शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

स्थानिक मैदानाची उणीव जाणवते : द्रविड

By admin | Updated: April 10, 2015 08:59 IST

आयपीएलमध्ये दोन वर्षांपासून स्वत:चे स्थानिक सामने दुसऱ्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला स्थानिक मैदानाची उणीव जाणवत आहे.

मुंबई : आयपीएलमध्ये दोन वर्षांपासून स्वत:चे स्थानिक सामने दुसऱ्या मैदानावर खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सला स्थानिक मैदानाची उणीव जाणवत आहे. या संघाचा सल्लागार राहुल द्रविड याने ही खंत व्यक्त केली; पण इतरत्र खेळण्यासाठी आम्ही मानसिकरीत्या सज्ज झाल्याचेही तो म्हणाला.संघाचा माजी कर्णधार आणि आता सल्लागार बनलेला द्रविड म्हणाला, ‘मागच्या वर्षी आम्ही अहमदाबाद हे स्थानिक मैदान निवडले होते. यंदा मुंबईत खेळणार आहोत. आम्हाला सवाई मानसिंग स्टेडियमची उणीव जाणवते. त्या मैदानावर आमचा रेकॉर्डदेखील चांगला आहे.’ राजस्थानने मानसिंग स्टेडियमवर पहिल्या सहा पर्वांतील ३८ पैकी २९ सामने जिंकले हे विशेष. २०१४ साली मात्र आरसीएला सरकारकडून परवानगी न मिळाल्याने शहरात एकही सामना आयोजित होऊ शकला नाही. तेव्हापासून हे प्रकरण लालफितशाहीत अडकले आहे. आरसीएने अहमदाबादच्या मोतेरा मैदानावर चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. २०१५ च्या पर्वात आम्ही या मैदानावर अधिक सामने जिंकू, असा विश्वास द्रविडने व्यक्त केला. यंदा आठव्या पर्वात मुंबईच्या स्थानिक मैदानावर राजस्थान रॉयल्सला तीन सामने खेळायचे आहेत. यावर द्रविड म्हणाला, ‘आमच्या संघासाठी यंदा परिस्थिती वेगळी आहे. अहमदाबाद येथे खेळल्यानंतर आता क्रिकेट क्लब आॅफ इंडियाच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळावे लागत आहे. येथे सरावासाठी सर्व खेळाडू उत्सुक आहेत.’ कामगिरीत सातत्य राखणारे आणि दडपणातही उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू टी-२० क्रिकेटला हवे आहेत. विजयाची भूक असेल तर या प्रकारात निश्चितपणे विजय मिळत असल्याचे द्रविडने सांगितले. (वृत्तसंस्था)