंदाजाला सेट होण्याची संधी दिली नाही. लुईसने गुडलेंग्थवरील चेंडूला पुढे सरसावत सीमारेषा दाखविली तर आखूड टप्प्याच्या चेंडूंना त्याने मिडविकेट सीमारेषेचा मार्ग दाखविला. अशा प्रकारची आक्रमक खेळी करताना दैवाची साथ मिळणे आवश्यक असते आणि भारतीय क्षेत्ररक्षकांनी त्याला दोन संधी बहाल केल्या. या युवा खेळाडूने सुरुवातीपासून आक्रमक खेळी करीत वर्चस्व गाजवले. कुलदीप यादवचा काहीअंशी अपवाद वगळता भारतीय फिरकीपटूंना छाप सोडता आली नाही. शमीला लयच गवसली नाही, त्यामुळे लुईसला थोपविणे शक्य झाले नाही. टी-२० लढतीत १९० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९ गडी राखून विजय मिळविण्याची कामगिरी प्रशंसनीय आहे. लुईसची खेळी सर्वोत्तम खेळींपैकी एक आहे. या निकालामुळे विंडीज क्रिकेट बोर्डाला संघात अनुभवी व युवा खेळाडूंचे मिश्रण असायला हवे, याची प्रचिती आली असेल. याचा योग्य ताळमेळ साधण्याची काळजी घेतली तर विंडीज क्रिकेटची सध्या असलेली स्थिती नक्कीच सुधारेल. (गेमप्लॅन)