शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

कोलकातामध्येही भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध

By admin | Updated: March 12, 2016 16:53 IST

टी20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान मॅच कोलकात्यात घेण्यावरुन दहशतवाद विरोधी आघाडीने (Anti-Terrorist Front of India) विरोध दर्शवला आहे

ऑनलाइन लोकमत - 
कोलकाता, दि. १२ - टी20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान मॅच कोलकात्यात घेण्यावरुन  दहशतवाद विरोधी आघाडीने (Anti-Terrorist Front of India) विरोध दर्शवला आहे.  19  मार्चला भारत - पाकिस्तान सामना खेळवला गेल्यास आम्ही ईडन गार्डनमधील मैदान उखडून टाकू, अशी धमकीच त्यांनी दिली आहे. दहशतवाद विरोधी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विरेश शांडिल्या यांनी याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रदेखील लिहिलं आहे. 
 
दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्यांचा हा अपमान असल्याने हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी विरेश शांडिल्या यांनी केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचं स्वागत करणं हे दहशतवाही हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा अपमान आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाकिस्तान संघाला सुरक्षा तसंच इतर कोणत्याच सुविधा पुरविण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे अशी माहिती विरेश शांडिल्या यांनी दिली आहे. 
 
मुंबई, पठाणकोट आणि पम्पोरे दहशतवादी हल्याचा कट रचणा-यांना भारताच्या हवाली केल्यास आमची सामना खेळवण्यास काही हरकत नसल्याचं विरेश शांडिल्या यांनी सांगितलं आहे. 14 मार्चपासून दहशतवाद विरोधी आघाडीचे कार्यकर्ते संपुर्ण राज्यभर आंदोलन करणार आहेत. ज्यामध्ये ईडन गार्डन, हॉटेल आणि एअरपोर्टचा समावेश असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाने यामध्ये मध्यस्थी करुन पाकिस्तान संघाला भारतात येण्यापासून रोखावे अशी मागणीही विरेश शांडिल्या यांनी केली आहे.
 
सुरक्षेच्या मुद्यामुळे भारत-पाकिस्तान सामना हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे न घेता कोलकात्यामधील ईडन गार्डनवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र कोलकात्यातदेखील या सामन्याला विरोध होऊ लागला आहे.