शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

Lawn Bowls CWG 2022 : ना कोच, ना पैसे... तरीही लॉन बॉल्समध्ये भारताच्या लेकींनी रचला इतिहास; 'असं' जिंकलं सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:15 IST

Lawn Bowls CWG 2022 : CWG2022 भारताचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. पण सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या लेकींचा या प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी नेत्रदिपक भरारी घेतली आहे. 

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी इतिहास घडविला. लॉन बॉल्स (Lawn Bowls) हा क्रीडा प्रकार कालपर्यंत भारतीयांच्या परिचयाचाही नव्हता, परंतु या चार महिलांनी ऐतिहासिक पदक निश्चित करताच याची चर्चा सुरू झाली. त्यात भारतीय महिलांनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७-१० असा विजय मिळवला. CWG2022 भारताचे हे एकूण चौथे सुवर्णपदक ठरले. पण सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या लेकींचा हा प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी नेत्रदिपक भरारी घेतली आहे. 

लॉन बॉल्ससाठी कोणताही फंड नाही, कोच नाही... असं असतानाही त्यांनी आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावलं आहे. चारही जणी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधील असून सर्वांचं राहणीमान अगदी साधं आहे. पण हे सर्व असताना त्यांनी इतिहास रचला आहे. "जी मेहनत आम्ही केली, ज्याचा विचार आम्ही केला ते आम्ही अखेर मिळवलं. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही यासाठी मेहनत करत होतो. आम्ही खेळत होतो, अनेक मेडल्स आम्ही जिंकले. पण क़ॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल जिंकणं आमचं ध्येय होतं" असं टीम इंडियाने म्हटलं आहे. 

कॉमनवेल्थ गेम्स 2018 नंतर महिला टीमकडे कोणीच कोच नव्हतं. म्हणजेत गेल्या चार वर्षांपासून त्या स्वत:च तयारी करत होत्या. आता चार वर्षांनी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि भारताने सुवर्णपदक जिंकलं. लॉन्स बॉल्स अनेक वर्षांपासून कॉमनवेल्थचा गेम्सचा हिस्सा आहे. पण भारताने पहिल्यांदा यात मेडल जिंकलं आहे. महिला टीममधील लवली चौबे झारखंडची असून ती पोलीस कॉन्स्टेबल आहे. नयनमोनी साकिया फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी करते. पिंकी दिल्लीच्या एका शाळेत शिक्षिका आहे. तर रुपा राणी झारखंडमध्ये खेळाशी संबंधित अधिकारी आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर आजतकशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

'Lawn Bowls' हा खेळ कसा खेळतात माहीत आहे का?

लॉन बॉल पाहताना प्रथम दर्शनी असे दिसेल की दोन्ही टीममध्ये चार खेळाडू असून तीन खेळाडू दूर ठेवलेल्या पिवळ्या चेंडूच्या ( Jack) आपल्या जवळील मोठ्या चेंडूला जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. बरं खेळाडूंना जो चेंडू दिला जातो त्याचा आकार हा पिवळ्या चेंडूपेक्षा दुप्पट मोठा असतो. त्या चेंडूच्या बाजू किंचितशा सपाट असतात आणि तो वजनदार असतो. तो वजनदार बॉल खेळाडू फेकून नव्हे तर जमिनीलगत ठेऊन ( सरपटी) त्या समोरील पिवळ्या चेंडूपर्यंत पोहोचवायचा असतो. तो बॉल जॅकच्या जितक्या जवळ जाईल, तितके गुण मिळण्याचे प्रमाण अधिक असते.

दोन्ही संघ जॅकच्या जास्तीत जास्त जवळ आपल्याकडील चेंडू पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे ज्या संघाचे जेवढे चेंडू जॅक जवळ असतील तेवढे त्या संघाला गुण दिले जातात. प्रत्येक फेरीत ९ प्रयत्न केले जातात. १५ फेरीपर्यंत हा खेळ सुरू राहतो आणि जेवढे ज्याचे गुण अधिक त्याला विजयी घोषित केले जाते. नाणेफेक महत्त्वाची ठरले, कारण जो संघ आधी चेंडू फेकणार असतो तो प्रतिस्पर्धीला एका ठराविक अंतरापर्यंत जॅक टाकण्याची संधी देतो आणि त्यानंतर सामना सुरू होतो. दोन्ही संघांचे खेळाडू आळीपाळीने चेंडू जॅक पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारतGold medalसुवर्ण पदक