शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

Lawn Bowls CWG 2022 : ना कोच, ना पैसे... तरीही लॉन बॉल्समध्ये भारताच्या लेकींनी रचला इतिहास; 'असं' जिंकलं सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:15 IST

Lawn Bowls CWG 2022 : CWG2022 भारताचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. पण सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या लेकींचा या प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी नेत्रदिपक भरारी घेतली आहे. 

नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी इतिहास घडविला. लॉन बॉल्स (Lawn Bowls) हा क्रीडा प्रकार कालपर्यंत भारतीयांच्या परिचयाचाही नव्हता, परंतु या चार महिलांनी ऐतिहासिक पदक निश्चित करताच याची चर्चा सुरू झाली. त्यात भारतीय महिलांनी सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७-१० असा विजय मिळवला. CWG2022 भारताचे हे एकूण चौथे सुवर्णपदक ठरले. पण सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारताच्या लेकींचा हा प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणींवर मात करत त्यांनी नेत्रदिपक भरारी घेतली आहे. 

लॉन बॉल्ससाठी कोणताही फंड नाही, कोच नाही... असं असतानाही त्यांनी आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर सुवर्णपदक पटकावलं आहे. चारही जणी वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधील असून सर्वांचं राहणीमान अगदी साधं आहे. पण हे सर्व असताना त्यांनी इतिहास रचला आहे. "जी मेहनत आम्ही केली, ज्याचा विचार आम्ही केला ते आम्ही अखेर मिळवलं. गेल्या कित्येक महिन्यांपासून आम्ही यासाठी मेहनत करत होतो. आम्ही खेळत होतो, अनेक मेडल्स आम्ही जिंकले. पण क़ॉमनवेल्थ गेम्समध्ये मेडल जिंकणं आमचं ध्येय होतं" असं टीम इंडियाने म्हटलं आहे. 

कॉमनवेल्थ गेम्स 2018 नंतर महिला टीमकडे कोणीच कोच नव्हतं. म्हणजेत गेल्या चार वर्षांपासून त्या स्वत:च तयारी करत होत्या. आता चार वर्षांनी त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं आणि भारताने सुवर्णपदक जिंकलं. लॉन्स बॉल्स अनेक वर्षांपासून कॉमनवेल्थचा गेम्सचा हिस्सा आहे. पण भारताने पहिल्यांदा यात मेडल जिंकलं आहे. महिला टीममधील लवली चौबे झारखंडची असून ती पोलीस कॉन्स्टेबल आहे. नयनमोनी साकिया फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी करते. पिंकी दिल्लीच्या एका शाळेत शिक्षिका आहे. तर रुपा राणी झारखंडमध्ये खेळाशी संबंधित अधिकारी आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर आजतकशी संवाद साधताना त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

'Lawn Bowls' हा खेळ कसा खेळतात माहीत आहे का?

लॉन बॉल पाहताना प्रथम दर्शनी असे दिसेल की दोन्ही टीममध्ये चार खेळाडू असून तीन खेळाडू दूर ठेवलेल्या पिवळ्या चेंडूच्या ( Jack) आपल्या जवळील मोठ्या चेंडूला जवळ पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. बरं खेळाडूंना जो चेंडू दिला जातो त्याचा आकार हा पिवळ्या चेंडूपेक्षा दुप्पट मोठा असतो. त्या चेंडूच्या बाजू किंचितशा सपाट असतात आणि तो वजनदार असतो. तो वजनदार बॉल खेळाडू फेकून नव्हे तर जमिनीलगत ठेऊन ( सरपटी) त्या समोरील पिवळ्या चेंडूपर्यंत पोहोचवायचा असतो. तो बॉल जॅकच्या जितक्या जवळ जाईल, तितके गुण मिळण्याचे प्रमाण अधिक असते.

दोन्ही संघ जॅकच्या जास्तीत जास्त जवळ आपल्याकडील चेंडू पोहोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे ज्या संघाचे जेवढे चेंडू जॅक जवळ असतील तेवढे त्या संघाला गुण दिले जातात. प्रत्येक फेरीत ९ प्रयत्न केले जातात. १५ फेरीपर्यंत हा खेळ सुरू राहतो आणि जेवढे ज्याचे गुण अधिक त्याला विजयी घोषित केले जाते. नाणेफेक महत्त्वाची ठरले, कारण जो संघ आधी चेंडू फेकणार असतो तो प्रतिस्पर्धीला एका ठराविक अंतरापर्यंत जॅक टाकण्याची संधी देतो आणि त्यानंतर सामना सुरू होतो. दोन्ही संघांचे खेळाडू आळीपाळीने चेंडू जॅक पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात.

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाIndiaभारतGold medalसुवर्ण पदक