शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

कोलकातामध्येही भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध

By admin | Updated: March 12, 2016 16:53 IST

टी20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान मॅच कोलकात्यात घेण्यावरुन दहशतवाद विरोधी आघाडीने (Anti-Terrorist Front of India) विरोध दर्शवला आहे

ऑनलाइन लोकमत - 
कोलकाता, दि. १२ - टी20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान मॅच कोलकात्यात घेण्यावरुन  दहशतवाद विरोधी आघाडीने (Anti-Terrorist Front of India) विरोध दर्शवला आहे.  19  मार्चला भारत - पाकिस्तान सामना खेळवला गेल्यास आम्ही ईडन गार्डनमधील मैदान उखडून टाकू, अशी धमकीच त्यांनी दिली आहे. दहशतवाद विरोधी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विरेश शांडिल्या यांनी याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रदेखील लिहिलं आहे. 
 
दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्यांचा हा अपमान असल्याने हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी विरेश शांडिल्या यांनी केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचं स्वागत करणं हे दहशतवाही हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा अपमान आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाकिस्तान संघाला सुरक्षा तसंच इतर कोणत्याच सुविधा पुरविण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे अशी माहिती विरेश शांडिल्या यांनी दिली आहे. 
 
मुंबई, पठाणकोट आणि पम्पोरे दहशतवादी हल्याचा कट रचणा-यांना भारताच्या हवाली केल्यास आमची सामना खेळवण्यास काही हरकत नसल्याचं विरेश शांडिल्या यांनी सांगितलं आहे. 14 मार्चपासून दहशतवाद विरोधी आघाडीचे कार्यकर्ते संपुर्ण राज्यभर आंदोलन करणार आहेत. ज्यामध्ये ईडन गार्डन, हॉटेल आणि एअरपोर्टचा समावेश असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाने यामध्ये मध्यस्थी करुन पाकिस्तान संघाला भारतात येण्यापासून रोखावे अशी मागणीही विरेश शांडिल्या यांनी केली आहे.
 
सुरक्षेच्या मुद्यामुळे भारत-पाकिस्तान सामना हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे न घेता कोलकात्यामधील ईडन गार्डनवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र कोलकात्यातदेखील या सामन्याला विरोध होऊ लागला आहे.