शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कोलकातामध्येही भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचला विरोध

By admin | Updated: March 12, 2016 16:53 IST

टी20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान मॅच कोलकात्यात घेण्यावरुन दहशतवाद विरोधी आघाडीने (Anti-Terrorist Front of India) विरोध दर्शवला आहे

ऑनलाइन लोकमत - 
कोलकाता, दि. १२ - टी20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान मॅच कोलकात्यात घेण्यावरुन  दहशतवाद विरोधी आघाडीने (Anti-Terrorist Front of India) विरोध दर्शवला आहे.  19  मार्चला भारत - पाकिस्तान सामना खेळवला गेल्यास आम्ही ईडन गार्डनमधील मैदान उखडून टाकू, अशी धमकीच त्यांनी दिली आहे. दहशतवाद विरोधी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विरेश शांडिल्या यांनी याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रदेखील लिहिलं आहे. 
 
दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्यांचा हा अपमान असल्याने हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी विरेश शांडिल्या यांनी केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचं स्वागत करणं हे दहशतवाही हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा अपमान आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाकिस्तान संघाला सुरक्षा तसंच इतर कोणत्याच सुविधा पुरविण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे अशी माहिती विरेश शांडिल्या यांनी दिली आहे. 
 
मुंबई, पठाणकोट आणि पम्पोरे दहशतवादी हल्याचा कट रचणा-यांना भारताच्या हवाली केल्यास आमची सामना खेळवण्यास काही हरकत नसल्याचं विरेश शांडिल्या यांनी सांगितलं आहे. 14 मार्चपासून दहशतवाद विरोधी आघाडीचे कार्यकर्ते संपुर्ण राज्यभर आंदोलन करणार आहेत. ज्यामध्ये ईडन गार्डन, हॉटेल आणि एअरपोर्टचा समावेश असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाने यामध्ये मध्यस्थी करुन पाकिस्तान संघाला भारतात येण्यापासून रोखावे अशी मागणीही विरेश शांडिल्या यांनी केली आहे.
 
सुरक्षेच्या मुद्यामुळे भारत-पाकिस्तान सामना हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे न घेता कोलकात्यामधील ईडन गार्डनवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र कोलकात्यातदेखील या सामन्याला विरोध होऊ लागला आहे.